नेरळ : शिवसेना वरिष्ठ नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई शिवसेना पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना म्हणाले की, शिवसेनेला संपविण्याची भाषा करणारे संपले आहेत. सुभाष देसाई म्हणाले छगन भुजबळ तुरुंगात गेला, गणेश नाईक घरी बसला आणि नारायण राणे महाराष्ट्रातून तडीपार झाला असा एकेरी शब्द प्रयोग करत टीका केली.
विशेष म्हणजे नुकतेच महाराष्ट्राच्या राजकारणातून दिल्लीत राज्यसभेवर गेलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या उल्लेख सुभाष देसाई यांनी ‘महाराष्ट्रातून तडीपार’ असा केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या सर्वच पक्षातील प्रतिनिधी राज्यसभेवर गेले असून त्यांचा नुकताच रीतसर शपथविधी सुद्धा पार पडला होता आणि हे संसदीय मानाचं पद म्हणून ओळखल जात.
परंतु महाराष्ट्राच्या राजकारणातून राज्यसभेमार्फत दिल्लीत गेलेल्या नारायण राणेंचा सुभाष देसाई यांनी थेट ‘महाराष्ट्रातून तडीपार’ असाच उल्लेख केल्याने सर्वच अवाक झाले आहेत.
आता यावर नारायण राणे आणि नितेश राणे कसं उत्तर देणार याकडेच सर्वांचे लक्ष आहे.
