30 April 2024 1:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

संघ आधुनिक शस्त्रसाठा करून प्रतिसैन्य उभारत आहे का? प्रकाश आंबेडकर

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वसंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडे असलेल्या एके 47 रायफलचा संदर्भ देत ती यांच्याकडे कशी आली असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच एके ४७ रायफल बाळगल्याप्रकरणी त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. आपल्या देशातील कायद्यानुसार कोणालाही विनापरवाना शस्त्र बाळगता येत नाही आणि चक्क एके ४७ रायफल सापडल्यामुळे तर अतिरेकी कायद्यांतर्गत कारवार्इ केली जाते. या मुद्द्याला धरून प्रकाश आंबेडकरांनी सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

आपल्या देशात परवानगी घेऊन पिस्तूल वापरता येते पण देशाच्या संरक्षणासाठी वापरण्यात येणारे अत्याधुनिक हत्यारं संघाकडे कशी? तसेच देशाच्या संरक्षणासाठी भूदल, नौदल आणि वायुदल असताना संघाणे प्रतिसेना का उभा करावी? असे प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केले आहेत. संघाच्या लोकांकडे शास्त्रात्रं सापडत आहेत. मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदी यांचे एके 47 या रायफलसह फोटोही समोर आले आहेत. यांच्यावर नागपुरात पोलीस तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे आणि आता पोलीस यावर काय कार्यवाही करणार हे पाहावे लागेल.

भारिप बहुजन महासंघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोरील अमरज्योत या ठिकाणी शांतता आंदोलन पुकारण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जमा केलेला शस्त्रसाठा जप्त करण्यात यावा या मागणीसाठी शांतता आंदोलन पुकारण्यात आले होते. यावेळी प्रकाश आंबेडकर बोलत होते. ते म्हणाले, संघाकडे असलेली शस्त्रास्त्रे पोलिसांनी ताब्यात घेतली नाही तर महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन केले जाईल.

हॅशटॅग्स

#Prakash Ambedkar(119)#RSS(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x