महत्वाच्या बातम्या
-
पीक कर्जमाफीचा निर्णय घाईगडबडीतला, राज्य सरकारने पुनर्विचार करावा: राजू शेट्टी
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली आहे. मात्र सरसकट कर्जमाफी करू म्हणणाऱ्या महाविकास आघाडीने शेतकऱ्यांची सरसकट फसवणूक केल्याची भावना आता शेतकरी नेते आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला
राज्यात सत्तेत असलेल्या महाविकासआघाडी सरकारच्या राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार सोमवार ३० डिसेंबर रोजी होणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसला गृहमंत्रिपद देऊ नये असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. एनसीपीला गृहमंत्रिपद दिल्यास मातोश्रीवरही कॅमेरे लागतील, असंही पाटील म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याला एनसीपीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात प्रसार माध्यामांशी बोलताना उत्तर दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
विखेंमुळे नगरमध्ये भाजपाला काहीच फायदा झाला नाही, उलट तोटाच: राम शिंदे
महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कर्जत-जामखेडच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांचा विजय झाला होता. रोहित पवार यांना १३५८२४ तर भारतीय जनता पक्षाचे राम शिंदे यांना ९२४७७ मते मिळाली. राेहित पावर यांचा तब्बल ४३,३४७ मतांनी विजय झाला आहे. त्यामुळे मंत्री राम शिंदे यांना ५ वर्ष तरी घरी बसावं लागणार हे निश्चित झालं. निवडणुकीपूर्वीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे राजकीय वारसदार म्हणून चर्चेत आलेले रोहित पवार यांनी पहिल्याचा दणक्यात भाजपच्या एका मंत्र्याला पराभूत करून घरी बसवला होतं. सध्या कर्जत-जामखेडमधील रोहित पवारांचा वाढता राजकीय आवाका पाहता राम शिंदेंना पुढच्या दुसराच मतदारसंघ शोधावा लागेल अशी शक्यता आहे. त्यामुळे राम शिंदे देखील संतापलेले दिसतात.
5 वर्षांपूर्वी -
एकाही सदस्याच्या केसालाही धक्का लागला तर शिवसेनेशी गाठ: शिवसेना खा. धैर्यशील माने
मराठी भाषिकांवरील अन्याय, अत्याचाराचा संदर्भ देत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात बेळगावसह सीमाभाग पाकिस्तानमध्ये आहे का? असा सवाल केला होता. यानंतर एका कन्नड संघटनेच्या नेत्याने मराठी भाषिकांना थेट गोळ्या घालून हत्या करण्याची भाषा केली आहे. यामुळे याचे सीमाभागात संतप्त पडसाद उमटले. वक्तव्याचा निषेध नोंदवला जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
गृहमंत्रिपद राष्ट्रवादीकडे जाण्याची भाजपाला धास्ती? सविस्तर वृत्त
प्रशासन हाताळण्याचा दीर्घ अनुभव असलेल्या राष्ट्रवादीकडे गृहमंत्रीपद जुन्याची धास्ती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याचं पाहायला मिळत आणि त्यामुळे ती भीती वेगळ्याच मार्गाने ते व्यक्त्त करण्यात गुंतले आहेत असं दिसतं. मुख्यमंत्री पदानंतर सर्वात महत्वाचं पद असलेलं गृहमंत्री पद राष्ट्रवादीकडे गेल्यास त्यावर निश्चित त्यांच्या पक्षातील अनुभवी आणि बलाढ्य नेते विराजमान होतील आणि सर्वात मोठी कोंडी होईल ती भारतीय जनता पक्षाची याची भाजपाला खात्री आहे आणि त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्याला वेगळाच राजकीय रंग देऊ पाहत असल्याचं म्हटलं जातं आहे.
5 वर्षांपूर्वी -
“वांझोट्या बाईला स्त्रित्व नसते”....संभाजी भिडेंचं स्त्रियांबद्दल संतापजनक वक्तव्य
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मंगळवारी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्याबाबत हिंदू समाज नपुंसक आहे असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांची जीभ घसरली आहे. यावेळेस त्यांनी थेट गरोदर स्त्रियांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मुलं नसणाऱ्या स्त्रियांचा आक्षेपार्ह शब्द वापरत भिडे यांनी उल्लेख केला आहे. हिंदू समाजाच्या राष्ट्रीयत्वाबद्दल बोलताना भिडे यांनी “वांझोट्या बाईला स्त्रित्व नसते,” असं वक्तव्य केलं आहे. सांगलीमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
5 वर्षांपूर्वी -
पोलीस भरती प्रक्रियेत आधी मैदानी चाचणी घ्यावी: खासदार सुप्रिया सुळे
राज्यातील पोलीस भरती प्रक्रियेसंदर्भातील गेल्या शासनाने काढलेला शासन निर्णय रद्द करून ही प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राबवण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. आता या मागणीनुसार कार्यवाही झाल्यास राज्यभरातील लाखो उमेदवारांना दिलासा मिळू शकेल.
