नवी दिल्ली : १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांच्याच काळात राजस्थानमधील पोखरण येथे अणुचाचणी करण्यात आली होती आणि त्यानंतर संपूर्ण जगाला म्हणजे अगदी अमेरिकेच्या सीआयए’ला सुद्धा त्या अणुचाचणीचा सुगावा लागला नव्हता. तो विषय अणुशास्त्रज्ञ ए. पी. जे. अब्दुल कलाम, स्वतः अटलबिहारी वाजपेयी, तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस आणि भारतीय लष्कर अशा ‘टीम’ने नियोजन पद्धतीने हाताळला होता.

त्यानंतर पाकिस्तानच्या कुरघोडी वाढत असताना ३ मे १९९९ रोजी अखेर पाकिस्तानने कारगिलच्या मुद्याला धरून थेट युद्धच पुकारलं होत. त्यानंतर हे युद्ध जवळपास अडीच महिने पेटलं आणि २६ जुलै १९९९ रोजी भारतीय जवानांनी कारगिलवर तिरंगा झेंडा फडकावून पाकिस्तानची मस्ती जिरवली होती.

त्या कारगिल युद्धात भारताचे ५२७ वीर जवान शहिद झाले होते तर १३०० हून अधिक जवान जखमी झाले होते. त्यावेळची आतंरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा वाजपेयीनीं मुसद्दीपणा दाखवत पाकिस्तानला जेरीस आणलं होत. भारतीय जवानांचे आणि जनतेचे मनोधैर्य उंचावण्यासाठी आणि देशाचे प्रतिनिधी म्हणून संतापलेल्या पंतप्रधान वाजपेयीनीं थेट पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना दूरध्वनी करून खडे बोल सुनावले होते आणि तुम्ही संबंध द्रुढ करण्यासाठी एकाबाजूला आम्हाला लाहोरच निमंत्रण देता आणि दुसऱ्याबाजूला युद्ध पुकारत हे चुकीचं आहे असा सज्जड दम दिला होता.

Atal Bihari never work as a Vajpayee Government but enjoy like a team nda