महत्वाच्या बातम्या
-
PMC बँक: बँकेचं संचालक मंडळ आणि त्याचं भाजप कनेक्शन समोर आलं
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत. २३ सप्टेंबर पासून हे निर्बंध लागू झाले. बँकेची सद्यस्थिती पाहून नागरिकांच्या हितासाठी बँकेवर निर्बंध आणल्याचं रिझर्व्ह बँकेने आपल्या आदेशात नमूद केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
आधी पुण्यातील पूरस्थितीकडे लक्ष द्या; जागावाटप बाजूला राहू द्या: छगन भुजबळ
मागील ३ दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी रात्री शहरात झालेल्या पावसाने उच्चांक गाठला. रात्री 8 च्या दरम्यान सुरू झालेल्या पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले. शहरातील सर्वच भागात रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. त्यात अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने अनेक लोक वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शहरात अतिवृष्टी होत असल्याने तसेच आपत्कालीन परिस्तिथी निर्माण झाली असल्याने पुणे जिह्यातील 5 तालुक्यांच्या शाळांना आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
युतीचा निर्णय काही असो; तिकीट कापलं जाण्याच्या भीतीने सेना-भाजप इच्छुक मनसेच्या संपर्कात
एकेकाळी राज्यात शिवसेना मोठा भाऊ होता. त्यामुळे १७०-१८०च्या घरात जागा शिवसेना लढवत होती. आता मात्र, चित्र बरोबर उलट झाल्यामुळे शिवसेनेला अपेक्षित असलेल्या जागा भाजप सोडायला तयार नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये जागांवरून चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, तरीदेखील त्यावर तोडगा निघू शकलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप शिवसेनेला १२३ जागा सोडायला तयार आहे, मात्र शिवसेनेला त्याहून जास्त जागा हव्या आहेत. त्यामुळे ही दिरंगाई होत असून आज १२ वाजता अमित शहांसोबत मुख्यमंत्र्यांच्या होणाऱ्या बैठकीमध्ये यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
विधानसभा: शिवसेनेच्या या मंत्र्यांचा सांगली पदाधिकारी मेळाव्यात पुन्हा स्वबळाचा नारा
युतीचे गाडे अडलेले असतानाच, बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे बुधवारी नवी मुंबईत एकत्र आले होते. यामध्ये दोघांनीही ‘पुढील सरकार युतीचेच’ असा विश्वास व्यक्त केल्याने युतीचे संकेत मिळत आहेत. जागांचा तिढा सोडवण्यासाठी बुधवारी रात्री मुख्यमंत्री व उद्धव यांची भेट निश्चित झाली होती. त्यानंतरच मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीतील नेत्यांची भेट घेण्यासाठी रवाना होणार आहेत. ‘बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री ‘मातोश्री’वर येऊ शकतात अथवा उद्धव ठाकरे ‘वर्षा’वर जाऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू शकतात’, अशी माहिती शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने प्रसार माध्यमांना दिली होती.
5 वर्षांपूर्वी -
घोटाळा २५ हजार कोटींचा मग बँकेचा नफा ३०० कोटींपर्यंत कसा? - अजित पवार
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत (एमएससी बँक) कर्जांचे वितरण करताना २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप देशमुख, ईश्वरलाल जैन, जयंत पाटील, शिवाजीराव नलावडे, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, राजेंद्र शिंगणे, मदन पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षांसह ७० जणांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी गुन्हा दाखल केला. या सर्वांवर पैशांची अफरातफर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा गुन्हा दाखल झाल्याने शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
दिल्लीच्या तख्तापुढं झुकणं आम्हाला माहित नाही', 'ईडी'चा पाहुणचार स्वीकारणार
शिखर बँक घोटाळाप्रकरणी ईडीनं माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. ईडीच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करणार आहे. निवडणूक प्रचारासाठी मुंबईच्या बाहेर असेल, त्यामुळं मी स्वतः २७ सप्टेंबरला मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजर होईल. त्यांचा पाहुणचार स्वीकारण्याची तयारी आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
पुणे: राष्ट्रवादीची पोलीस चौकीसमोरच 'देवेंद्र-नरेंद्र चोर है' घोषणाबाजी
महाराष्ट्र राज्य शिखर बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवारांसह एकूण ७० नेत्यांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. ईडीने केलेल्या कारवाईविरोधात बारामतीकरांनी बारामती बंदची हाक दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
PMC बँक: महाराष्ट्र सैनिकांचे रम्यालाच डोस; आम्ही बुवा ऍक्सिस बँकेत ठेवतो; वाहिनीसाहेब आहेत ना
महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे समजताच भारतीय जनता पक्षाच्या रम्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भयंकर चिंता सतावत असल्याचं दिसत आहे. राज्यात आणि देशात महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांनी तोंड वर काढलेलं असताना रम्या सरकारला डोस देण्याऐवजी राज ठाकरे यांच्या नावाचाच जाप करत असल्याचं दिसत आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिखर बँक प्रकरण: शरद पवारांवर गुन्हा, आज बारामती बंदची हाक
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत (एमएससी बँक) कर्जांचे वितरण करताना २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप देशमुख, ईश्वरलाल जैन, जयंत पाटील, शिवाजीराव नलावडे, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, राजेंद्र शिंगणे, मदन पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षांसह ७० जणांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी गुन्हा दाखल केला. या सर्वांवर पैशांची अफरातफर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा गुन्हा दाखल झाल्याने शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
हडपसरची जागा मनसे खेचून आणणार असल्याने भाजप हडपसर सेनेला देणार?
