27 July 2024 10:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा HUDCO Share Price | मल्टिबॅगर शेअरसाठी BUY रेटिंग, कंपनीबाबत अपडेट आली, यापूर्वी 400% परतावा दिला
x

कोकणाचा निसर्ग भस्मसात करण्याचा सेनेचा डाव : नारायण राणे

मुंबई : कोकणाचा निसर्ग भस्मसात करण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचे नारायण राणे पत्रकारांना म्हणाले. कोकण संदर्भातील सर्वच प्रश्नांवर शिवसेनेची नेहमीच दुपट्टी भूमिका करत आली आहे. केवळ पैशांसाठी संपूर्ण कोकणच भस्मसात करण्याचा शिवसेनेचा डाव आहे, असा घणाघाती आरोप नारायण राणे यांनी शिवसेनेवर केला.

रत्नागिरीत होणाऱ्या नाणार ग्रीन रिफायनरीला कोकणात आणण्याचा घाट हा शिवसेनेनेच घातला असल्याचा आरोप महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे सर्वेसेवा नारायण राणे यांनी केला आणि नाणार ग्रीन रिफायनरीला आपला तीव्र विरोध असल्याचेही नमूद केले.

आम्ही कोणत्याही परिस्थितीत नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही आणि अधिकाऱ्यांनी कोणताही दम देण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्याविरोधात केसेस दाखल करू. मी मुख्यमंत्री फडणवीसांना ही संदर्भात भेटणार असून त्या व्यतिरिक्त ही मला कोणाकडे जावं लागेल हे मला माहित आहे. कोणत्याही परिस्थितीत मी हा प्रकल्प होऊ देणार नाही असे ही नारायण राणे पत्रकारांना म्हणाले.

कोकणात एकूण १३ हजार हेक्टर जमीन लागवडीखाली आहे आणि या भागात जवळ जवळ ७ लाख आंब्याची झाडं असून प्रसिद्ध देवगड आंबाही याच क्षेत्रात येत. १८ गावांतील जनतेचा नाणार ग्रीन रिफायनरीला तीव्र विरोध शिवसेना केवळ दुपट्टी भूमिका घेऊन केवळ पैशांसाठी संपूर्ण कोकणच भस्मसात करण्याचा घाट घालत आहे. या रिफायनरीतून होणाऱ्या सांडपाण्यामुळे मासेमारीच खूप मोठा नुकसान होणार असल्याची भीतीही नारायण राणे यांनी व्यक्त केली.

जर शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरेंचा या प्रकल्पाला विरोध होता तर राज्याचे ‘उद्योगी’ मंत्री आणि केंद्रातील अवजड उद्योग मंत्री शिवसेनेचेच असताना त्यांच्या प्रकल्पांना मान्यताच कशी मिळाली आणि जमीन अधिग्रहनाला मान्यता का दिली असा प्रश्न ही नारायण राणे यांनी उपस्थित केला.

विरोध करणाऱ्या अशोक वालम यांना मातोश्रीवर बोलावून दम दिला जात आहे आणि त्यांना वारंवार धमक्याही येत आहेत. इतकंच नाही तर त्यांच्या पत्नीवरही केसेस टाकल्या आहेत. तुझ्या सात पिढ्या बसून खातील इतका पैसा मिळेल असं पत्र ही अशोक वालम यांना देण्यात आलं.

या ठिकाणी खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी यांनी जमिनी घेतल्या असल्याची माहित ही आपल्याकडे आहे असा गंभीर आरोपही नारायण राणे यांनी यावेळी केला. इतकंच काय तर शिवसेनेचे पदाधिकारी इथे दलाली करत फिरताना दिसत आहेत असं ते पुढे म्हणाले.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x