ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. शिवसेनेच्या राजन विचारे यांनी राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांना कडवी झुंज दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे २ टर्म शिवसेनेकडून खासदारकी उपभोगणारे राजन विचारे आता पुढील ५ वर्ष पुन्हा ठाण्याचे खासदार असतील हे निश्चित झालं आहे.

दरम्यान, आज जाहीर झालेल्या निकालांमध्ये सेनेचे राजन विचारे विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे याच लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची चांगली ताकद असताना सुद्धा पक्षाला पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे लवकरच विधानसभा निवडणूक देखील होणार असल्याने राष्ट्रवादी नेमकी काय भूमिका घेणार ते पाहावं लागणार आहे.

ठाणे लोकसभा: शिवसेनेचे राजन विचारे यांचा विजय; राष्ट्रवादीचे आनंद परांजपे पराभूत