26 April 2024 7:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

भीषण बेरोजगारी? रेल्वे पोलिसांच्या केवळ १११७ जागांसाठी तब्बल १४ लाख ७१ हजार अर्ज

Narendra Modi

मुंबई : भारतीय रेल्वे विभागाकडून रेल्वे पोलीस दल आणि रेल्वे पोलीस सुरक्षा दलाच्या उपनिरीक्षक संवर्गासाठी (आरपीसीएफ) १११७ जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान या जागांच्या भरतीसाठी देशभरातून तब्बल १४ लाख ७१ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याचे वृत्त आहे. म्हणजेच एका जागेसाठी जवळपास १३१७ विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे आहे. यात अर्ज करणारे सर्वाधिक उमेदवार हे महाराष्ट्रातून असल्याचे समजते.

देशात आजही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तरुण आणि तरुणींमध्ये चाललेली स्पर्धा आणि देशभरात मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली बेरोजगारी यांच्याकडे पाहिल्यास कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? अस म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. दरम्यान स्पर्धा परीक्षांकडे तरुणाईचा कल वाढला असून गावकडील मुले देखील आज स्पर्धा परीक्षांवर जोर देत आहेत. त्यातून या स्पर्धा परीक्षांचे महत्त्व आणि स्पर्धा वाढली आहे. त्यातच, पोलीस भरती, सैन्य भरती आणि रेल्वे भरती यासाठीही ग्रामीण भागातील तरुण मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. नोकरीच्या अधिकृत जाहिरातीसाठी तरुण दैनिक वर्तमानपत्र आणि संबंधित वेबसाईटवर अपडेट असतात.

नुकतेच रेल्वे विभागाकडून RPF आणि RPSF संवर्गातील उपनिरीक्षक पदांच्या १११७ जागांसाठी भरती काढण्यात आली आहे. या भरतीला एकूण १४ लाख ७१ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यामध्ये पुरुष प्रवर्गासाठी एकूण ८१६ जागांची रिक्त पदे भरण्यात येत आहेत. या ८१६ जागांसाठी १२.४० लाख उमेदवारांचे अर्ज आले आहेत. तर, महिला प्रवर्गातील ३०१ रिक्त पदांसाठी एकूण २.३१ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे ही संपूर्ण परिस्थिती पाहता देशातील बेरोजगारी किती भीषण झाली आहे याचा अंदाज येतो. त्यामुळे केवळ सरकारी नोकरी नाही तर खाजगी क्षेत्रात देखील अधिक रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी मोठी मेहनत घेणं अत्यंत गरजेचं आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x