यवतमाळ : अनेक दिवसांपासून राजकीय चर्चेचा विषय बनलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून यवतमाळमध्ये सुरुवात. दरम्यान, वरिष्ठ साहित्यिका सहगल यांचे निमंत्रण नाकारण्यात आल्याने मोठा वाद पेटला होता. अनेक घडामोडीनंतर यावर पडदा पाडण्याचा प्रयत्न झाला असून आता या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकाचा मान राजूर (ता. कळंब) येथील वैशाली सुधाकर येडे या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीला मिळाला आहे.

संमेलनाध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरे यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाल्याने यानिमित्ताने अभूतपूर्व असा ‘महिला योग’ जुळून आला आहे असे म्हणावे लागेल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरीत शुक्रवारी दुपारी ४ वाजता संमेलनाचे उद्घाटन मोठं वाजत गाजत होणार आहे. दरम्यान, याकार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची नावे असली तरी ते दोघेही या उद्घाटनाला अनुपस्थित राहणार आहेत असे वृत्त आहे.

तसेच चोहोबाजूंनी प्रचंड टीका झाल्यानंतर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी राजीनामा दिला. त्यामुळे वाद निकाली काढून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. संमेलनाच्या आयोजकांनी उद्घाटक म्हणून शेतकरी महिलेला मान देण्याची विनंती महामंडळाला केली. दरम्यान, संमेलनाच्या एक दिवस आदी यवतमाळात महामंडळाने बैठक घेऊन जाहीर केला होता.

vaishali yede will inaugurate yavatmal sahitya sammelan