सिडनी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात आघाडीच्या फलंदाजांचे अपयश भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवाला मूळ कारण ठरले आहेत. दरम्यान, कांगारूंनी विजयासाठी ठेवलेल्या २८९ धावांचा पाठलाग करताना भारताचे पहिले ३ फलंदाज केवळ ४ धावांवर तंबूत परतले. त्यात रोहित शर्माने १३३ धावांची जिगरबाज खेळी केली तर आणि महेंद्रसिंग धोनीने ५१ धावा करत रोहितला उत्तर साथ दिली होती.

परंतु, धावा आणि चेंडू यांच्यातील फरक प्रचंड वाढत गेला आणि विजय दूर लोटला गेला. रोहित ४६व्या षटकांत तंबूत परतला आणि भारताचा पराभव जवळजवळ निश्चित झाला. त्यानंतर कांगारूंनी ३४ धावांनी सामना जिंकला. त्याआधी फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ५ बाद २८८ धावा केल्या होत्या.

aus vs ind 1st one day match at sydney won by aus