2 May 2025 3:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER
x

कलम ३७१ ला धक्का लावणार नाही: अमित शहा

Assam, Article 371, Special Status, NRC, Amit Shah

नवी दिल्ली: आसाममधील वैध नागरिकांची नॅशनल रजिस्टर फॉर सिटिझनशिपची (एनआरसी) प्रक्रिया ठरल्या वेळेनुसार पूर्ण झाल्याचे अमित शाह यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘एनआरसीवर अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पण, मी स्पष्ट शब्दांत सांगतो की एकाही अवैध नागरिकाला सरकार देशात राहून देणार नाही. हे आमचे वचन आहे.’

यावेळी अमित शाह यांनी आसामला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७१ वरही भाष्य केले. कलम ३७१ ला संविधानात विशेष स्थान आहे आणि भाजपा सरकार त्याचा सन्मान करते. त्यामुळे यामध्ये कोणतेही बदल केले जाणार नाहीत, असे अमित शाह यांनी सांगितले. ईशान्येतील राज्यांसाठीचा घटनेने दिलेला विशेष अधिकार कलम ३७१ला कोणत्याही परिस्थितीत हात लावला जाणार नाही, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले. गुवहाटी येथे ईशान्य राज्यासाठी आयोजित 68व्या परिषदेत ते बोलत होते. कलम ३७० ही तात्पुरती तरतूद होती. तर कलम ३७१ मधील विशेष तरतूदी या वेगळ्या आहेत. या दोन्ही गोष्टींमध्ये बरेच अंतर आहे, असे शहा म्हणाले.

जम्मू-काश्मीरसाठीचे कलम ३७१मधील अधिकतर तरतूदी हटवल्यानंतर ईशान्येकडील नागरिकांना खोटी आणि भटकावणारी माहिती देण्याचा प्रयत्न केला गेला. पण केंद्र सरकार कधीही ३७१ कलम हटवणार नाही. यासंदर्भात मी संसदेत देखील स्पष्ट केल्याचे शहा यांनी सांगितले.आज ईशान्येकडील आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमोर मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की, केंद्र सरकार कलम ३७१ टच देखील करणार नाही.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या