मुंबई : व्यंगचित्राच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील जातीय राजकारणावर अचूक बोट ठेवलं आहे. आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन राज्यात जातीय राजकारणाने जोर पकडला आहे आणि त्याचे भविष्यातील गंभीर परिमाण ओळखूनच राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र प्रसिद्ध केलं आहे.
सध्या राज्यात पगडी राजकारणाने सुद्धा जोर पकडला आहे. त्यातच वेगवेगळ्या जातींच्या लोकांना, आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन अप्रत्यक्ष भडकविण्याचे आणि आरक्षणाचे आमिष दाखविण्याचे प्रकार सुरु आहेत. काही महिन्यांपूर्वी राज्यभर जातीय दंगली सुद्धा उसळल्या होत्या.
राज्यातील या सर्व घडामोडी पाहता राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना व्यंगचित्राच्या माध्यमातून वेळीच सूचित केलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिटनेस चॅलेंजची सुद्धा खिल्ली उडविली आहे.
काय आहे नक्की ते व्यंगचित्र ?