5 वर्षांपूर्वी -
'राष्ट्रीयत्वा'वर हिंदू समाज नपुंसक होऊन जातो : संभाजी भिडे
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जेव्हा राष्ट्रीयत्वाचा मुद्दा येतो, तेव्हा हिंदू समाज नपुंसक होऊन जातो, असं ते म्हणाले. शिवाय त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचं समर्थनही केलं. मुस्लिमांकडून राष्ट्रीयत्वाची अपेक्षा करणं हा मूर्खपणा असल्याचंही ते म्हणाले. जगभरात सीएए कायदा आहे, मग भारतातच का नको? भारतीयांना जोडणाऱ्या या कायद्याबाबत विरोधक संभ्रम निर्माण करत आहेत, असा आरोपही संभाजी भिडे यांनी केला.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रनामा न्यूज इफेक्ट - पोलिसांचा पगार AXIS मधून SBI मध्ये वर्ग होणार? सविस्तर वृत्त
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून अनेक खात्यांमधील अनियमितता विषयावरून चौकशीचा फेरा सुरु होण्याची शक्यता आहे. त्यात सध्या अमृता फडणवीस यांनी शिवसेनेला “कमिशनसाठी” असा शब्द वापरत लक्ष केलं आहे. मात्र यात अमृता फडणवीस याना गोष्टीचा विसर पडल्याचं दिसत आहे. त्याला मूळ कारण होऊ शकतं ऍक्सिस बँकेविरुद्ध सुरु असलेले न्यायालयीन खटले आणि डेटा असुरक्षितता या गंभीर विषयावरून स्वतः UIDAI’ने दाखल केलेले फौजदारी तक्रारी तसेच ईडी’मार्फत चौकशी सुरु करण्याची न्यायालयात करण्यात आलेली याचिका म्हणावं लागेल. महाराष्ट्रनामा न्यूज’ने सतत या बातमीचा पाठपुरावा केला होता आणि विद्यमान महाविकास आघाडीच्या सरकारने त्यासंदर्भात हालचाली सुरु केल्या असून पोलिसांचे आणि सरकारी योजनांचे पैसे यापुढे AXIS बॅंके एवजी सरकारी बँकेत म्हणजे SBI मध्ये वर्ग होण्याच्या हालचाली सुरु झाल्याचं वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
माजी मुख्यमंत्री अन त्यांच्या पत्नींचा साधेपणा; आज पद जाताच का होतोय आकांडतांडव?
महाराष्ट्रातील अनेक मुख्यमंत्री राज्याच्या सर्वोच्च पदावर पुन्हा-पुन्हा विराजमान झाले होते आणि त्यामागे त्यांची मोठी राजकीय मेहनत देखील तितकीच महत्वाची होती. अगदी यशवंतराव चव्हाण यांच्यापासून शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख असो की युतीच्या काळातील मनोहर जोशी किंवा नारायण राणे यांची राजकीय कारकीर्द आजही तितकीच अबाधित आहे.
5 वर्षांपूर्वी -
'हम तो वो शक़्स हैं की, धुप में भी निखर आएँगे': अमृता फडणवीसांचा सेनेला टोला
त्यावर आता फडणवीस यांनी आंदोलनाचा व्हिडीओ त्यांच्या फेसबुकपेजवर शेअर करत भूमिका स्पष्ट केली आहे. दिखाओ चप्पल, फेको पत्थर, ये तो शौक़ हैं पुराना आपका, हम तो वो शक़्स हैं की धुप में भी निखर आएँगे अशा शायरीतून त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे तर You don’t lead people by hitting people over the head, that’s assault – not leadership CM Uddhav Thackeray अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शाब्दिक हल्ला चढवला आहे.लोकांच्या डोक्यावर मारून त्यांचे नेतृत्व करता येत नाही, तो हल्ला होते, नेतृत्वगुण नव्हे अशा शब्दांत आणि मुख्यमंत्री ठाकरे यांचा उल्लेख करून फडणवीस यांनी आपली पोस्ट सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
'माजी' झाल्याने आता कोणी इंडियन आयडॉलला उभं पण करणार नाही: वरूण सरदेसाई
‘माझं आडनाव गांधी आहे, सावरकर नाही’ असं विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा समाचार घेण्यासाठी फडणवीसांनी, ‘केवळ गांधी आडनाव असून चालत नाही. त्यांच्यासारखं काम करावं लागतं. त्यानुसार काम केलं तरच माणसं मोठी होतात’, अशी टीका ट्विटरद्वारे केली होती.
