24 March 2025 9:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension Money | खाजगी कर्मचाऱ्यांना अपडेट, 25000 पगार असणाऱ्यांना EPF चे 59,41,115 रुपये आणि रु.6000 पेन्शन मिळणार Sandeep Deshpande | मनसेच्या मुंबई शहराध्यक्षपदी नेमणूक झालेले संदीप देशपांडे पक्षाला उभारणी देणार का? त्यांच्या कार्याचा आढावा Raj Thackeray | विधानसभेत लोकप्रतिनिधी कमी आणि 'खोके भाई'च जास्त दिसतात, स्वतःच्या फायद्यासाठी काम करतात Sushant Singh Rajput | CBI क्लोजर रिपोर्टमध्ये बोगस नेत्यांचंही भांडं फुटलं, ना विष प्रयोग, ना गळा दाबला, ती आत्महत्याच होती Rattan Power Share Price | तुफानी तेजीमुळे 10 रुपयाच्या शेअर फोकसमध्ये, पुन्हा मल्टिबॅगर परतावा मिळेल? - NSE: RTNPOWER SBI Special FD Scheme | सर्वाधिक परतावा देणाऱ्या SBI स्पेशल FD योजना अनेकांना माहित नाहीत, इथे पैसे गुंतवा Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 24 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

२०१३ मधील चीनबद्दलच्या त्या ट्विटमुळे नरेंद्र मोदी अडचणीत..पहा काय होतं ट्विट

PM Narendra Modi, Congress, India China, Gujarat CM Narendra Modi, Ladakha

नवी दिल्ली, ७ जुलै : गलवान खोऱ्यात चीनने घुसखोरी केली असल्याचे समोर आल्यानंतर तणाव वाढला होता. त्यातच १५ जून रोजी भारत-चीनच्या जवानांमध्ये हिंसक संघर्ष झाला. त्यात २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्याच्या परिणामी दोन्ही देशांमधील तणावात आणखी वाढ झाली. तणाव कमी करण्याच्या उद्देशाने आता पर्यंत दोन्ही देशांदरम्यान लष्करी अधिकारी पातळीवर अनेक बैठका झाल्या आहेत.

तर, दुसरीकडे चीन सरकारच्या मालकीचे ‘ग्लोबल टाइम्स’ने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी झाला असल्याचे म्हटले आहे. आता दोन्ही बाजूनी म्हणजे भारत आणि चीनचे सैन्यांनी फ्रंट बॉर्डरहून सैन्य कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही देशांमध्ये ३० जून रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार हे सैन्य माघारी घेण्यात आले आहेत. कमांडर पातळीवरील बैठकीत दोन्ही देशांनी तणाव कमी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याआधारे ही कृती करण्यात येत आहे. भारताने चीनसोबत शांतेचे धोरण ठेवले पाहिजे आणि आपले सैन्य कमी करायला हवे, असे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.

मात्र यावरूनच काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरलं आहे. सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या जुन्या वाक्याची आठवण करून दिली. सुरजेवालांनी विचारले, ‘ आदरणीय पंतप्रधानजी, तुम्हाला तुमचे शब्द आठवतात का? काय तुमच्या शब्दाला काही महत्त्व आहे का? आता तुम्ही सांगू शकला का की आमच्याच भूमीवरून आमचेच सैनिक मागे का हटत आहेत?’. देशाला उत्तर हवे आहे, असेही सुरजेवाला यांनी पुढे लिहिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०१३ मध्ये हे ट्विट केले होते. त्यावेळी मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते, ‘चीन आपल्या सैनिकांना हटवत आहे, मात्र भारतीय सैनिक आपल्या क्षेत्रातून मागे का हटत आहेत, याचे मला आश्चर्य वाटत आहे? आम्ही का हटत आहोत?’. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा हे ट्विट केले तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी ते लोकसभा निवडणूक २०१४ साठी भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील अशी जोरदार चर्चा होती. याच कारणामुळे राष्ट्रीय राजकारणाच्या मुद्द्यावर सक्रिय होते.

 

News English Summary: Surjewala reminded Prime Minister Narendra Modi of his old phrase. Surjewala asked, ‘Respected Prime Minister, do you remember your words? Does your word matter? Now can you tell us why our soldiers are retreating from our land? ‘. The country wants an answer, Surjewala further wrote.

News English Title: India China clash congress reminds PM Narendra Modi his comments on troops withdrawal with his old tweet of 2013 when Modi was CM of Gujarat News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या