महत्वाच्या बातम्या
-
अनोळखी ई-मेल टाळा, उद्या भारतासह अनेक देशात मोठ्या सायबर अटॅकची शक्यता
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी देखील आता चीनवर अप्रत्यक्षपणे आरोप केला आहे. ऑस्ट्रेलियाचे सरकार आणि देशातील काही खाजगी संस्था एका प्रभावी देशाच्या सायबर अटॅकच्या रडारवर होता, असं स्कॉट मॉरिसन यांनी सांगतिले आहे. ऑस्ट्रेलियन सायबर तज्ञांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर चीनच्या या धोक्यापासून सावध राहण्याचा सल्ला देखील स्कॉट मॉरिसन यांनी दिला आहे. याआधी देखील सायबर हल्ल्यांचं प्रमाण वाढत असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण मंत्र्यांनीही दिली होती.
5 वर्षांपूर्वी -
ग्लेनमार्क फार्माने कोरोना उपचारासाठी लाँच केले औषध...DCGI'ची मान्यता
कोविड -१९ वरील उपचारासाठी फॅबीफ्लू (FabiFlu) या ब्रँडखाली भारतात अँटीव्हायरल औषध फॅविपिरावीर (Favipiravir) लाँच केले आहे. हे औषध कोविड-१९ च्या रूग्णांसाठी आहे. तसेच ज्या रूग्णांमध्ये कोरोनाचे सौम्य आणि मध्यम लक्षणे असतील अशा रूग्णांच्या उपचाराकरता हे औषध वापरले जाईल, असे ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने शनिवारी सांगितले आहे.
5 वर्षांपूर्वी -
घरात घुसून मारेन सांगत सत्तेत, अन जवान शहिद होताच 'घरात कोणी घुसलेच नाही'
भारत-चीन संदर्भातील विषयही सध्या देशात चर्चेचा विषय ठरला आहे. गलवान खोऱ्यात उद्भवलेल्या संघर्षानंतर भारतात राजकीय वातावरणही तापू लागलं. अनेक विरोधकांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यातच, भारत आणि चीनदरम्यानचे संबंध ताणले गेले आहेत. लडाखमध्ये झालेल्या हिंसेत २० भारतीय जवान शहीद झाल्यामुळे राहुल गांधी यांनीही केंद्र सरकारला अनेक सवाल उपस्थित केले.
5 वर्षांपूर्वी -
मजुरांवरील संकटाला स्वतःसाठी संधी बनवू नका, विशाल ददलानीचा पंतप्रधांना टोला
ग्रामीण क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी केंद्र सरकारने ‘गरीब कल्याण रोजगार योजना’ आखली आहे. या पार्श्वभूमीवर आज शनिवारी या योजनेचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. या स्थलांतरामुळे ज्यांचं काम सुटलं आहे त्यांना रोजगार मिळणार असल्याची घोषणा मोदींनी यावेळी केली.
5 वर्षांपूर्वी -
स्थलांतरामुळे ज्यांचं काम सुटलं आहे त्यांना रोजगार मिळणार - पंतप्रधानांची घोषणा
ग्रामीण क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी केंद्र सरकारने ‘गरीब कल्याण रोजगार योजना’ आखली आहे. या पार्श्वभूमीवर आज शनिवारी या योजनेचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. या स्थलांतरामुळे ज्यांचं काम सुटलं आहे त्यांना रोजगार मिळणार असल्याची घोषणा मोदींनी यावेळी केली.
