पर्थ : भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान विराट कोहलीच्या संयमी खेळीने आणि त्याला चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांची लाभलेली साथ.यामुळे आज दुसऱ्यादिवशी भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत चिकाटीने पुन्हा कमबॅक केला आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियन टीमचा पहिला डाव ३२६ धावांवर आटोपला होता. त्यानंतर मैदानावर उतरलेल्या भारतीय टीमच्या दोन्ही सलामीवीरांनी निराशा केली आणि ते केवळ ८ धावांवर तंबूत परतले. त्यानंतर, कप्तान कोहलीने सुरुवातीला पुजारा आणि त्यानंतर मैदानात उतरलेल्या रहाणेसोबत अर्धशतकी भागीदारी रचली आणि संघाला दुसऱ्या दिवसअखेर ३ बाद १७२ धावा अशा सुस्थितीत ठेवले आहे. सध्या विराट कोहली ८२ धावांवर, तर रहाणे ५१ धावांवर खेळत असून भारत अद्याप १५४ धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे उद्या भारतीय फलंदाज पुन्हा काय खेळतात ते पाहावं लागणार आहे.
Stumps on Day 2 of the 2nd Test.
A solid 90-run partnership between @imVkohli and @ajinkyarahane88 as #TeamIndia end Day 2 on 172/3, trail Australia (326) by 154 runs.
Scorecard – https://t.co/kN8fhHfivo #AUSvIND pic.twitter.com/cJ6xp2yTLg
— BCCI (@BCCI) December 15, 2018
