मुंबई: ज्येष्ठ पत्रकार आणि अग्रलेखांचे बादशाह म्हणून ओळखले नीळकंठ खाडिलकर यांचं आज पहाटे अल्पशा आजारानं निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रूग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांचं पार्थिव दुपारी १२ ते २ या दरम्यान नवाकाळच्या गिरगाव येथील कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

नीळकंठ खाडिलकर नवाकाळचे अनेक वर्ष संपादक होते. या काळात महत्त्वाच्या घडामोडींवर त्यांनी अग्रलेखांमधून भाष्य केलं. खाडिलकर हे एक उत्तम मुलाखतकार होते. त्यांनी घेतलेल्या गोळवलकर गुरुजी आणि सत्य साईबाबा यांच्या मुलाखती अतिशय गाजल्या. वर्तमान सामाजिक-राजकीय परिस्थितीचे अभ्यासू आणि विवेकी विवेचन वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. नीलकंठ खाडिलकर यांनी आपल्या तर्कशुद्ध आणि संदर्भासहित लेखनातून इतिहासाची मांडणी करत वाचकांचे प्रबोधन केले आणि त्याचवेळी वर्तमान सामाजिक-राजकीय परिस्थितीचे अभ्यासू व विवेकी विवेचनही वाचकांपर्यंत पोहचविले.

संपूर्ण अर्थशास्त्र हा विषय घेऊन ते बी.ए. ऑनर्स झाले होते. ज्येष्ठ नाटककार आणि ‘केसरी’ चे माजी संपादक कृ. प्र. खाडिलकर यांचे ते नातू होते. खाडिलकर हे एक उत्तम मुलाखतकार होते. त्यांनी घेतलेल्या अनके मुलाखती अतिशय गाजल्या.

अग्रलेखांचा ‘काळ’ हरपला! ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचं निधन