5 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींच्या प्रश्नाला अमित शहांकडून तो व्हिडिओ ट्विट करून प्रतिउत्तर
गलवान खोऱ्यातील संघर्ष सध्या देशातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. भारत चीनमध्ये लष्करी स्तरावरील चर्चा सुरू असताना गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात २० भारतीय जवानांना वीरमरण आले होते. त्यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर प्रश्नांचा वर्षावच सुरू केला होता. या सगळ्या वादात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रश्न उपस्थित करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना उत्तर दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
दाट वस्तीतील रुग्णांना होम आयसोलेशनसाठी परवानगी देऊ नये - केंद्राची सूचना
केंद्रिय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सर्व राज्यांना पत्र पाठवून कोरोना रुग्णांच्या होम आयसोलेशनबाबत महत्वाच्या नव्या सूचना जारी केल्या आहेत. त्यामध्ये दाट वस्तीतील अशा रुग्णांना होम आयसोलेशनसाठी परवानगी देऊ नये असे म्हटले आहे. दरम्यान, खास दिल्लीच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून अशा रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यापेक्षा रुग्णालय किंवा सरकारी आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारताने पाकिस्तानचे हेरगिरी करणारे ड्रोन कठुआ येथे पाडले
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानी गुप्तहेर ड्रोन पडले. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा खुरापती काढण्यासाठी या ड्रोनचा वापर करण्यात येत होता. जम्मू-काश्मीरच्या सीमेवर हे ड्रोन गोळाबार करुन पाडण्यात यश आले आहे. रथुआ गावात फॉरवर्ड पोस्टमध्ये ड्रोन पाडण्यात यश आले.
5 वर्षांपूर्वी -
जर जमीन चीनची होती, तर आपल्या जवानांना का मारण्यात आलं? - राहुल गांधीं
भारताची एकही इंच जमीन कोणाच्याही ताब्यात नाही तसेच कोणीही भारतीय हद्दीत घुसखोरी केलेली नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीत स्पष्ट केले. यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर गंभीर आरोप केले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
गेल्या २४ तासांत देशात कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक; ३७५ जणांचा मृत्यू
मागील २४ तासांत देशात कोरोनाचे तब्बल १४ हजार ५१६ नवे रुग्ण आढळेल आहेत. देशातील कोरोना रुग्णांच्या एका दिवसातील संख्यने आतापर्यांतच मोठा उच्चांक गाठल्याचे नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३ लाख ९५ हजार ४८ वर पोहचली आहे. तसंच एका दिवसात ३७५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशाचे जवान एखाद्या पर्वताप्रमाणे देशाच्या सीमांचं रक्षण करत आहेत - पंतप्रधान
भारताचे जवान एखाद्या पर्वताप्रमाणे देशाच्या सीमांचं रक्षण करत आहेत. लडाखमध्ये आपल्या देशाच्या सीमारेषेचं उल्लंघन करुन कुणीही घुसखोरी केलेली नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपले लष्कर, जवान हे देशाची रक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. राष्ट्रहित हेच आपल्या सगळ्याचं लक्ष आहे असंही मोदींनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
TikTok देशभक्त, चिनी कंपनीच्या लेटेस्ट मोबाइलला तुफान प्रतिसाद
भारत-चीन दरम्यान सीमेवर सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मागणी विविध स्तरावर होत आहे. सोशल मीडियावर अशा आशयाचं आवाहन केलं जात आहे. पण, प्रत्यक्षात मात्र उलट चित्र दिसून येतंय. चिनी कंपनी वन प्लसच्या लेटेस्ट ‘वन प्लस 8 प्रो’ या स्मार्टफोनसाठी काल (दि.18) भारतात सेल आयोजित करण्यात आला होता. अॅपल आयफोनच्या तोडीची किंमत असलेल्या या फोनला भारतीय ग्राहकांचा मात्र शानदार प्रतिसाद मिळाला आणि हा सेल सुरू झाल्यानंतर हा फोन काही मिनिटांमध्येच ‘सोल्ड आउट’ झाल्याचं समोर आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाची लागण झालेला आमदार मतदानासाठी विधानसभेत प्रकटला आणि...
राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी आज अनेक राज्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. पण Coronavirus च्या पार्श्वभूमीवर चोख तयारी करूनच मतदान सुरू आहे. मध्य प्रदेशातले काँग्रेसच्या एका आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. Covid-19 पॉझिटिव्ह असतानाही ते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले.