शिवसेना भाजप युतीच्या जागावाटपाचा तिढा अजून संपलेला नसतात काही जागांच्या अदलाबदलीची कारणं त्यासाठी पुढे करण्यात आली आहेत. पुण्यात भाजप सेनेला ठेंगा देण्यात तयारीत असून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रावर भाजपने लक्ष केंद्रित केलं आहे. मात्र शिवसेना पुण्यात अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपडत असल्याने भाजप हाती न येणाऱ्या पुण्यातील जागा शिवसेनेला देण्याच्या तयारीत आहे. भाजप आणि शिवसेनेचे युतीचे ठरले असून मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील काही जागांची अदलाबदल करण्यात येणार आहे. या बदलाचा फटका भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांना बसण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपकडून वंचित पक्ष फोडण्यास सुरुवात; गोपीचंद पडळकर भाजपात जाणार
गोपीचंद पडळकर यांनी भाजप प्रवेश करण्याचा निर्णय़ घेतला असून येत्या दोन दिवसांत ते भाजपमध्ये जाणार आहेत. प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या नावाबद्दल विविध तर्क लढविण्यात येतात. मात्र विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना पडळकर काय करणार याबद्दल उत्सुकता होती. तो निर्णय़ त्यांनी आता घेतला आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघातून ते निवडणूक लढविणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सातारा लोकसभा पोटनिवडणुक विधानसभेसोबत अचानक जाहीर झाल्याने चर्चा रंगली
देशातील अनेक ठिकाणी पोटनिवडणुका होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. परंतु सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा मात्र केली नव्हती. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसोबतच ही पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे या जागेसाठीही २१ ऑक्टोबरला मतदान होईल आणि २४ ऑक्टोबरला मतमोजणी होईल.
5 वर्षांपूर्वी -
स्वबळावर की मिळेल त्यात समाधान मानायचं? शिवसेनेचं काहीच ठरेना: सविस्तर
विधानसभेला निम्म्या निम्म्या जागा वाटून घेण्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत जाहीर केल्यानंतरही प्रत्यक्षात कमी जागा घेत भाजपसोबत युती करायची की नाही, अशा द्विधा मनस्थितीत शिवसेना नेतृत्व अडकल्याचे कळते. शिवसेनेला १२० जागा देऊ पाहणाऱ्या भाजपचे गाडे काही केल्या पुढे सरकत नसल्याने कमी जागा घेऊन युती करायची की कसे याबाबत शिवसेनेच्या आमदार, नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशीच शिवसेना नेतृत्व संपर्क साधणार असल्याचे कळते.
5 वर्षांपूर्वी -
'१९९०-१८३ जागा ते २०१९-१२६' जागा! भाजपसोबत सेनेच्या अधोगतीचा प्रवास: सविस्तर
नव्वदच्या दशकात जन्माला आलेली भाजप-शिवसेना युतीचा इतिहास सर्वात मोठा आहे. मात्र तेव्हा पासूनच युतीचा जागा वाटपाचा प्रवास पाहिल्यास शिवसेना अस्ताच्या दिशेने स्वतःहूनच जाते आहे का असा प्रश्न आकडेवारी सिद्ध करत आहे. विशेष करून उद्धव ठाकरे यांचं राजकारणातील सक्रिय होणं आणि त्यानंतर शिवसेनेच्या युतीतील जागांचा कानोसा घेतल्यास उद्धव ठाकरे यांच्या नैर्तृत्वात शिवसेना वाढते आहे की घटते आहे असा प्रश्न आकडेवारी उपस्थित करत आहे.
