महत्वाच्या बातम्या
-
पुलावामा हल्ला: देश दुःखात बुडाला, पण मोदी कॉर्बेट पार्कात शूटिंग करत होते: काँग्रेसने पुरावे दिले
पुलवामा जिल्ह्यात दहशदवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यात १० जवान शहीद झाले. त्यानंतर संपूर्ण देश दुःखात बुडाला असताना नरेंद्र मोदी नेमके काय करत होते याचे पुरावे सादर करण्यात आले आहे. जवान शहीद झाल्यानंतर देशात सर्वांनी एकत्र येण्याची हाक सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी दिली होती. त्यानंतर विरोधकांनी देखील सामंज्याची भूमिका घेत सरकारला सहकार्य देखील केलं. वातावरण भावनिक असल्याने विरोधकांनी कोणतेही प्रश्न उपस्थित केले असते तर मोदींनी त्याच राजकारण केलं असतं हे विरोधकांना चांगलेच ठाऊक होतं. कारण, स्वतः भाजपचे नेते म्हणजे नरेंद्र मोदी, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ हे सर्वच प्रमुख नेते प्रचारात व्यस्त होते. त्यात हद्द म्हणजे, दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावून स्वतः नरेंद्र मोदी यवतमाळमध्ये प्रचारासाठी गेले आणि तेथे सुद्धा लष्कराच्या नावाने स्वतःचा आणि पक्षाचा प्रचार केल्याचे पाहायला मिळाले.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव यांनी भाषणात 'चौकीदार चोर हैं' म्हटलं होतं, आता 'चौकीदार थोर आहेत' बोलण्याची शक्यता?
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्या अनुषंगाने सर्वच पक्ष झपाटून कामाला लागले आहेत आणि त्याचाच परिपाक म्हणजे सत्तेत राहून तब्बल साडेचार वर्ष मोदींवर आणि भाजपवर वारंवार टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वबळाच्या नाऱ्यावरून पलटले आहेत. अगदी विरोधकांच्या सुरात सुर मिळवून राफेल लढाऊ विमानांच्या कारणावरून देखील मोदींवर टीकास्त्र सोडण्यात आलं होतं.
6 वर्षांपूर्वी -
राणे फडणवीस भेट! नारायण राणे शिवसेने विरोधात ५ जागांवर तगडे उमेदवार देणार
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्या अनुषंगाने नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष देखील जोरदार पणे कामाला लागला आहे. भाजप-शिवसेना युती झाली तरी देखील खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष राज्यातील ५ मतदारसंघांमध्ये तगडे उमेदवार उभे करणार आहेत. हे पाचही महत्वाचे मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. सध्या शिवसेनेत अनेक वरिष्ठ पदाधिकारी युती केल्यामुळे नाराज आहेत. त्यामुळे कदाचित अशांनाच आर्थिक रसद पुरवून शिवसेनेविरुद्ध तगडं आवाहन उभं केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
मनसेचे नितीन नांदगावकरांच्या तडिपारीमागे आकृती बिल्डर?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांनी आकृती बिल्डरच्या सायन प्रतीक्षा नगर येथील SRA ट्रान्झिट कॅम्पची दयनीय अवस्था आणि अपात्र ठरवण्यात आलेल्या तब्बल १३७ मराठी कुटुंबीयांचं वास्तव समोर आणलं. त्यात कहर म्हणजे या ट्रान्झिट कॅम्पमध्ये वास्तव्यास असलेल्या १३७ कुटुंबियांच्या घरातील वीज आणि पाणीपुरवठा देखील सदर बिल्डरने काढून घेतला आहे. संबंधित मराठी कुटुंबीय अपात्र आहेत किंवा नाही याचा कोणताही अधिकृत निकाल लागण्यापूर्वीच त्यांना मूलभूत सुविधांपासून दूर करून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नितीन नांदगावकर यांनी सामान्य मराठी माणसाच्या हक्कांसाठी आकृती बिल्डरला धडा शिकवण्याचा मानस केला होता.
6 वर्षांपूर्वी -
हफ्ते बंद झाले म्हणून कारवाई? नितीन नांदगावकर आणि सामांन्यांची मुंबई पोलिसांवर टीका.
हफ्ते बंद झाले म्हणून कारवाई? नितीन नांदगावकर आणि सामांन्यांची मुंबई पोलिसांवर टीका.
6 वर्षांपूर्वी -
अमित शहांसमोर गप्प! आता म्हणतात भाजपा नव्हे ‘NDA’ ठरवेल आगामी पंतप्रधान
२०१४ मधील निवडणुकीपेक्षा यंदा भारतीय जनता पक्षाने शंभर जागा कमी जिंकल्यास, आगामी पंतप्रधान भारतीय जनता पक्ष नव्हे तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीए ठरवणार, असे सूचक विधान शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे. विशेष म्हणजे हेच बोलण्याची संधी त्यांना अमित शहा एकाच पत्रकार परिषदेत उपस्थित असताना सुचले नाही हे विशेष.
6 वर्षांपूर्वी -
नक्की भीती कोणाला वाटतेय? सर्वसामान्यांना की कायदा मोडणाऱ्यांना? की लाचखोरांना?
