29 March 2024 1:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

राज ठाकरे म्हणाले होते, जेव्हा संकट येईल तेव्हा परप्रांतीय पळ काढतील; आज तेच चित्र?

Corona Crisis, Migrants Leaving Maharashtra, Raj Thackeray

मुंबई, २१ मार्च: कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने पुणे, मुंबई, नागपूर आणि पिंपरी-चिंचवड ही चार शहरं ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाच्या भितीमुळे परप्रांतीय गावाकडे निघाले आहेत. मुंबई, पुण्यामध्ये कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी आपल्या गावाकडे जाण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबईतील दादर, लोकमान्य टिळक टर्मिनसवर प्रवाशांची गर्दी पहायला मिळाली. तर तीच परिस्थिती पुणे रेल्वे स्थानकावर देखील आहे.

मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामानिमित्त आलेले आहेत. या परप्रांतियांना देखील कोरोना विषाणूमुळे धडकी भरली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या भितीमुळे मुंबईमध्ये राहणाऱ्या परपांतियांना त्यांच्या कुटुंबियांनी फोन करुन घरी बोलावले आहे. कोरोनाच्या भितीमुळे ते आपल्या गावाकडे निघाले आहेत. लोकमान्य टिळक टर्निनसवर गावाकडे निघालेल्या परप्रांतियांची एकच गर्दी पहायला मिळाली. काही जण गाड्यांची वाट पाहत बसले आहेत. तर अनेकांनी तिकीट काढण्यासाठी गर्दी केली आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सरकारने गर्दी करु नका, प्रवास टाळा, घरामध्येच थांबा असे आवाहन केले आहे. तरी सुध्दा नागरिक सरकारच्या आदेशाचे पालन करताना दिसत नाही. कोरोनाच्या भितीमुळे मुंबई, पुण्यामध्ये राहणाऱ्या प्रवाशांनी रेल्वे स्थानकांवर गर्दी केली आहे. एकमेकांना धक्का मारत कसेबसे गाडीमध्ये चढून आपल्या घरी सुखरुप पोहचण्यासाठी हे प्रवासी प्रयत्न करत आहे. गाड्यांना प्रचंड गर्दी आहे बसायला जागा नाही तरी सुध्दा हे प्रवासी उभे राहून प्रवास करत आहे.

विशेष म्हणजे राज्यातील भूमिपुत्रांच्या नोकरीवरून आणि हक्कांवरून राजकारण पेटल्यास महाराष्ट्रातील नेत्यांवर आगपाखड करणारे परप्रांतीय लोंढे नोकऱ्यांवर लात मारून पळ काढताना दिसत आहेत. यावेळी त्यांना रोजगार देखील सतावत नसून प्राण वाचवणे महत्वाचे झाले आहे आणि सर्वकाही सुरळीत झाल्यावर ते पुन्हा परततील असंच दिसतं. मात्र, संसर्ग प्रवासात किंवा ते मूळचे ज्या राज्यातील आहेत तेथे देखील कोरोना लागण झाल्या आहेत याचा देखील त्यांना विसर पडला आहे. मात्र यावरून मनसे अध्यक्ष यांनी काही वर्षांपूर्वी केलेला राजकीय ठोकताळा पुन्हा सिद्ध झाला आहे असंच म्हणावं लागेल.

 

News English Summery: The government ordered the closure of four cities – Pune, Mumbai, Nagpur and Pimpri-Chinchwad – by March 31 to prevent the outbreak of the Corona virus. In such a situation, the coroners’ terrors have left for the village. Workers in Mumbai, Pune, have started moving to their village. Due to this, there was a rush of commuters at Dadar, Lokmanya Tilak Terminus in Mumbai. The same is the case at Pune Railway Station. Mumbai has a large number of traditional artisans. These species are also threatened by the corona virus. The outbreak of the corona virus is on the rise. Due to the fear, the family members in Mumbai have been called home by their families. They are on their way to their hometown because of the horror of Corona. On the Lokmanya Tilak Turninas, a single crowd of the parishioners heading towards the village was seen. Some are waiting for the trains. Many have rush to get tickets.

 

News English Title:  Story people in large numbers at Mumbai and Pune railway station wait to board their respective trains News latest Updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x