4 May 2024 11:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8'वा वेतन आयोग केव्हा स्थापन होणार? बेसिक पगार किती वाढणार? Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट
x

जलयुक्त शिवार योजनेचे ७,५०० कोटी कुठं गेले ? अजित पवार

मुंबई : महाराष्ट्रावर सध्या दुष्काळाच भयंकर संकट ओढवलं असून त्याला अनुसरून आज एनसीपी पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. दरम्यान, जर आज राज्यावर दुष्काळ ओढवला असेल तर जलयुक्त शिवार योजनेचे ७,५०० कोटी नेमके गेले कुठं? असा प्रश्न पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.

दरम्यान, शिर्डी मधील भाषणादरम्यान मोदींनी उल्लेख केला होता की, जलयुक्त शिवार योजनेमुळे १६,००० गावांना पाणी मिळाले. पण, पंतप्रधानांचा हा दावा पूर्णपणे खोटा आहे असा आरोप पत्रकार परिषदेत अजित पवारांनी केला. राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत जलयुक्त शिवार योजना आणली. परंतु, ताशा प्रकारची कामे झाली असल्याचे काहीच दिसत नाही. जर असं असेल तर मग या योजनेचे ७,५०० कोटी रुपये गेले कुठे, असा थेट प्रश्न उपस्थित करून अप्रत्यक्ष पणे भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

तसेच राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची आणि सामान्य जनतेची फसवणूक झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात सध्या अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती आहे आणि ग्रामीण महाराष्ट्र होरपळून निघण्याची चिन्ह आहेत. राज्यात याआधी १९७२ दुष्काळाची भयंकर स्थिती ओढवली होती. परंतु सध्या त्यापेक्षा सुद्धा भयंकर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे असं त्यांनी म्हटलं. परंतु, राज्य सरकार अजूनही अधिकृत पणे दुष्काळ घोषित करत नाही. त्यामुळे राज्य सरकारने ताबडतोब दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,००० रुपये मदत द्यावी, अशी मागणी अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच ३३ टक्के वीजबील माफ केल्याचे राज्य सरकार सांगते. परंतु, महावितरण आज सुद्धा वीजबीलं पाठवतच आहे. सणांच्या दिवशी लोकांना अंधारात ठेवण्याचे काम फडणवीस सरकार करत आहे. त्यामुळे फडणवीस सरकारने भारनियमन ताबडतोब रद्द करावे, अशी मागणी यावेळी अजित पवार यांनी केली.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x