मदुराई : योगगुरु रामदेव बाबा यांनी प्रसार माध्यमांसमोर केलेल्या एका वक्तव्याने आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वीच खळबळ माजली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर नक्की पुढील पंतप्रधान कोण होतील असा प्रश्न बाबा रामदेव यांना विचारला असता त्यांनी दिलेल्या उत्तरानंतर सर्वच आश्चर्य चकीत झाले आहेत.
काल ते मदुराईला एका पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना बाबा रामदेव म्हणाले की, यावेळी ते म्हणाले की, ‘भारत हा जातीयवादी देश नाही आणि केवळ हिंदुंचा सुद्धा देश नाही. देशातील राजकीय परिस्थिती अत्यंत खडतर बनली असून पुढचे पंतप्रधान कोण असतील याबाबत सध्या काहीच सांगू शकत नाही. मी राजकारणावर लक्ष केंद्रीत केलेले नाही आणि कोणाला पाठिंबाही किंवा विरोधही केलेला नाही.
आधीच ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बॅकफूटवर गेलेल्या भारतीय जनता पक्षाच्या अडचणी अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यात मोदी सरकारमधील जवळपास सर्वच घटकपक्षच नाराज असल्याने बाबा रामदेव यांच्या याविधानाने त्यांना बळ मिळण्याची शक्यता आहे.
