4 May 2024 12:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या Penny Stocks | कुबेर पैशाचा पाऊस पाडतोय या 10 पेनी शेअर्समधून! 1 दिवसात 40 टक्केपर्यंत परतावा, खरेदी करणार? Infosys Share Price | इन्फोसिस, Wipro, TCS आणि HCL शेअर्सबाबत तज्ज्ञांची भविष्यवाणी, 4 IT शेअर्स मालामाल करणार? Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर
x

Pakistan Economic Crisis | पाकिस्तानात टोमॅटो 500 रुपये किलो, कांदा 400 रुपये किलो, बटाटे 120 रुपये किलो, अर्थव्यवस्था संकटात

Pakistan Economic Crisis

Pakistan Economic Crisis | लाहोर आणि पंजाब प्रांतातील अन्य भागात आलेल्या प्रलयंकारी पुरामुळे विविध भाज्या आणि फळांच्या किंमतीत मोठी वाढ होत असताना पाकिस्तान सरकार भारतातून टोमॅटो आणि कांदा आयात करण्याची शक्यता आहे. बाजारातील घाऊक व्यापाऱ्यांनी ही माहिती दिली.

लाहोर बाजारातील घाऊक व्यापारी जवाद रिझवी यांनी सांगितले की, “रविवारी लाहोरच्या बाजारात टोमॅटो आणि कांद्याचे दर अनुक्रमे 500 आणि 400 रुपये प्रति किलो होते. मात्र, टोमॅटो, कांद्यासह अन्य भाज्या नेहमीच्या बाजारांपेक्षा १०० रुपये किलोने कमी दराने रविवारच्या बाजारात उपलब्ध होत्या.

पुरामुळे बलुचिस्तान, सिंध आणि दक्षिण पंजाबमधून होणाऱ्या भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असल्याने येत्या काही दिवसांत अन्नधान्याचे दर आणखी वाढतील, असे ते म्हणाले. “येत्या काही दिवसांत कांदा आणि टोमॅटोचा भाव 700 रुपये प्रति किलोच्या पुढे जाऊ शकतो. त्याचप्रमाणे बटाट्याचे दर 40 रुपये किलोवरून 120 रुपये किलो झाले आहेत. वाघा सीमेवरून भारतातून कांदा आणि टोमॅटो आयात करण्याचा पर्याय सरकार शोधत असल्याची माहिती आहे.

तोरखाम सीमेवर दररोज १०० कंटेनर टोमॅटो व सुमारे ३० कंटेनर कांद्याची आवक होत असून त्यापैकी दोन कंटेनर टोमॅटो व एक कांदा रोज लाहोर शहरात आणला जात असून कंटेनरची संख्या फारच कमी आहे. व्यापारी म्हणाले की, पुरामुळे शिमला मिरची किंवा तत्सम भाज्याही बाजारात कमी आहेत. सरकार शेवटी भारतातून कांदा आणि टोमॅटो आयात करेल, असे व्यापारी म्हणाले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Pakistan Economic Crisis check details 29 August 2022.

हॅशटॅग्स

#Pakistan Economic Crisis(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x