मुंबई: राज्यात सत्तास्थापनेचा तिढा लवकर सुटण्याची चिन्हे दिसत आहे. सरकार बनविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र येत आहेत हे स्पष्ट झालं आहे. या तीन पक्षांमध्ये किमान समान कार्यक्रम ठरविण्यासाठी चर्चा सुरु आहे. मात्र राज्यात सुरु असणाऱ्या राष्ट्रपती राजवटीमुळे ओला दुष्काळात अडकलेल्या शेतकऱ्यांना मदत करावी या मागणीसाठी महाशिवआघाडीचे नेते राज्यपालांना भेटणार आहेत.

मात्र, भाजपाला याची चुणूक लागताच देवेंद्र फडणवीस लगबगीने राज्यपालाच्या भेटीला गेले आहेत. तत्पूर्वी अवकाळी पावसानं पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज राजभवनावर धडक देण्याचा प्रयत्न केला. अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मात्र, राजभवनावर जाण्याआधीच हा मोर्चा पोलिसांनी अडवला. कडू यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. त्याचवेळी, आमदार बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या वाहनांसमोर ठिय्या देत आंदोलन सुरू केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. या आंदोलनामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महाराष्ट्रात सत्ता जाताच शेतकऱ्यांचा कळवळा आलेल्या भाजपाची शेतकऱ्यांच्या बाबतीतील दुतोंडी भूमिका समोर आली आहे. कारण उत्तर प्रदेशातील उन्नाव’मध्ये गंगा निर्माण प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांकडून जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी आंदोलन करताच, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांविरुद्ध भाजप सरकारकडून दंडुकेशाहीचा वापर असं वापर करत आहे.

आम्हाला ट्विटरवर फॉलो करा

VIDEO- भाजपकडून राज्यात शेतकऱ्यांसाठी कळवळा तर यूपीत शेतकऱ्यांवर तुफान लाठीचार्ज