5 वर्षांपूर्वी -
शौर्य दिनाच्या दिवशी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना पुणे जिल्हाबंदी
हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडेंसह १६३ जणांना पुणे जिल्हाबंदी करण्यात आली आहे. कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच चार तालुक्यांमध्ये कलम १४४नुसार जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, १ जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार झाला होता. या प्रकरणी संभाजी भिडे गुरूजी व मिलींद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
अमृता फडणवीस यांच्या इंटरटेनिंग ट्विटवर सेनेचं सणसणीत प्रतिउत्तर
‘माझं आडनाव गांधी आहे, सावरकर नाही’ असं विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा समाचार घेण्यासाठी फडणवीसांनी, ‘केवळ गांधी आडनाव असून चालत नाही. त्यांच्यासारखं काम करावं लागतं. त्यानुसार काम केलं तरच माणसं मोठी होतात’, अशी टीका ट्विटरद्वारे केली होती.
5 वर्षांपूर्वी -
ठाकरे-पवार सरकारकडून शेतकऱ्यांचं २ लाखांपर्यंतचं कर्ज माफ
अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने कंबरडे मोडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत असलेले दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असे नाव या योजनेला देण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
कॅग'च्या रिपोर्टप्रमाणे फडणवीसांच्या काळात ६५ हजार कोटींचे घोटाळे - जयंत पाटील
तत्कालीन फडणवीस सरकारवर कॅगने ताशेरे ओढले आहेत. राज्यात २०१८ पर्यंत झालेल्या ६६ हजार कोटी रुपयांच्या कामांचा ताळमेळ नसल्याचा संशय कॅगने अहवालात व्यक्त केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना अर्थमंत्री जयंत पाटील यांनी फडणवीस सरकारच्या काळात बेसुमार पैसेवाटप झाल्याचं म्हटलं आहे. दिलेल्या कामांमध्ये नगरविकास खात्याची कामं जास्त होती. त्यासाठी पाहिजे तसं पैशांचं वाटप करण्यात आल्याचं पाटील म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
CAA आंदोलनं: देश किंवा राज्य सोडावं लागेल ही भीती बाळगू नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नागरिकत्त्व सुधारणा कायद्यावरून देशभरात आगडोंब उसळला आहे. महाराष्ट्रातही याचे लोण पसरले असून ठिकठिकाणी आंदोलनं होतं. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जनतेला शांततेचं आवाहन केलं आहे. तसंच, महाराष्ट्रातील जनतेचे हक्क कुणालाही हिरवून देणार नाही, अशी ग्वाहीही दिली आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केलं.
5 वर्षांपूर्वी -
आदित्य बाळासाहेबांचा नातू, पण त्याच्या वागण्यात अजिबात अहंकार नाही: अजित पवार
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. यानंतर नागपुरात पहिल्यांदाच हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी अनेक नवखे आमदार विधिमंडळात आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरेही पहिल्यांदाच आमदार झाला आहे. आता त्याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘आदित्य हा बाळासाहेबांचा नातू आहे. मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे. मात्र त्याच्या वागण्यात अजिबात अहंकार नाही. तो सगळ्यांशी मिळून मिसळून वागतो.’ असं अजित पवार म्हणाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवारांना क्लीनचिट; एसीबीचं न्यायालयात प्रतिज्ञापत्र
जवळपास ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अजित पवारांना क्लीन चिट दिली आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे. एसीबीकडून सिंचन विभागाशी संबंधित २६५४ निविदांची चौकशी केली जात असून, त्यापैकी ४५ प्रकल्प हे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे आहेत.
5 वर्षांपूर्वी -
शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया २-३ महिन्यात पूर्ण करणार: अजित पवार
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी तिसऱ्या दिवशी विधानभवनाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली होती. शेतकरी कर्जमाफीबाबत एनसीपी’चे नेते आमदार अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. याच पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात अनौपचारिक गप्पांदरम्यान अजित पवार म्हणाले, शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया २ ते ३ महिन्यात पूर्ण करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही; 22 टक्के अपसाईड परतावा मिळेल - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL