रत्नागिरी रिफायनरी | कोकणी माणसाच्या आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या बागा धोक्यात, प्रकल्पावरून शिंदे समर्थक कोकणी जनतेच्या विरोधात
Ratnagiri Refinery Project Protest | कोकणातील रिफायनरी प्रकल्पासाठी एका बाजूला सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे तर दुसऱ्या बाजूला स्थानिकांकडून प्रकल्पाला विरोध केला जात आहे. या प्रकरणी आतापर्यंत काही जणांना अटकही करण्यात आली आहे. सोमवारी रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना राजापूरमध्ये अटक करण्यात आली. त्यांसोबत आणखी दोन सहकाऱ्यांनाही अटक केली असून तिघांनाही रत्नागिरीत ठेवण्यात आले आहे.
1 वर्षांपूर्वी