7 May 2025 2:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL Rattan Power Share Price | पेनी स्टॉक 52 आठवड्यांच्या जवळ आला, तज्ज्ञांने दिले महत्वाचे संकेत - NSE: RTNPOWER Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

मोदी सरकारचा आरबीआय'वर एक्सेस कॅपिटलमधून २ लाख कोटी रुपयांसाठी दबाव?

नवी दिल्ली : आरबीआय’कडे उपलब्ध असलेल्या अतिरिक्त रोकड अर्थात “एक्सेस कॅपिटल” मधून, मोदी सरकारला तब्बल १ ते ३ लाख कोटी रुपये दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ‘बँक ऑफ अमेरिका मॅरिल लिंच’च्या तज्ञांनी रिझर्व्ह बँकेकडून मोदी सरकारला १ ते ३ लाख कोटी रुपये मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ही रक्कम भारताच्या एकूण जीडीपीच्या ०.५ ते १.६ टक्के इतकी असेल असं म्हटलं आहे.

दरम्यान, RBI आणि मोदी सरकारमधील संबंध पुन्हा तणावपूर्ण होण्याची शक्यता अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारांना भावणाऱ्या आणि मतदानात रूपांतरित होणाऱ्या योजना सुरु करायच्या असल्याने मोदी सरकारला मोठा निधी गरजेचा आहे. अशा योजनांमुळे मोदी सरकार थेट मतांची गणित आखत असल्याने ते सुद्धा अतिरिक्त निधीसाठी झपाटून उठले आहेत.

विविध प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, अनेक योजनांसाठी पैसा उपलब्ध करण्यासाठी मोदी सरकारकडून हा हट्ट केला असून ते निरनिराळ्याप्रकारे RBI’वर सारखा दबाव वाढवत आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी पत्रकार परिषदेत पुढील ६ महिने तरी केंद्र सरकारला RBI’च्या पैशांची आजोबाच्या गरज नसल्याचे स्पष्ट करून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, छुप्या मार्गाने रिझर्व्ह बँकेवर दबाव वाढविण्याचे प्रकार थांबले नसल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, या वादावर मधला मार्ग काढण्यासाठी RBI’ने सुद्धा तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. आणि लवकरच त्या समितीची स्थापन होईल आणि ती समिती निर्णय घेईल की, केंद्र सरकारला RBI’च्या राखीव निधीतून किती पैसा देणे शक्य आहे. परंतु अनेक अर्थ तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार या समितीने कोणताही निर्णय घेऊ दे, पण RBIच्या राखीव निधीतून केंद्राला पैसे देणे जवळपास निश्चित झाले आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या