5 वर्षांपूर्वी -
कॉर्पोरेट टॅक्स कमी केल्याने उद्योगांना फायदा: मुख्यमंत्री
जागतिक मंदीचे परिणाम देशावर होऊ नये यासाठी भारताच्या अर्थव्यवस्थेत बदल करून कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधिची घोषणा खुद्द देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. त्यामुळे देशात बाहेरील कंपन्यांना देशात गुंतवणूक करण्यासाठी सवलत मिळणार आहे. तसेच अंतरराष्ट्रीय ट्रेड वॉरचा फायदा भारताला मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राला ही मोठा फायदा होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्राची निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यांवर लढण्याच्या भाजपच्या रणनीतीवर उद्धव यांची टीका
‘राज्यात पूर्ण बहुमतानं भाजपचंच सरकार येणार, हे भाजपाध्यक्ष अमित शहा यांचं वक्तव्य शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चांगलंच खटकलं आहे. शहांच्या या वक्तव्याचा उद्धव यांनी अप्रत्यक्षपणे समाचार घेतला आहे. ‘महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका ही केवळ औपचारिकताच उरली आहे. लोकांनी फक्त बटण दाबायचे आहे, दुसरे काय?,’ असं उद्धव यांनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील सर्व प्रश्न संपले; भाजपसारखा आत्मविश्वास कोणाकडेच नाही: उद्धव ठाकरेंचा टोला
‘राज्यात पूर्ण बहुमतानं भाजपचंच सरकार येणार, हे भाजपाध्यक्ष अमित शहा यांचं वक्तव्य शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चांगलंच खटकलं आहे. शहांच्या या वक्तव्याचा उद्धव यांनी अप्रत्यक्षपणे समाचार घेतला आहे. ‘महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका ही केवळ औपचारिकताच उरली आहे. लोकांनी फक्त बटण दाबायचे आहे, दुसरे काय?,’ असं उद्धव यांनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
वृत्त वाहिन्यांवरील ओपिनियन पोल विरुद्ध मतदाराचा रोष का वाढतो आहे? सविस्तर
लोकसभा निवडणुकीपूर्वी कोब्रा पोस्टने ‘ऑपरेशन १३६’ राबवून अनेक टीव्ही वृत्तवाहिन्यांची ऑन रेकॉर्ड पोलोखोल केल्याचं प्रकरण जास्त जुनं नाही. प्रख्यात वृत्तवाहिन्या देखील कसे भरमसाठ पैसे घेऊन सत्ताधाऱ्यांसाठी पोषक आणि विरोधकांना राजकीय दृष्ट्या संपवण्यासाठी निरनिराळ्या विषयातून अभियानं राबवतात ते उघड केलं होतं. दरम्यान, मागील काही वर्षांपासून ओपिनियन पोलने देखील लोकशाहीला घातक असा प्रकार सुरु केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात बहुमताने भाजप सरकार येणार: अमित शाह
भाजप-शिवसेना युतीवर भाष्य करणे टाळत, ‘राज्यात पूर्ण बहुमताने पुन्हा भारतीय जनता पक्षाचेच सरकार येणार’, असे सांगत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होणार नसल्याचे संकेत दिले. या बरोबरच ‘देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील’, अशी घोषणा करत शहा यांनी पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. गोरेगाव येथील नेस्को सभागृहात आयोजित सभेद्वारे शहा यांनी राज्यातील भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ केला. त्यावेळी त्यांनी कलम ३७० वर पक्ष आणि केंद्र सरकारची भूमिका मांडली.
5 वर्षांपूर्वी -
राणे म्हणतात वाघाची शेळी-मेंढी झाली; तर धनंजय मुंडे म्हणतात ही कुत्र्यासारखी अवस्था
विधानसभा निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे राजकीत आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झडताना दिसत आहे. आता तर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. राजकारणात शिवसेनेची अवस्था ही कुत्र्या सारखी झाली आहे, एक गोष्ट सांगून धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा
- IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या
- 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार?
- Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
- Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली
- Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या
- DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा
- Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
- Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या