महत्वाच्या बातम्या
-
घाबरू नका, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य व इतर आवश्यक सेवा सुरुच राहणार
रोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी कठोर पाऊल उचलले आहे. राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा सील करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. संचारबंदीदरम्यान रस्त्यावर ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात संचारबंदी लागू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
रोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी कठोर पाऊल उचलले आहे. राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा सील करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. संचारबंदीदरम्यान रस्त्यावर ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
लोकांना गांभीर्य नाही, आता संचारबंदी हाच उपाय..राष्ट्रवादी व मनसेची मागणी
कोरोनामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती असतानाही लोक गांभीर्याने घेत नाही आहेत. त्यामुळे संचारबंदी लागू केली पाहिजे अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. संचारबंदी हा एकमेव उपाय असल्याचंही ते म्हणाले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
अखेर MPSC परीक्षा पुढे ढकलली; पहा काय आहेत नव्या तारखा..
राज्यातील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेऊन शाळा महाविद्याल बंद ठेवण्याच्या निर्णयानंतर आता राज्यसेवेच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता होती. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तसे संकेत दिले होते. कोरोना विषाणूचे वाढत्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी राज्य सेवेच्या परीक्षा ३० मार्चनंतर घ्यावी अशी विनंती, अयोगाकडे केल्याची माहिती त्यांनी दिली होती. राज्यसेवा अयोग ही स्वायत्व संस्था आहे. त्यांच्या निर्णयामध्ये राज्य सरकार कोणाताही हस्तक्षेप करु शकत नाही. पण सरकारने त्यांच्याकडे परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती.
5 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे म्हणाले होते, जेव्हा संकट येईल तेव्हा परप्रांतीय पळ काढतील; आज तेच चित्र?
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने पुणे, मुंबई, नागपूर आणि पिंपरी-चिंचवड ही चार शहरं ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाच्या भितीमुळे परप्रांतीय गावाकडे निघाले आहेत. मुंबई, पुण्यामध्ये कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी आपल्या गावाकडे जाण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबईतील दादर, लोकमान्य टिळक टर्मिनसवर प्रवाशांची गर्दी पहायला मिळाली. तर तीच परिस्थिती पुणे रेल्वे स्थानकावर देखील आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना संशयितांची नावं जाहीर करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
मुंबईसह महाराष्ट्रात करोनाचा फैलाव वाढतच असून महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या ४७ वर पोहोचली आहे. या संकटाशी सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, लागण होण्याच्या भीतीनं काही ठिकाणी करोनाच्या ग्रस्तांना व संशयितांना बहिष्काराचा सामना करावा लागत असल्याच्या घटना पुढं आल्या आहेत. त्यामुळं खबरदारी म्हणून करोनाच्या रुग्णांची नावं जाहीर न करण्याची भूमिका सरकारनं घेतली आहे. मात्र, मनसेनं त्यास आक्षेप घेतला होता.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: सरकारी कार्यालय बंद ठेवण्याबाबत कोणताही निर्णय नाही: मुख्यमंत्री
देशातल्या वाढत्या प्रादुर्भावाचं महाराष्ट्र केंद्र बनत आहे. या जीवघेण्या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. शहरं बंद करायची का, वाहतूक व्यवस्था बंद करायची का याविषयी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. त्यामध्ये वाहतूक व्यवस्थेविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. पण सरकारी कार्यालय बंद ठेवण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही असं मुख्यमंत्री म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; राज्यातील सर्व निवडणुकांना अनिश्चित काळासाठी स्थगिती
राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. तो रोखण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित असलेल्या सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून आवश्यक पदवी नसताना व कोरोनावरील विधानावर नोटीस
चीनमधून आलेल्या प्राणघातक कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. या विषाणूने आतापर्यंत ७ हजार १५८ लोकांचा जीव घेतला आहे. तर १.८० लाखाहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. परिस्थितीची तीव्रता पाहता डब्ल्यूएचओने कोरोनाला महामारी (साथीचा रोग) जाहीर केला आहे. अमेरिकेतही कोरोना विषाणूमुळे ६० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आमदारांना वाहनासाठी बिनव्याजी ३० लाख; तेच स्टार्टअप'ला दिल्यास? सविस्तर वृत्त
आमदार निधीत एक कोटी रुपयांची वाढ, वाहनचालकांना दरमहा १५ हजारांचे वेतन यापाठोपाठ आमदारांना वाहन खरेदीकरिता ३० लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा करून उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आमदार मंडळींना खूश केले. यासाठी सरकारने दिलेली मूळ रक्कम आमदाराला फेडावी लागणार आहे. त्यावरील व्याज सरकार भरेल, अशी घोषणा करताच सभागृहात आमदारांनी त्यांचे बाके वाजवून स्वागत केले.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळे राज्यातील शाळा ३१ मार्चपर्यंत बंद
करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार आहेत. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागानं हे परिपत्रक काढलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मांडव्याच्या दिशेनं जाणारी बोट बुडाली, ९० प्रवाशांची सुटका
मुंबईतील गेटवरून शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास सुटलेल्या लाँचला अपघात झाला आहे. ही लाँच मांडवाजवळ बुडायला लागल्यानं मोठा गोंधळ उडाला होता. या लाँचमधून ९० प्रवासी प्रवास करत होते. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. पोलीस कर्मचारी आणि कोस्टगार्डच्या मदतीनं सर्व प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमित ठाकरेंचा औरंगाबाद मध्यवर्ती कार्यालयात महाराष्ट्र सैनिकांशी थेट सुसंवाद
शिवजयंतीच्या निमित्ताने राज ठाकरे आणि अमित ठाकरे औरंगाबादमध्ये आले होते. काल राज ठाकरे यांचा सकाळचा कार्यक्रम आटोपल्यावर संध्याकाळी शिव जयंतीच्या निमित्ताने अमित ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली औरंगाबादमध्ये मिरवणूक काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचं एकाप्रकारे हे जोरदार शक्तिप्रदर्शन मानले गेले. परंतु, तत्पूर्वी पोलिसांनी शिवजयंतीच्या मिरवणुकीला परवानगी नाकारली होती, मात्र त्यानंतर काही अटींवर आणि खबरदारी घेण्याचा सूचना देत परवानगी देण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
मी कोरोनाला गो म्हणालो म्हणून तो राज्यात व देशात जास्त प्रमाणात आला नाही: आठवले
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. मात्र, अशातच कोरोना व्हायरसचे देशात ७३ रुग्ण आढळून आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
औरंगाबादेत मुसलमानांविरोधात उभा राहिलो...मला अनेक ऑफर होत्या पण
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा हात सोडून शिवबंधन बांधणाऱ्या प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेतल्या ५५ जागांसाठी मार्च अखेरीस मतदान होत आहे. यात राज्यातल्या ७ जागांचा समावेश आहे. एप्रिल महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेत चुरस पाहायला मिळत होती. लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी संसदेत पाऊल ठेवण्यास इच्छुक होत्या. मात्र लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेनेतील जुनेजाणते नेतेही शर्यतीत असले तरी शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी या नावांवर शिक्कामोर्तब होणार असल्याचं वृत्त महाराष्ट्रनामा न्यूज’ने काही दिवसांपूर्वी दिलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
पक्षात जुन्या नेत्यांचीही गरज असते, पण मी त्यासाठी पक्षाकडे जाणार नाही: चंद्रकांत खैरे
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा हात सोडून शिवबंधन बांधणाऱ्या प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेतल्या ५५ जागांसाठी मार्च अखेरीस मतदान होत आहे. यात राज्यातल्या ७ जागांचा समावेश आहे. एप्रिल महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेत चुरस पाहायला मिळत होती. लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी संसदेत पाऊल ठेवण्यास इच्छुक होत्या. मात्र लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेनेतील जुनेजाणते नेतेही शर्यतीत असले तरी शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी या नावांवर शिक्कामोर्तब होणार असल्याचं वृत्त महाराष्ट्रनामा न्यूज’ने काही दिवसांपूर्वी दिलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
शिवजयंती ३६५ दिवस साजरी व्हायला हवी; आपले सर्व सण तिथीनुसारच
औरंगाबादमध्ये आज मनसेचा शिवजयंती उत्सव सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी, ३६५ दिवस शिवजयंती साजरी व्हायला हवी असं म्हटलंय. कोणताही सण तारखेनुसार नसतो. हिंदू संस्कृतीनुसार तिथीनुसार सर्व सण साजरे होत असतात. शिवजयंती हा एक सण आहे. त्यामुळे हा सणही तिथीनुसारच साजरा केला जावा, असं राज ठाकरे म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
आता वाजले की बारा; भाजपने खडसेंच बंड तात्पुरतं शमवलं अन राज्यसभेला पुन्हा गुंडाळलं?
महाराष्ट्रातील भाजपच्या वाट्याला येणाऱ्या राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून गुरुवारी त्याने नाव जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रात राज्यसभेच्या सात जागांसाठी येत्या २६ मार्चला निवडणूक होणार आहे. विधानसभेतील पक्षीय बलानुसार भाजपच्या वाट्याला ३ जागा येत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
शिवभोजन योजनेतील हॉटेलचालकांची बिलं लटकली; सरकारी काम आणि....
महाविकास आघाडी सरकारकडून गोरगरिब जनतेसाठी २६ जानेवारीपासून शिवभोजन योजना सुरू करण्यात आली होती. यामध्ये जनतेला १० रूपयांमध्ये पोटभर जेवण देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात दिली होती. सुरूवातीच्या टप्प्यात शिवभोजन योजनेची ५० केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर राज्यात टप्प्याटप्प्यानं आणखी केंद्रे वाढवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणादरम्यान निरनिराळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद: रॅलीला परवानगी नाकारली; पण उद्या शिवजयंती साजरी होणारच: राज ठाकरे
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने आता महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ठिकाणच्या यात्रा आणि सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यातच आता औरंगाबाद महानगर पालिकेची निवडणूक पुढे ढकण्याची मागणी करण्यात आली आहे. खुद्द महापौरांनीच ही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. येत्या एप्रिल महिन्यात औरंगाबाद महापालिकेची मुदत संपणार आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN