मुंबई: शिवसेनेचा पारंपारिक मित्र भाजप हा केवळ ई.व्ही.एम. चा वापर करूनच जिंकू शकतं, अर्थात त्यांचा लोक मतदानाच्या पद्धतीवर विश्वास नाही असे मत शिवसेनेने व्यक्त केले आहे.
कर्नाटक मध्ये सापडलेल्या १०,००० खोट्या निवडणुक ओळखपत्रांवरुन एकच रान उठले आहे आणि हा सर्व प्रकार निवडणुक प्रक्रियेला एक वेगळ्या पातळीवर घेऊन जात असल्याची चिन्ह दिसत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ कॉंग्रेस-मुक्त भारत ‘ च्या घोषणेनंतर काँग्रेसचं जवळजवळ कंबरडेच मोडले पण त्यांचे विचार मेले नाहीत. भाजपनं काँग्रेसच्या विचार आणि गुणधर्मांचा अपप्रचार करत काँग्रेस संपवण्याचा पुन्हा प्रयत्न सुरु केला आहे.
कर्नाटक निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर केला जात आहे. भाजपने केलेल्या जाहीर घोषणांमुळे ते एवढा पैसा कुठून आणणार हे मात्र एक रहस्यच आहे. निवडणुकी आधी पैशाचे वारे वाहतातच आणि असे वाटते जणू काय ‘ प्रत्येक बँकेमध्ये ‘ मुद्रा बँक ‘ नोटा ‘ छापल्या जात आहेत. सत्तेत असताना आधी जे काँग्रेस करत होतं तेच आता बीजेपी करत आहे, असे आरोप शिवसेनेने केले आहेत.
शाईचा नियम आता संपला आहे, परंतु भाजप निवडणुका जिंकण्यासाठी ए.व्ही.एम. चा हेरफार करत आहे. लोक मतदानाच्या सद्य पद्धतीवर विश्वास ठेवत नाहीत असे मत शिवसेनेने व्यक्त केले आहे.
सत्तेवर बसलेल्यांचे फक्त मुखवटे बदलले आहेत, परंतु या मुखवटे मागे चेहरे समान आहेत. भाजपने काँग्रेसला पराभूत केले नाही, परंतु स्वतःला त्यात विलिन केला आहे, असा खुद्द आरोप शिवसेनेने केला आहे.