5 वर्षांपूर्वी -
मिराज, सुखोई आणि अपाचे हेलिकॉप्टरसह वायुसेना लडाख क्षेत्रासाठी सज्ज
चीनसोबतच्या तणावाच्यार पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलानेही जोरदार तयारी सुरू केली आहे. हवाईदल प्रमुख आरकेएस भदौरिया (RKS Bhadauria) यांनी लडाख, लेह आणि श्रीनगरचा दोन दिवस दौरा केला आणि तयारीचा आढावा घेतला. खबरदारीचा उपाय म्हणून भारताने लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्स सीमेजवळच्या तळांवर तैनात केले असून त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
ठाकरे सरकारची नाचक्की, रुग्णांच्या कोव्हिड टेस्ट रिपोर्टबाबतच्या त्या निर्णयाला स्थगिती
लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर महाराष्ट्रासह देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाबाधितांमध्ये दिवसेंदिवस होणारी वाढ चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढलेली असतानाच सुप्रीम कोर्टाने आता राज्य सरकारला दणका दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
केंद्राच्या हलगर्जीपणाचा परिणाम आपल्या जवानांना भोगावा लागला आहे - राहुल गांधी
गलवान खोऱ्यात चीनकडून हिंसक झडप घालण्यात आली. यात भारताचे २० जवान शहीद झाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी तीन मुद्दे उपस्थित केले आहेत. राहुल यांनी लिहिले, “आता हे सिद्ध झाले आहे, की चीनने गलवानमध्ये जो हल्ला केला तो आधीपासूनच नोयोजित होता. भारत सरकार यावेळी झोप घेत होते आणि समस्यांकडे दुर्लक्ष करत होते. या शिवाय राहुल गांधींनी लिहिले आहे, सरकारच्या हलगर्जीपणाचा परिणाम आपल्या जवानांना भोगावा लागला आहे.
5 वर्षांपूर्वी -
...तर राज्यसभेतही भाजपच्या नेतृत्वाखालील NDA बहुमताच्या जवळ असेल?
देशाच्या 8 राज्यांतील राज्यसभेच्या 19 जागांसाठी आज निवडणूक होणार आहे. यात आंध्र प्रदेश आणि गुजरातमधील प्रत्येकी 4, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील प्रत्येकी 3, झारखंडमधील 2 आणि मणीपूर, मिझोरम व मेघालय येथील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. यापैकी मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या तीन राज्यात काँग्रेस आणि भाजपामध्ये जोरदार लढाई होणार आहे. या सर्व 19 जागांसाठी मतमोजणी होऊन विजयी जागांचे चित्र आज सायंकाळीच स्पष्ट होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशात २४ तासांत १३,५८६ नवे रुग्ण, एकूण संख्या लवकरच ४ लाखाचा टप्पा गाठणार
देशभरात दररोज दहा हजारांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची भर पडत असल्याने चिंता प्रचंड वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या लवकरच ४ लाखाचा टप्पा गाठेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या चोवीस तासांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ झाली असून १३ हजार ५८६ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशभरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ८० हजार ५३२वर पोहोचली आहे. तर २४ तासांत ३३६ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने देशातील कोरोनाबळींचा आकडा १२ हजार ५७३ इतका झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
त्या करारामुळे जवानांनी लडाखमध्ये शस्त्रांचा वापर केला नाही - केंद्राचं उत्तर
पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. आपल्या जवानांना विनाशस्त्र शहीद होण्यासाठी का पाठवले होते ? अशी विचारणाही त्यांनी केली आहे. राहुल गांधी यांच्या प्रश्नाचं उत्तर केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मणिपूरमध्ये काँग्रेसचा भाजपला धक्का, राज्य सरकार कोसळणार
आठ महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात रंगलेलं सत्तानाट्य आणि रात्रीत बदललेला राजकारणाचा खेळ अजून जनता विसरलेली नाही. आता त्याची पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे ईशान्येकडच्या राज्याने. मणिपूरमधल्या भाजप सरकारला पुन्हा एकदा रात्रीतच धक्का बसला आहे, तेही उपमुख्यमंत्र्यांनीच राजीनामा दिल्यामुळे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS
-
Jio Finance Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मजबूत कमाई करा, मार्केट तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: JIOFIN
-
AWL Share Price | जबरदस्त अपसाईड तेजीचे संकेत; अदानी विल्मर शेअरला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: AWL
-
Rattan Power Share Price | 10 रुपयांच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले; अपसाईड टार्गेट - NSE: RTNPOWER