बंगळूर : इस्रोच मिशन चांद्रयान हे सर्वांनाच परिचित आहे. पण एखादया कंपनी ने त्यांची खासगी मिशन चांद्रयान योजना आखली असेल हे अगदी आश्चर्य कारक वाटू शकते, पण हे सत्य आहे. होय येत्या मार्चमध्ये बंगळूर स्थित एक कंपनी भारतातील पहिली खासगी चांद्रयान गगनभरारी घेणार आहे.
हे खासगी यानाचं जीवनमान २४ दिवसाचं असणार आहे. त्या यानाची एकूण उंची २ मीटर आणि वजन ६०० किलो आहे. या मिशन मागचं मुख्य उद्धिष्ट चंद्रावरची अधिक माहिती गोळा करणं आणि हाय डेफिनेशन छायाचित्र टिपणे हा खासगी चांद्रयान मोहिमे मागचा मुख्य उद्देश्य आहे. बंगळूर स्थित अंतराळ विज्ञान कंपनी इंडसचा हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. इंडस कंपनीने या मिशन साठी इस्रोच्या काही निवृत्त शास्त्रज्ञांनची ही खूप मदत घेतली आहे.
