4 May 2025 9:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

..अन्यथा मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही | खा. नवनीत राणा संतापल्या

MP Navneet Rana Kaur, CM Uddhav Thackeray, Matoshri

अमरावती, ४ नोव्हेंबर: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पूर आणि अतिवृष्टीचा जोरदार आर्थिक फटका बसला आहे. ठाकरे सरकारने बळीराजासाठी १०,००० करोड रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच ही मदत शेतकऱ्यांना लवकरात लवकर वितरीत करण्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. परंतु, ही मदत शेतकऱ्यांसाठी अत्यंत तुटपुंजी असून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या शेतात अजून पंचनामे झाले नसल्याचं अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. तसेच शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,००० मदत देण्याची घोषणा जाहीर केली होती. यावर राणा म्हणाल्या की, ‘अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नगदी पीक – सोयाबीनचे नुकसान होऊन ते पूर्ण हातातून गेले. यानंतर कपाशीवर मोठ्याप्रमाणात बोंड अळी आणि लाल्या रोग आला आहे. त्यामुळे कपाशीचे पीकसुद्धा वाया गेले आहे. यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत ताबडतोब जाहीर करावी. दिवाळीपूर्वी बळीराजाच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी ५०,००० रुपये जमा करावी. अन्यथा मुख्यमंत्र्यांना मातोश्रीवर दिवाळी साजरी करू दिली जाणार नाही असा थेट इशाराच नवनीत राणा यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमवीर काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, अजित पवार या प्रमुख नेत्यांनी नुकसानग्रस्त भागाचे दौरे केले होते. यानंतर महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १०,००० करोडचे आर्थिक पॅकेज अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. फळबागांसाठी हेक्टरी २५,००० रुपये मदतीची घोषणा करण्यात आली होती.

 

News English Summary: Farmers in Maharashtra have been hit hard by floods and heavy rains. The Thackeray government has announced a grant of Rs 10,000 crore for farmers. The Chief Minister also announced to distribute this aid to the farmers as soon as possible. However, this aid is very meager for the farmers and a large number of farmers have not yet got their panchnama, said Amravati MP Navneet Rana.

News English Title: MP Navneet Rana Kaur criticized CM Uddhav Thackeray over farmers issues News Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या