महत्वाच्या बातम्या
-
VIDEO: शिवसैनिकांकडून स्वबळाची शपथ घेऊन उद्धव ठाकरेंनी स्वतःच शपथ मोडली
केंद्रात आणि राज्यात डझनभर मंत्रिपद उपभोगून सतत सहकारी पक्ष भाजपवर विखारी आगपाखड करणारे शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देऊन पलटले आहेत. दरम्यान संपूर्ण सत्ताकाळ राजीनामा नाट्यात व्यर्थ घालवल्यानंतर मागील काही महिन्यापासून अनेक वेळा स्वबळाच्या जाहीर घोषणा देखील स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO: शिवसैनिकांनो मला स्वबळाचं बळ द्या, मी त्यांचे दात पाडतो, उद्धव ठाकरे पलटले
केंद्रात आणि राज्यात डझनभर मंत्रिपद उपभोगून सतत सहकारी पक्ष भाजपवर विखारी आगपाखड करणारे शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देऊन पलटले आहेत. दरम्यान संपूर्ण सत्ताकाळ राजीनामा नाट्यात व्यर्थ घालवल्यानंतर मागील काही महिन्यापासून अनेक वेळा स्वबळाच्या जाहीर घोषणा देखील स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
पटकवता पटकवता भाजपने 'पटवूनच' टाकली: सविस्तर
शिवसेनेच्या स्वबळाच्या घोषणेनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राज्यात आयोजित केलेल्या एका पक्षीय मेळाव्यात शिवसेनेचं नाव न घेता, जे मित्र पक्ष सोबत येणार नाहीत त्यांना ‘पटकून टाकू’ अशी थेट धमकी दिली होती. परंतु, शिवसेनेचा इतिहास अनुभवल्याने त्यांना पटवणे अधिक सोपं असल्याचं जाणवलं आणि भाजपाची टीम शिवसेना नेतृत्वाला राजी करण्यासाठी कामाला लावली होती.
5 वर्षांपूर्वी -
जवानाच पार्थिव आलं आणि त्यासोबत भाजप मंत्र्याचा सेल्फी, सर्वत्र संताप व्यक्त
चार दिवसांपूर्वी पुलवामामध्ये दहशदवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. परंतु अजून देखील सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती संपण्याचे नावच घेत नाही. सध्या अनेक शहीद जवानांचे शव अंत्यविधींसाठी त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात येत आहेत. दरम्यान, यावेळी एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
‘स्मार्ट सिटी’ केवळ निवडणुकीचं गाजर, अनेक ठिकाणी सुरुवातच नाही
स्मार्ट सिटी परियोजनेंतर्गत निवडण्यात आलेल्या नागपूर, औरंगाबाद, पुणेसह महाराष्ट्रातील आठ शहरांसाठी केंद्र सरकारने आतापर्यंत १,५६८ कोटी रुपये दिले आहेत; मात्र वस्तुस्थिती ही आहे की, ४ वर्षांनंतर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवडत्या योजनेंतर्गत निर्धारित कार्यांतील ५८ टक्के कामांना अद्याप सुरुवातच करण्यात आल्याचे निष्पन्न झालं आहे.
5 वर्षांपूर्वी -
इंदिरा गांधींनी पाकिस्तानविरुद्ध १९७१ मध्ये दाखवलेलं धाडस नरेंद्र मोदी दाखवतील का? सविस्तर
राष्ट्रीय संकट आणि त्यावर राजकीय इच्छ शक्तीतून मात कशी करायची हे जाणून घेण्यासाठी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७१ मध्ये पाकिस्तानविरुद्ध थेट युद्ध पुकारून जे अभ्यासपूर्ण धाडस दाखवलं ते समजून घेणं गरजेचं आहे. कारण आजच्या पिढीवर समाज माध्यमांच्या आधारे अनेक चुकीच्या आणि खोट्या गोष्टी दुय्यम मार्केटिंगच्या आधारे लादल्याचे सहज निदर्शनास येते. पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ’च्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्लात तब्बल ४० जवान शहीद झाले आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या मागणीने जोर धरला.
5 वर्षांपूर्वी -
MTNL डबघाईला? कर्मचार्यांचे पगारासाठी सोमवारी निदर्शने आंदोलन
एमटीएनएलच्या कर्मचार्यांचा जानेवारी महिन्याचा पगार अद्यापही न झाल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिक अडचण झाली आहे. एकेकाळी भारत सरकारला हजारो कोटींचा वार्षिक फायदा मिळवून देणारी एमटीएनएल सध्या भारत सरकारच्या दिशाहीन व अदूरदर्शी धोरणांमुळे आर्थिक गर्तेत अडकण्याला शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्त्वाखालील कामगार संघटना देखील कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात येतो आहे.
