29 March 2024 2:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

सुशांत प्रकरण | त्यांनी मला क्वारंटाईन नाही तर चौकशीच क्वारंटाईन केली

Sushant Singh Rajput Case, Bihar Police, Patna SP Vinay Tiwari, Quarantine

मुंबई, ७ ऑगस्ट : सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस अधिकारी पटण्यासाठी रवाना झाले आहेत. मला क्वारंटाईन केल्यामुळे चौकशीत अडथळा आल्याचा आरोप विनय तिवारी यांनी केला आहे. पटण्याला परतत असताना विनय तिवारी यांनी माध्यमांशी संवाद साधला.

‘त्यांनी मला क्वारंटाईन केलं असं मी म्हणणार नाही, तर त्यांनी चौकशीच क्वारंटाईन केली. बिहार पोलिसांच्या चौकशीमध्ये अडथळे आणले गेले,’ असा आरोप विनय तिवारी यांनी केला आहे. कोणतीही यंत्रणा एकत्र काम करत असते. आपल्याला एकत्र काम करणं गरजेचं आहे असं सांगताना सीबीआय तपास करत असल्याने सुशांत सिंह प्रकरणावर आता भाष्य करणं योग्य ठरणार नाही असंही यावेळी ते म्हणाले.

दरम्यान सीबीआयने तपास हाती घेतल्यानंतर बिहारमधून आलेले पोलीस अधिकारी गुरुवारी पुन्हा राज्यात रवाना झाले. क्वारंटाइन असल्याने विनय तिवारी मुंबईतच होते. बिहारचे पोलीस महासंचालक (डीजीपी) गुप्तेश्वर पांडे यांनी विनय तिवारी यांना क्वारंटाइन करण्यावरुन टीका करताना कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता.

त्यांना क्वारंटाईन केल्यानंतर पालिका आयुक्तांना बिहार पोलीस अधिकाऱ्यांनी पत्र लिहून विनय तिवारी यांची सुटका कारण्यासाठी विनंती केली होती. तसेच याबाबत कायदेशीर मार्गाने पुढचं पाऊल उचलू असं देखील त्यांनी म्हटलं होतं. सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची शिफारस बिहार पोलिसांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने ही शिफारस मान्य करत सीबीआयकडे तपास देण्यास मान्यता दिली. यानंतर सीबीआयने सुद्धा तपास हाती घेत ६ ऑगस्ट २०२० रोजी एकूण सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

News English Summary: Bihar police officers who had come to Mumbai to investigate the death of Sushant Singh Rajput have left for Patna. Vinay Tiwari has alleged that quarantining me hampered the investigation.

News English Title: Sushant Singh Death Case Bihar Patna SP Vinay Tiwari Release From Quarantine News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x