महत्वाच्या बातम्या
-
दोन चोर गुजराती देशाला मूर्ख बनवत आहेत: भाजप ज्येष्ठ नेते आय. पी. सिंह
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वावरच थेट टीका केल्यानं भाजपाकडून वरिष्ठ नेत्याची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्त्वाचा उल्लेख ‘गुजराती चोर’ म्हणून केल्यानं भाजपानं लखनऊमधील पक्षाचे ज्येष्ठ नेते आय. पी. सिंह यांचं निलंबन केलं. सिंह यांनी ट्विटरवरुन भाजपा नेतृत्त्वावर कडाडून टीका केली होती. भाजपानं पंतप्रधान निवडला आहे की प्रचारमंत्री असा सवाल उपस्थित करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं होतं.
6 वर्षांपूर्वी -
२५ कोटी लोकांना दारिद्र्य रेषेबाहेर काढणार : राहुल गांधी
कॉंग्रेस सत्तेवर आल्यास देशातील जनतेला न्याय देईल, असे म्हणत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांची न्याय योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत वीस टक्के गरीब कुटुंबांना वर्षाला ७२,००० रुपये देणार, असे ते म्हणाले. पाच कोटी कुटुंबातील २५ कोटी लोकांना या योजनेचा फायदा होईल, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या वर्गाला आर्थिक आधार मिळेल.
6 वर्षांपूर्वी -
भाजप-सेनेच्या सेटलमेंटमुळे वनगांशी दगाफटका होणार? राजेंद्र गावित यांना सेनेची उमेदवारी
लोकसभा निवडणुकीचा सेना-भारतीय जनता पक्षाचा तिढा जवळपास सुटल्याचे निश्चित मानले जात आहे. पालघर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं २५-२३चा फॉर्म्युला तयार केला आहे. यावेळी भाजपानं पालघरची जागा शिवसेनेला सोडली आहे. चिंतामण वनगा यांचे गेल्या वर्षी जानेवारीत दिल्लीत निधन झाले होते. त्यानंतर त्या जागेसाठी त्यांचे पुत्र इच्छुक होते.
6 वर्षांपूर्वी -
दानवेंकडून सीआरपीएफ'च्या ४० शहिदांचा थेट 'अतिरेकी' म्हणून उल्लेख
भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे अजून एका वादात सापडले आहेत. याआधी शेतकऱ्यांचा ‘साले’ असा अपमानजनक उल्लेख करणाऱ्या रावसाहेब दानवेंनी आता कहर केला आहे. सोलापूरातील महायुतीचा विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात दानवे यांनी पुलवामा जिल्ह्यातील सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा संदर्भ देताना त्यांनी शहीद जवानांऐवजी त्यांचा थेट ‘अतिरेकी’ असा उल्लेख केला. दानवे म्हणाले की, ‘पाकिस्तानने आपले ४० अतिरेकी मारले. त्यामुळे देशात प्रचंड रोष तयार झाला.’ या वक्तव्यामुळे आता दानवे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. सोशल मीडियावर कडाडून टीका केली जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
पालघर नगरपरिषदेवर युतीला सर्वाधिक जागा, पण नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे
पालघर नगरपरिषद निवडणूकीत भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. परंतु, नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उज्ज्वला केदार काळे या विजयी झाल्या आहेत. त्यामुळे नगरपरिषदेमध्ये युतीने झेंडा फडकावला असला तरी नगराध्यक्षपदी एनसीपीच्या उमेदवार विराजमान होणार. थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडून देण्यात येतो. यामध्ये मतदारांनी नगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीच्या उज्ज्वला काळे यांना निवडणूक दिले आहे.
6 वर्षांपूर्वी -
फडणवीस साहेब! आमच्या चड्ड्यांची काळजी सोडा, तुमच्या चड्ड्यांचा वापर मतदाराने सुरु केला आहे
काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कोल्हापूर येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोचऱ्या शब्दांत टीका केली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर आता मनसेचे कार्यकर्ते आणि कट्टर राज ठाकरे समर्थक तुलसी जोशी यांनी सुद्धा फडणवीसांच्या बोचऱ्या टीकेला जशास तसे उत्तर दिले आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज यांनी मोदींविरोधी भूमिका का घेतली असावी? बाळासाहेबांची 'ती' भूमिका बरंच काही सांगून जाते?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रास सत्तेवर असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात महाराष्ट नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सडकून टीका करत त्यांच्या धोरणांना विरोध केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी मनसे यावेळी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली होती, परंतु त्याच वेळी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना भाजप विरोधी काम करण्याच्या सूचना तर दिल्याचं, परंतु आतापासूनच विधानसभेच्या कामाला लागण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मी ब्राह्मण असल्याने नावाआधी ‘चौकीदार’ लावू शकत नाही: सुब्रमण्यम स्वामी
लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी भारतीय जनता पक्षाने ‘मैं भी चौकीदार’ मोहीम सुरू केली. ही मोहीम सुरू होताच सर्व पक्षाच्या नेत्यांनी समाज माध्यमांवर आपल्या नावाआधी चौकीदार शब्द लावला. मात्र, खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या वक्तव्यामुळे भारतीय जनता पक्ष अडचणीत येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी आपल्या नावाआधी ‘चौकीदार’ हा शब्द जोडला आहे. पण सुब्रमण्यम स्वामी यांनी मात्र आपण ब्राह्मण आहे, त्यामुळे नावात ‘चौकीदार’ शब्द लावू शकत नसल्याचे म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
५६ इंच छातीचे मोदी कुलभूषण जाधवला का नाही सोडवून आणत, पवारांचा सवाल
कराड येथील महाआघाडीच्या प्रचारसभेत एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला. या देशाच्या संरक्षण दलांबाबत आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. अभिनंदनला अटक केल्यानंतर जगातील देशांनी पाकिस्तानवर दबाव टाकला आणि अभिनंदनची सुटका झाली. जर मोदींची खरंच ५६ इंचाची छाती असेल तर ते कुलभूषण जाधव यांना सोडवून का आणत नाहीत, असा रास्त सवाल त्यांनी उपस्थित केला. सैनिकांच्या पराक्रमाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवेल, असा इशाराही त्यांनी दिला.
6 वर्षांपूर्वी -
पहिला टप्पा; उमेदवारी अर्ज भरण्याची घाई आणि शक्तीप्रदर्शन
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान, आजच्या पहिल्या टप्प्यात राज्यात नागपूर, वर्धा, भंडारा, रामटेक, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये ११ एप्रिलला मतदान होणार असल्याने उमेदवारी अर्ज भरण्याची घाई दिसून येत आहे. काही वेळापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी नितीन गडकरी यांच्यासह स्वतः मुख्यमंत्रीही अर्ज भरताना उपस्थित असणार असल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
चेहऱ्यावर तलवारीनं वार करुन एनसीपीच्या माजी नगरसेवकाची निर्घृण हत्या
एनसीपीच्या माजी नगरसेवकाची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. परळी येथील उड्डाणपुलाखाली पांडुरंग गायकवाड यांची तलवारीनं वार करून हत्या करण्यात आली. पहाटेच्या सुमारास काही अज्ञातांनी गायकवाड यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. गायकवाड यांची पत्नी राष्ट्रवादीची नगरसेविका आहे. या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
6 वर्षांपूर्वी -
एनसीपी-काँग्रेसचे उमेदवार भाजपने पळवले, अन फडणवीस म्हणतात आघाडीला उमेदवार मिळेना?
भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरात फुटला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी अंबाबाईचं एकत्रित दर्शन घेतलं. त्यानंतर झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते निवडणूक लढायला तयार नसल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. भारतीय सैन्याच्या कामगिरीवर संशय घेणाऱ्यांवरही मुख्यमंत्र्यांनी टीकेची तोफ डागली. तर शिवसेना-भाजपा युती म्हणजे फेविकॉलचा जोड आहे, तुटणार नाही अशी ग्वाहीदेखील त्यांनी राज्याच्या जनतेला दिली.
6 वर्षांपूर्वी -
चौकीदारकडून डिजिटल चोरी; पक्षाच्या वेबसाईटसाठी दुसऱ्या कंपनीचा फुकट कोड चोरल्याचा आरोप
भाजपने त्यांच्या पक्षाच्या अधिकृत वेबसाईटसाठी टेम्प्लेट चोरल्याचा आरोप आंध्र प्रदेशातील एका वेब डिझाईन कंपनीनं केला आहे. भाजपानं कोणतंही क्रेडिट न देता टेम्प्लेटची बॅकलिंक काढून टाकल्याचा आरोप डब्ल्यूथ्रीलेआऊट्सनं (W3Layouts) केला. भाजपानं टेम्प्लेटसाठी कोणतंही क्रेडिट दिलं नाही. उलट त्याची बॅकलिंक मुद्दामहून काढून टाकली, असा दावा कंपनीनं केला.
6 वर्षांपूर्वी -
कोल्हापूरचा सभेला थेट कर्नाटकातून माणसं आणली, मराठी समजत वा बोलताही येत नव्हतं
भाजपा आणि शिवसेनेची पहिली जाहीर सभा कोल्हापुरात झाली. तेव्हा संपूर्ण मैदान भरून रस्त्यापर्यंत गर्दीचा रेकॉर्ड झाला. या तुफान सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाच्या तीन मित्रपक्षांचे नेते रामदास आठवले, विनायक मेटे आणि महादेव जानकर व्यासपीठावर उपस्थित होते. मात्र उपस्थित प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी जेव्हा अनेक लोकांशी व्यक्तिशः बोलून पाहिलं तेव्हा मोठ्या प्रमाणावर बसलेल्या महिलांना ना मराठी येत होतं, ना मराठी समजत होतं हे त्यांनी कॅमेरावर मान्य केलं. त्यावरूनच हे लोंढे जवळच्या सीमेवरून म्हणजे कर्नाटकातून आणल्याचं प्रसार माध्यमांच्या ध्यानात आलं आणि त्याचे व्हिडिओ देखील समाज माध्यमानावर व्हायरल झाले आहेत. त्यावरून सत्ताधाऱ्यांनी जनसागर दाखवण्यासाठी किती पैसा खर्ची केला आहे याचा प्रत्यय येत होता.
6 वर्षांपूर्वी -
यांचं सगळंच अवघड झालं राव! अशोक चव्हाणही राजीनाम्याच्या तयारीत?
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यावरून काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. खुद्द काँग्रेसनेतेअशोक चव्हाण यांनीच आपण प्रदेशाअध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे कार्यकर्त्याशी बोलताना म्हटले. या संदर्भातील एक ऑडियो क्लीप सध्या व्हायरल झाली असून त्यात ते राजीनामा देण्याच्या तयारीत सांगत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभा निवडणुकीदरम्यानचा मनसेचा कार्यक्रम असा असेल?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदाची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला आणि विधानसभेच्या कामाला लागा असा संदेश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काही दिवसांपूर्वी दिला. मनसे लोकसभा निवडणूक लढणार नसली तरी यंदाच्या लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षा विरोधी प्रचार करण्याची पक्ष एक गेमप्लॅन तयार करत आहे असं प्रथम दर्शनी दिसतं. स्वतः राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना ‘यंदाची लोकसभा निवडणूक ही मोदी विरुद्ध देश’ असल्याचे थेट मत प्रदर्शन करत, कार्यकर्त्यांना एक कार्यक्रम आखून देण्याचा प्रयत्न केला.
6 वर्षांपूर्वी -
दिल्ली पाकिस्तानी उच्चायुक्तालयात पाकिस्तान राष्ट्रीय दिन साजरा, मोदींकडून शुभेच्छा
पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना शुभेच्छा संदेश पाठवला. दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात होणाऱ्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमावर भारताने बहिष्कार घातला. पण त्याचवेळी मोदींनी पाकिस्तानी जनतेला राष्ट्रीय दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.
6 वर्षांपूर्वी -
भाजपाची दुसरी यादी; पुण्यातून बापट तर बारामतीतून कुल यांना उमेदवारी
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री गिरीश बापट यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी जाहीर झाली आहे. काल रात्री उशिरा भाजपने या उमेदवार यादीची घोषणा केली. बारामती मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. कुल या राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहूल कुल यांच्या पत्नी आहेत. बारामतीमध्ये आता एनसीपीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध कुल असा सामना होईल.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचा निरव मोदी? PNB बँकेने कर्जबुडव्या म्हणून घोषित केलं त्यालाच सेनेकडून उमेदवारी
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पीएनबी घोटाळा आणि देशातून पळ काढणारा निरव मोदी आधीच भाजपची डोकेदुखी ठरलेला असताना, आता शिवसेनेत देखील एक प्रति निरव मोदी असल्याचं उघड झालं आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीला देखील PNB म्हणजे पंजाब नॅशनल बँकेनेच कर्जबुडव्या म्हणून अधिकृतपणे घोषित केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
पीएम नरेंद्र मोदी सिनेमासाठी जावेद अख्तर यांनी कोणतही गाणं लिहिलं नाही, तरीही पोष्टरवर नाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर प्रदर्शित होत असलेला सिनेमा सुरवातीलाच अडचणीत सापडला आहे. कारण असं आहे की या सिनेमासाठी कोणताही गाणं लिहिलेलं नसताना देखील त्याच्या पोश्टरवर जावेद अख्तर यांचं नाव झळकलं आहे. त्यामुळे जावेद अख्तर त्याविरूद्ध कोणाचीही कायदेशीर कारवाई करणार का ते पाहावं लागणार आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL