6 May 2025 3:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणारी योजना, 1 लाख बचतीचे 45 लाख होतील, तर SIP वर 1.06 कोटी मिळतील Horoscope Today | 06 मे 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 06 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या TTML Share Price | 51 टक्के परतावा मिळेल, आज शेअरमध्ये 4.01% तेजी, गुंतवणूकदार तुटून पडले - NSE: TTML Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS RVNL Share Price | झटपट मोठी कमाई होईल, पीएसयू शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL BHEL Share Price | या मल्टिबॅगर पीएसयू शेअरला तज्ज्ञांनी दिली BUY रेटिंग, मिळेल इतका मोठा परतावा - NSE: BHEL
x

राज्याची कायदा व सुव्यवस्था बिहारपेक्षा वाईट: उद्धव ठाकरे

अहमदनगर : अहमदनगरमधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण नगर जिल्ह्यात आणि राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिहारपेक्षा वाईट असल्याचा आरोप करत महाराष्ट्राला स्वतंत्र आणि पूर्णवेळ गृहमंत्री हवा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलीय.

शिवसेना पक्षप्रमुख सध्या अहमदनगरच्या दौऱ्यावर असून त्यांनी ज्या दोन कुटुंबीयावर संकट कोसळलेय त्यांची जबाबदारी ही शिवसेनेची आहे असं सांगितलं. हत्या झालेल्या शिवसैनिकांच्या कुटुंबीयांची उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन त्यांच सांत्वन केलं आहे. तसेच पत्रकारांशी बोलताना त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवरून फडणवीस सरकारवर सुद्धा निशाणा साधला.

तसेच हत्या करणारे आरोपी अजून मोकाट असून जलद गतीने खटला चालवावा तसेच खटला लढण्यासाठी विशेष सरकारी उज्ज्वल निकम यांची नियुक्त करावी अशी मागणी त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या