नक्की भीती कोणाला वाटतेय? सर्वसामान्यांना की कायदा मोडणाऱ्यांना? की लाचखोरांना?
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: शहीदांवर अंत्यसंस्कार, भाजप मंत्री पायात बूट घालून बसले व हसत गप्पा सुरु, स्थानिक संतापले
जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात दहशदवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे तब्बल ४० जवान शहीद झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट आलेली आहे. प्रत्येक भारतीय देशभक्तीने पेटून उठलेला असताना, सत्ताधारी भाजपचे मंत्र्यांची असंवेदनशीलता अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. तसाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे घडला आहे. त्यानंतर स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळालं.
6 वर्षांपूर्वी -
संतापजनक! शहीद जवानांमुळे देशात राष्ट्रभक्तीची लाट, मतांमध्ये रूपांतरित करा: गुजरात भाजप नेते
जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात दहशदवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे तब्बल ४० जवान शहीद झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट आलेली आहे. प्रत्येक भारतीय देशभक्तीने पेटून उठलेला असताना, एक संतापजनक आणि रक्त खवळून सोडणारी घटना घडली आहे. गुजरात भारतीय जनता पक्षाचे नेते आणि प्रवक्ते भरत पंड्या यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
स्वबळाचं वचन मोडणारे उद्धव ठाकरे म्हणतात, 'आमच्या पाठीत वार स्वकीयांनीच केले'
शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीनंतर टीका करणाऱ्यांवर सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. दरम्यान, शिवसैनिकांकडून हात वर करून स्वबळाचं वचन घेऊन देखील स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच ते पायदळी तुडवलं. त्यानंतर सामान्य मराठी माणसापासून ते विरोधकांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. साडेचार वर्षानंतर अचानक भाजप आपल्याला पोषक भूमिका घेत असल्याचा साक्षात्कार उद्धव ठाकरेंना निवडणुकीला महिना शिल्लक असताना झाला.
6 वर्षांपूर्वी -
राज संधी साधू नाहीत, सेनेने केवळ ३ पेंग्विन व शिववडा दिल्याचं मराठी माणसाला माहित आहे
शिवसेनेने केवळ स्वार्थी आणि संधीसाधू राजकारण केलं आहे. जेव्हा २०१४ मध्ये देशभरात नरेंद्र मोदी यांची लाट होती, तेव्हा शिवसेनेने केवळ स्वतःचा फायदा करुन घेतला. परंतु, जेव्हा नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जनमत बनत गेलं तेव्हा त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली, अशा शब्दात काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारतात निवडणुकीचा काळ, त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवा अशा चर्चेने जोर धरला : इमरान खान
भारताने कोणतीही आगळीक करून युद्ध छेडल्यास पाकिस्तान उत्तर देण्याचा विचार करणार नाही तर थेट प्रतिउत्तर देईल, अशी उघड धमकी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पत्रकार परिषद आयोजित करून दिली आहे. दरम्यान, भारतात सध्या निवडणुकीचा काळ असल्याने, पाकिस्तानला धडा शिकवा चर्चा जोर धरू लागली आहे आणि मी ते समजू शकतो, असं सांगत नरेंद्र मोदी आणि भाजपाला टोला लगावला.
6 वर्षांपूर्वी -
युद्ध छेडल्यास विचार करणार नाही, पाकिस्तान थेट उत्तर देईल: इमरान खान
भारताने कोणतीही आगळीक करून युद्ध छेडल्यास पाकिस्तान उत्तर देण्याचा विचार करणार नाही तर थेट प्रतिउत्तर देईल, अशी उघड धमकी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पत्रकार परिषद आयोजित करून दिली आहे. दरम्यान, भारतात सध्या निवडणुकीचा काळ असल्याने, पाकिस्तानला धडा शिकवा चर्चा जोर धरू लागली आहे आणि मी ते समजू शकतो, असं सुद्धा त्यांनी यावेळी म्हटलं.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेवर प्रचंड संतापलेला मराठी माणूस राज ठाकरेंसोबत एकवटू शकतो: सविस्तर
काल भाजप शिवसेनेच्या युतीची अधिकृत घोषणा झाली आणि त्यानंतर मराठी जनमानसात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांच्या बद्दल प्रचंड संतापाची भावना निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील साडेचार वर्षांपासून स्वबळ आणि स्वाभिमानाच्या बाता मारणारे उद्धव ठाकरे किती ठाम मताचे आहेत हेच यातून अधोरेखित झालं आहे. केवळ आगामी निवडणुकीत स्वतःची जास्त जागांची सुप्त इच्छा पूर्ण कारण्यासाठीच त्यांनी सामान्य मराठी मतदाराला अक्षरशः मूर्ख बनवलं असंच म्हणावं लागेल. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेनेला मराठी मताच्या जबर फटका बसण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. सत्ताकाळात डझनभर मंत्र्यांनी विकासाची काहीच कामं केली नाहीत म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक हिंदुत्व आणि राम मंदिर असे भावनिक मुद्दे आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने बाहेर काढले. परंतु, शिवसैनिकांकडून स्वबळाची शपथ घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी स्वतःच शपथ मोडून शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत आणि त्याचा देखील त्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
युतीच्या काही दिवस आधी देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा केलेला शाब्दिक सम्मान - युतीया
युतीच्या काही दिवस आधी देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा केलेला शाब्दिक सम्मान – युतीया
6 वर्षांपूर्वी -
संजय राऊत व उद्धव ठाकरेंनी फक्त बाता मारून मराठी माणसाला फसवलं
स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे यांनी मुंबईमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. केंद्रात आणि राज्यात डझनभर मंत्रिपद उपभोगून सतत सहकारी पक्ष भाजपवर विखारी आगपाखड करणारे शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देऊन पलटले आहेत. दरम्यान संपूर्ण सत्ताकाळ राजीनामा नाट्यात व्यर्थ घालवल्यानंतर मागील काही महिन्यापासून अनेक वेळा स्वबळाच्या जाहीर घोषणा देखील स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेत पहिली ठिणगी, युती झाली तरी दानवेंविरुद्ध लढणार अर्जुन खोतकर?
केंद्रात आणि राज्यात डझनभर मंत्रिपद उपभोगून सतत सहकारी पक्ष भाजपवर विखारी आगपाखड करणारे शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देऊन पलटले आहेत. दरम्यान संपूर्ण सत्ताकाळ राजीनामा नाट्यात व्यर्थ घालवल्यानंतर मागील काही महिन्यापासून अनेक वेळा स्वबळाच्या जाहीर घोषणा देखील स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत. भाषणादरम्यान ऐतिहासिक दाखले देताना अफजलखान आणि अफजखानाच्या फौजा अशा भाजप आणि भाजपच्या नेत्यांचे नामकरण करण्यात शिवसेना उद्धव ठाकरे यांनी ५ वर्ष खर्ची घातली. परंतु, निवडणुका जवळ येताच ज्यांना अफजखान संबोधलं, त्यांचीच आता हसत गळाभेट घेण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
अफजलखान ते गळाभेट, धन्य ते राजकारणी आणि मूर्ख ती जनता
केंद्रात आणि राज्यात डझनभर मंत्रिपद उपभोगून सतत सहकारी पक्ष भाजपवर विखारी आगपाखड करणारे शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देऊन पलटले आहेत. दरम्यान संपूर्ण सत्ताकाळ राजीनामा नाट्यात व्यर्थ घालवल्यानंतर मागील काही महिन्यापासून अनेक वेळा स्वबळाच्या जाहीर घोषणा देखील स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत. भाषणादरम्यान ऐतिहासिक दाखले देताना अफजलखान आणि अफजखानाच्या फौजा अशा भाजप आणि भाजपच्या नेत्यांचे नामकरण करण्यात शिवसेना उद्धव ठाकरे यांनी ५ वर्ष खर्ची घातली. परंतु, निवडणुका जवळ येताच ज्यांना अफजखान संबोधलं, त्यांचीच आता हसत गळाभेट घेण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजप विरोधकांच्या भेटी केवळ जास्त जागा मिळवण्यासाठीची योजना होती?
केंद्रात आणि राज्यात डझनभर मंत्रिपद उपभोगून सतत सहकारी पक्ष भाजपवर विखारी आगपाखड करणारे शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देऊन पलटले आहेत. एरवी शिवसेना सर्वकाही पडद्या आडून करते हा इतिहास असताना, भाजपच्या कडवट विरोधांसोबत भेटीगाठी करून, त्या भेटींची छायाचित्रं जाणीवपूर्वक प्रसिद्ध करून भाजप नैतृत्वाला ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार अनेक वर्षांपासून सुरु होते. त्यात हिंदी भाषिक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपाला जोरदार फटका बसताच शिवसेनेने जागा वाटपाच्या बाबतीत बार्गेनिंग पावर अधिकच मजबूत करण्यास सुरुवात केली होती. त्याचाच प्रत्यय म्हणजे, आज भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती झाली आणि उद्धव ठाकरेंनी स्वबळाच्या नाऱ्याला तीरांजली देत युतीचा निर्णय जाहीर केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंची राम मंदीर मुद्यावरून पलटी; आता 'पहले सरकार फिर मंदिर', सेना-भाजप युती झाली
केंद्रात आणि राज्यात डझनभर मंत्रिपद उपभोगून सतत सहकारी पक्ष भाजपवर विखारी आगपाखड करणारे शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे स्वबळाची नारा देऊन पलटले आहेत. काही दिवसांपूर्वी हिंदुत्वाच्या नावाने घोषणा करत अयोध्या दौरा आयोजित करून मोठी जाहिरातबाजी देखील केली. दरम्यान, भाजपवर दबाव वाढण्यासाठी ‘पहले मंदिर फिर सरकार’ अशी घोषणा दिली. परंतु त्या घोषणेला त्यांनी स्वतःच तीरांजली दिली आहे. आज त्यांनी अयोध्येत मंदिर बनण्यापूर्वीच सरकार बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत भाजपसोबत आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संसार थाटण्याची अधिकुत घोषणा केली आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL