29 April 2024 10:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

मोदींचे कुटुंब असते तर तेही सहलीला गेले असते: आनंद शर्मा

Congress, Narendra Modi, Loksabha Election 2019

नवी दिल्ली : राजीव गांधी यांनी जे केले तेच कोणत्याही पंतप्रधानाने केले असते. पण सध्याच्या पंतप्रधानांना कुटुंबच नाही. ते असते तर तर मोदीही तिथे गेले असते. आता ते एकटेच जातात कारण त्यांचा त्यांच्या कुटुंबियांशी कोणताही संबंध नाही आणि त्यांना कुटुंबाबद्दल आदरही नाही, अशी खोचक टीका काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केली आहे.

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कथित कौटुंबिक सहलीवरून सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राजीव गांधी यांच्या ‘त्या’ सहलीसाठी आयएनएस विराट या युद्धनौकेचा गैरवापर करण्यात आला होता, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. त्यानंतर आरोप प्रत्यारोपाना तोंड फुटले होते.

त्या सहलीसाठी INS विराटचा गैरवापर झाला नव्हता असा दावा माजी नौदलप्रमुखानी केला होता तर असा गैरवापर झाला होता असा दावा आणखी एका माजी नौदल अधिकाऱ्याने केला होता. या सहलीत राजीव गांधी यांच्यासोबत सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, सोनिया गांधी यांचे काही नातेवाईक, आणि राजीव यांचे मित्र सहभागी होते, असा थेट आरोप आहे.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x