2 May 2025 9:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केवळ १० वर्षांसाठी आरक्षण हवं होतं : सुमित्रा महाजन

रांची : लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आरक्षणावर आश्चर्यकारक विधान केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केवळ १० वर्षांसाठी आरक्षण हवं होतं असं थेट विधान त्यांनी एका कार्यक्रमात केलं आहे. शिक्षण तसेच नोकरीमध्ये कायमचं आरक्षण मिळणं हे योग्य आहे का, असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या विधानामुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

रांचीमध्ये सुरू असलेल्या ४ दिवसीय लोकमंथन कार्यक्रमात त्या उपस्थितांसमोर बोलत होत्या. दरम्यान त्या म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं होतं, की आरक्षण केवळ १० वर्षांकरिता आवश्यक आहे. परंतु आरक्षणानं देशाचं कल्याण होणार आहे काय ?, असा प्रश्न सुद्धा सुमित्रा महाजन यांनी उपस्थित केला आहे. परंतु असं असलं तरी देशाला पुढे नेण्यासाठी आंबेडकरांनी दिलेल्या मार्गानं चालणं गरजेचं आहे अशी टिपणी सुद्धा त्यांनी जोडली.

जोपर्यंत तुमच्या मध्ये देशाबद्दलची भक्ती वाढणार नाही, तोपर्यंत देशाचा विकास अशक्य आहे. संसद दिवसेंदिवस आरक्षण वाढवत चाललं आहे. प्रत्येक वेळी १० वर्षांसाठी आरक्षण वाढवलं जातंय. एकदा तर आरक्षणाची मुदत तब्बल २० वर्षांसाठी वाढवण्यात आली होती आणि असं कधीपर्यंत चालणार आहे असं प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आमच्या सरकारनं धर्म परिवर्तनविरोधी कायदा केला.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या