अगरतला : त्रिपुरा मधील डाव्यांच्या २५ वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावून त्रिपुरा विधानसभेवर बहुमताने भाजपचा झेंडा फडकला. त्रिपुरा भाजपचे प्रभारी सुनील देवधर यांनी या विजयामध्ये मोठी कामगिरी निभावल्याचे समजते.

सुनील देवधर यांची ३ वर्षापूर्वी त्रिपुराच्या प्रभारीपदी नियुक्ती झाली होती. मागील विधानसभेत निवडणुकीत त्यांच्या एकूण ५० उमेदवारांपैकी ४९ उमेदवारांचे डिपॉझिट सुद्धा जप्त झाले होते इतकी वाईट परिस्थिती होती. परंतु सुनील देवधर यांनी त्रिपुरातील जवळजवळ ६० पेक्षा अधिक विधानसभा क्षेत्र दौरे करून पिंजून काढले.

गावागावात छोट्या सभा घेऊन जनाधार आणि संपर्क वाढवण्यावर भर दिला. त्यांनंतर पक्ष तरुणांपर्यंत पोहोचविण्यापेक्षा हजारो तरुणांना प्रत्यक्ष पक्षाशी जोडले आणि जोमाने प्रचार चालू ठेवला. जर विद्यमान सरकारला घरी नेस्तनाबूत करायचे असेल तर पक्षाचा प्रचार हा ग्रामीण भागात घेऊन जाण्यावर अधिक भर दिला आणि त्यांना प्रचंड यश सुद्धा संपादन झाले ज्याचा परिणाम आजचे विधानसभेचे निकाल असल्याचे बोलले जात आहे.

The man behind BJPs big victory in Tripura Assembly election