26 April 2024 9:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

विखेंची नगरमध्ये ताकद नव्हती; सर्व १२ जागा जिंकू म्हणत ३ जिंकल्या: राम शिंदे

MLA Radhakrushna Vikhe Patil, Former MLA Ram Shinde

नाशिक: महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कर्जत-जामखेडच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांचा विजय झाला होता. रोहित पवार यांना १३५८२४ तर भारतीय जनता पक्षाचे राम शिंदे यांना ९२४७७ मते मिळाली. राेहित पावर यांचा तब्बल ४३,३४७ मतांनी विजय झाला आहे. त्यामुळे मंत्री राम शिंदे यांना ५ वर्ष तरी घरी बसावं लागणार हे निश्चित झालं. निवडणुकीपूर्वीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे राजकीय वारसदार म्हणून चर्चेत आलेले रोहित पवार यांनी पहिल्याचा दणक्यात भाजपच्या एका मंत्र्याला पराभूत करून घरी बसवला होतं. सध्या कर्जत-जामखेडमधील रोहित पवारांचा वाढता राजकीय आवाका पाहता राम शिंदेंना पुढच्या दुसराच मतदारसंघ शोधावा लागेल अशी शक्यता आहे. त्यामुळे राम शिंदे देखील संतापलेले दिसतात.

आमदार रोहित पवारांनी राज्याचे मंत्री राम शिंदे यांना आव्हान दिले होते. राम शिंदे हे कॅबिनेट मंत्री होते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी मानले जातात. त्यांच्यासाठी ही निवडणूक पहिल्यापासूनच आव्हानात्मक आणि चर्चेची ठरली. सध्या भारतीय जनता पक्षाचं सरकार देखील गेलं असून भाजपने विभागनिहाय बैठक सुरु केल्या आहेत आणि त्याचाच भाग म्हणून उत्तर महाराष्ट्राची देखील बैठक नाशिकमध्ये पार पडली आणि तिथे देखील राम शिंदेंचा राग दिसून आला.

‘अहमदनगरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या झालेल्या पराभवाला काँग्रेसमधून आलेले माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील जबाबदार आहेत. ते ज्या पक्षात जातात, तिथं खोड्या करतात. त्या पक्षासाठी हानिकारक वातावरण निर्माण करतात,’ असा थेट आरोप माजी मंत्री व कर्जत-जामखेडचे भारतीय जनता पक्षाचे पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी केला आहे.

राम शिंदे म्हणाले, ‘नगरमध्ये भारतीय जनता पक्षाचे ५ आमदार होते. विखे आणि पिचड आल्यानंतर ती संख्या सातवर गेली होती. त्यात आणखी वाढ होणं अपेक्षित होतं. पण निवडणुकीनंतर ती तीनपर्यंतच मर्यादित राहिली. नगर जिल्ह्यातील जागा १२-० नं जिंकू असं विखे म्हणत होते. त्यांची काही फार ताकद होती, असं नाही. पण जी काही होती, त्याचा काहीही फायदा झालेला नाही. उलट अनेकांचा सूर त्यांच्या विरोधात आहे. ते जिथं जातात, तिथं वातावरण बिघडवतात.’

दरम्यान, आजच नाशिकच्या दौऱ्यावर असलेल्या आमदार आशिष शेलार यांनी देखील प्रसार माध्यमांशी संवाद साधत नागरिक सुधारणा कायदा आणि शिवसेनेच्या भूमिकेवरून पक्षाची भूमिका स्पष्ट केली. देशहितासाठी भारतीय जनता पक्ष तडजोड करायला तयार आहे. शिवसेनेनं आपला मूळ बाणा दाखववा. शिवसेनेनं काँग्रेसच्या भितीमुळे आपली भूमिका बदलू नये. नागरिकत्व दुरूस्ती विधेयक हे देशाचं हित आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी देशहितासाठी हे विधेयक स्वीकारावं. सरकार वाचवण्यासाठी भारतीय जनता पक्ष शिवसेनेसोबत राजकीय तडजोडीसाठी तयार असल्याचं मत भाजपा नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केलं.

 

Web Title:  Radhakrishna Vikhe Patil is Responsible For loss of BJP in Ahmednagar Assembly election 2019 says Former Minister Ram Shinde

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x