नवी दिल्ली, २८ सप्टेंबर | तीन कृषी कायद्यांच्या विरोधात सोमवारी शेतकऱ्यांनी भारत बंद पुकारला होता. सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेपर्यंत झालेल्या बंद दरम्यान अनेक राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग रोखण्यात आले होते. अनेक मार्ग वळवावे लागले. रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला. दिल्लीहून सुटणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये बंदचा परिणाम अधिक दिसून आला. दिल्ली-गाझीपूर सीमा देखील 10 तासांनंतर उघडण्यात आली. भारतीय किसान युनियनने आंदोलनाचे नैतृत्व (Rakesh Tikait) केले.

Farmer leader Rakesh Tikait said the government’s next target could be media houses and called on their stakeholders to join the months long agitation against three central Agri laws :

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत म्हणाले की, भारत बंद संपूर्णपणे यशस्वी झाला. आता संयुक्त किसान मोर्चा पुढील रणनीती ठरवेल. दरम्यान, काँग्रेस, राजद, आम आदमी पार्टी, बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी आणि डाव्या पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिला होता. या बंदला अखिल भारतीय बँक अधिकारी परिसंघ (AIBOC) कडूनही पाठिंबा मिळाला. त्याचबरोबर सरकारने शेतकऱ्यांना आंदोलन सोडून संवादाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, आज शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधताना प्रसार माध्यमांना देखील केंद्र सरकारच्या कुहेतूवरून एक आव्हान केलं. राकेश टिकैत म्हणाले की, “भारतीय प्रसार माध्यमं केंद्र सरकारचं पुढचं लक्ष आहेत. त्यामुळे माध्यमांनी देखील शेतकऱ्यांसोबत यावं अन्यथा माध्यमाचंही प्रचंड नुकसान होईल असं आव्हान केलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Media houses is the next target of government join us to save yourselves said Farm leader Rakesh Tikait.

Rakesh Tikait | सरकारचं पुढचं लक्ष प्रसार माध्यमं आहेत | माध्यमांनीही शेतकऱ्यांच्या आंदोलनासोबत यावं – राकेश टिकैत