3 May 2025 11:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

बुडत्या जहाजाची जाणीव? खासदार कपिल पाटील भाजपला रामराम करत काँग्रेसवासी होणार?

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार वरिष्ठ काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे. ठाणे भिवंडी मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे खासदार कपिल पाटील हे सध्या ठाणे जिल्ह्यात भाजपचे एकमेव खासदार आहेत. त्यात स्वतः कपिल पाटील यांनीच काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेस प्रवेशबाबत तब्बल ३ वेळा भेट घेऊन चर्चा केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

त्यामुळे सध्या भाजपमध्ये अनेक नाराज असलेली आमदार आणि खासदार मंडळी काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या संपर्कात असल्याचे समोर येते आहे. दरम्यान, काँग्रेसने भारतीय जनता पक्षातील नाराज नेत्यांना हेरून ठेवतानाच सध्या तरी कोणतीही प्रतिक्रिया न देता त्यांना ‘वेट अँड वॉच’ असं धोरण स्वीकारलं आहे.

परंतु, लोकसभा निवडणुका केवळ ४-५ महिन्यावर आल्या असताना भाजपसाठी यासर्व राजकीय घडामोडी डोकेदुखी वाढवणाऱ्या ठरू शकतात. दरम्यान, २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव अनुभवणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने सुद्धा सावध भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. कारण सध्या दोन्ही पक्षांदरम्यान जागावाटपाची बोलणी सुरू आहेत. परंतु, देशभरात भाजपविरोधात वातावरण तापू लागल्याची चुणूक भाजप नेत्यांना सुद्धा लागली आहे. त्याची विशेष झलक पाहायला मिळाली ती ३ हिंदी भाषिक राज्यांच्या विधानसभा निवणुकीदरम्यान आणि त्यामुळे काँग्रेसला पोषक वातावरण तयार होताना दिसत आहे. विशेष म्हणजे देशातील शेतकरी, कामगार, दलित आदी वर्ग भाजप सरकारवर प्रचंड नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे २०१४ मध्ये मोदी लाटेत निवडून आलेले भाजपमधील अनेक खासदारांना आपण पुन्हा खासदार होऊ की नाही याची शाश्वती वाटत नाही आणि त्यामुळेच ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे समजते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या