5 वर्षांपूर्वी -
सर्वपक्षीय बैठकीमध्ये सत्ताधाऱ्यांसह व विरोधी पक्षांची दहशतवादाविरोधात एकजूट
पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड आत्मघाती हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांनी दहशतवादाविरोधात एकजूट दाखवली. तसेच दहशतवाद्यांविरोधात होणाऱ्या कारवाईत सरकारसोबत उभे राहण्याचे आश्वासन विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दिले. तसेच दहशतावादाविरोधात त्रिसूत्री प्रस्ताव देखील पारित करण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
पुलवामात २ वेळा हल्ले झाले, प्रतिक्रिया तीच, कसे विश्वास ठेवतात लोक?
पुलवामात २ वेळा हल्ले झाले, प्रतिक्रिया तीच, कसे विश्वास ठेवतात लोकं?
5 वर्षांपूर्वी -
'वंदे भारत एक्स्प्रेस' या वेगवान ट्रेनचं इंजिन दुसऱ्याच दिवशी फेल, शेवटच्या डब्याचा ब्रेक जाम
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या देशातील सर्वात वेगवान ट्रेन १८ मध्ये दुसऱ्याच दिवशी बिघाड झाला आहे. शनिवारी सकाळी वंदे भारत एक्स्प्रेस दिल्लीपासून २०० किलोमीटर अंतरावर असतानाच बिघाड झाला. वंदे भारत एक्स्प्रेसला रविवारी पहिल्या कमर्शिअल रनसाठी वाराणसीहून दिल्लीसाठी प्रस्थान केले. यावेळी ट्रेनचं इंजिन फेल झालं. शेवटच्या डब्याचा ब्रेकदेखील जाम झाला होता. यासोबत काही डब्यांमधील वीज गायब झाली.
5 वर्षांपूर्वी -
पहिल्यांदा संतप्त वातावरणात वाटण्या आटपून घेतल्या? आता पाकिस्तानवर हल्ल्याची मागणी
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये युती होण्याचं जवळपास निश्चित झाल्याचं वृत्त आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून निर्माण झालेल्या तिढ्यावर तोडगा निघाल्याचे प्रसार माध्यमांकडे वृत्त आहे. पुलवामा जिल्ह्यात भारतीय जवानांच्या बटालियनवर झालेल्या भ्याड हल्लात ४० हून अधिक जवान शहीद झाले. त्यानंतर देशभर संतप्त वातावरण असताना भाजप आणि शिवसेनेदरम्यान मातोश्रीवर जोरदार चर्चा सुरु होती. त्यावेळी तापलेल्या वातावरण शिवसेना आणि भाजपने जागावाटपाचा कार्यक्रम आटपून घेतला असल्याचे वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
यापूर्वीचा पुलवामा हल्ला; 'सैन्यात जवान असाल तर जीव जाणारच' असं भाजप खासदार नेपालसिंह बरगळले होते
एक दिवसापूर्वी सीआरपीएफच्या जवानांवर पुलवामा येथे झालेला भ्याड हल्ल्याचे पडसाद देशभर उमटले आहेत. देशभरातून संतप्त प्रतिकिया देखील येत आहेत. परंतु, पुलवामा मधील लष्कराच्या जवानांवर झालेला हा काही पहिला भीषण हल्ला नव्हता. यायाधी सुद्धा पुलवामातील प्रशिक्षण केंद्रावर दहशतवाद्यांनी जोरदार हल्ला केला होता. परंतु देशवासीयांची विसरण्याची प्रवृत्ती राजकारण्यांच्या पथ्यावर पडते. तसं पुन्हा होऊ नये अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
प्रसार माध्यमांच्या बदलत्या भूमिका? २६/११ चा भ्याड हल्ला ते पुलवामामधील हल्ला
काल जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर मोठा आणि भ्याड दहशतवादी हल्ला झाला. दरम्यान, सध्या संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. सदर भ्याड हल्ला इतका भीषण होता की त्यात तब्बल ४० जवानांना वीर मरण आलं आहे. त्यातील अनेकांची तर ओळख होणं देखील कठीण झालं आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण देश दुःखात बुडालेला असताना महाराष्ट्रात मात्र एक वेगळंच राजकारण जोरदार पणे सुरु होतं. वास्तविक कालच्या घटनेनंतरची भारतीय प्रसार माध्यमांची भूमिका पाहिल्यास सत्ताधाऱ्यांना सावरून घेण्याचेच प्रकार सुरु असल्याचे प्रथम दर्शनी जाणवतं. त्यात प्रसार माध्यमांकडून ‘ही राजकारण करण्याची वेळ नाही’ या वाक्यप्रचारावर अधिक वापर होताना दिसत आहे.
5 वर्षांपूर्वी -
पाकिस्तानवर राजनैतिक पातळीवर बहिष्कार, 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जाही काढणार: जेटली
पाकिस्तानच्या दहशतवादी जैश-ए-मोहम्मदने गुरुवारी पुलवामा येथे केंद्रीय राखीव दलाच्या ७८ गाड्यांच्या ताफ्यावर भीषण दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात ४२ भारतीय जवान शहीद झाले. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी केंद्रीय सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत काय निर्णय घेण्यात आला याविषयी अर्थमंत्री यांनी सांगितले. त्यानुसार भारत राजनैतिक पातळीवर पाकिस्तानवर बहिष्कार टाकणार असून, पाकिस्तानचा ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा दर्जा देखील काढून घेतला जाणार आहे. तसेच पाकसोबतचे इतर व्यापारी संबंध तोडण्याच्या हालचाली सुद्धा सुरू आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मातोश्रीवर फडणवीसांची युतीबाबत सकारात्मक चर्चा
मुख्यमंत्र्यांनी काल रात्री मातोश्रीवर जाऊन आगामी लोकसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीसंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. दरम्यान, सदर बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून भारतीय जनता पक्ष २५ तर शिवसेना एकूण २३ जागा लढणार असल्याचे संकेत दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राजकीय मतभेद बाजूला ठेवून भ्याड हल्ल्याला चोख प्रतिउत्तर देण्याची हीच वेळ: राज ठाकरे
काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं, ‘पुलवामा येथे झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात सीआरपीएफचे जवान शहिद झाले. ह्या शहिदांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे. सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून ह्या हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ आहे, असं आवाहन केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीच्या बैठकी नंतर अजित पवार यांची पत्रकार परिषद
राष्ट्रवादीच्या बैठकी नंतर अजित पवार यांची पत्रकार परिषद
5 वर्षांपूर्वी -
मनसे उत्तर-भारतीयांची द्वेषी कसं म्हणावं? अविनाश जाधवांमुळे चिमुकली आईच्या कुशीत
महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हटली की ते उत्तर भारतीय द्वेषी अशी साधारण भावना प्रसार माध्यमांनीच लोकांच्या मनात बिंबवून ठेवली आहे. मग त्यात चुकीची आणि सत्यता न बघता हिंदी प्रसार माध्यमांनी देशभर त्यांच्याबद्दल नाकाराम्तक बीज रोवली. अगदी महाराष्ट्रात रोजगार हा पहिल्यांदा मराठी मुलांनाच असा आग्रह धरला तरी राज ठाकरेंची गुंडगिरी असे मथळे प्रसार माध्यमांमध्ये सहज पाहायला मिळाले. त्यात हिंदी मीडिया नेहमीच अग्रेसर राहिला, परंतु देशातील इतर राज्यात असे विषय उचलले गेले की कोणतीही वाच्यता हिंदी माध्यमं प्रसारित करत नाहीत, हे वास्तव आहे.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे आणि फडणवीस बेस्ट कपल, केवढा तो एकमेकांवर जीव: धनंजय मुंडे
आज व्हॅलेंटाइन डे असल्याने अनेकजण स्वतःच्या प्रिय व्यक्तीला शुभेच्छा देत आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहे. मात्र विधानपरिषद विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी व्हॅलेंटाइन डे च्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फाडावीसांना खोचक टोला लगावला आहे. धनंजय मुंडे यांनी दोघांचा एक फोटो ट्विट करत यांच्याशिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का? असा प्रश्न देखील विचारला आहे.
5 वर्षांपूर्वी -
संजय निरूपम हटाओ, मुंबई कॉंग्रेस नेत्यांची दिल्लीत जोरदार मोहीम
आगामी निवडणुकीच्या तोंडावर राज्य काँग्रेसमध्ये सुद्धा घडामोडींना वेग आला आहे. मुंबई सर्व वरिष्ठ कॉंग्रेस नेत्यांनी महाराष्ट्र कॉंग्रेसचे केंद्रीय निरीक्षक मल्लिकार्जुन खरगे यांची आज भेट घेतली आहे. निरुपम यांच्याकडे पक्षाची अन्य जबाबदारी देऊन मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा मिलिंद देवरा यांच्याकडे सोपवावी, असा आग्रह या नेत्यांनी खरगे यांच्याकडे धरल्याचे सांगण्यात आले.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय
- IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 151% परतावा, संधी सोडू नका
- Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या
- Mobile Recharge Hike | बापरे! कोट्यवधी मोबाइल युजर्सना झटका लागणार! मोबाईल रिचार्ज खर्च 25% वाढणार
- My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यातही पैसे जमा झाले असतील तर पटापट तपासून घ्या, नियम बदलला
- Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
- RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला
- Adani Power Share Price | खुशखबर! अदानी पॉवर शेअरने व्हॉल्युमसह ब्रेकआउट तोडल्यास मालामाल करणार
- LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ
- Rajnish Retail Share Price | अवघ्या 63 पैशाचा शेअर! 4 वर्षात दिला 14000% परतावा, स्टॉक आजही स्वस्त आणि फायद्याचा