14 May 2024 2:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल स्टॉकला या प्राईसवर पुलबॅकचे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा अलर्ट EPFO Online Claim | पगारदारांसाठी अलर्ट! तुमचा नंबर सुद्धा त्यात नाही ना? पुढे क्लेम सेटलमेंट कशी असेल? Mobile Recharge Hike | बापरे! कोट्यवधी मोबाइल युजर्सना झटका लागणार! मोबाईल रिचार्ज खर्च 25% वाढणार Budh Rashi Parivartan | बुध राशी परिवर्तन, या 5 राशींसाठी पुढचे 17 दिवस अत्यंत लाभदायक, तुमची राशी कोणती? Mutual Fund SIP | पगारदारांची पसंती 'या' स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांना, नोकरदार वर्ग मालामाल होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! जुलैपासून बदलणार DA ची रक्कम, किमान वेतनात वाढ होणार RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा?
x

यूपीए सरकारने चांगली धोरणे राबविली होती, आज ते होताना दिसत नाही - अभिजीत बॅनर्जी

Lockdown, Nobel winner Abhijit Banerjee, Congress MP Rahul Gandhi

नवी दिल्ली, ५ मे: करोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या वेगवेगळ्या मान्यवरांशी लॉकडाऊन चर्चा करताना अर्थव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त करताना दिसत आहेत. मंगळवारी त्यांनी नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांच्याशी खास बातचीत केली. यावेळी, अभिजीत बॅनर्जी यांनी ‘यूपीए सरकारनं चांगल्या अर्थनीती लागू केल्या होत्या. परंतु, आता मात्र त्या नीती सरकार लागू करताना दिसत नाही. यूपीए सरकारनं ज्या आधारावर या योजना लागू केल्या होत्या त्यांना सद्य सरकारनंही योग्य असल्याचं सांगितलंय आणि त्याच्यावरच काम केलंय’, असं म्हटलंय.

राहुल गांधींनी अभिजीत यांना विचारले, नोबेल पारितोषिक जाहीर झाले त्यावेळी तुम्हाला काय वाटले, हा पुरस्कार मिळेल, असे वाटले होत का? या प्रश्नावर अभिजीत यांनी उत्तर दिले, मी असा असा विचार कधीच केला नव्हता.

अभिजीत बॅनर्जी म्हणाले की, यूपीए सरकारने खूप चांगली धोरणे राबविली होती, पण आता तसे होताना दिसत नाही. हे सरकार ती धोरणे राबवत नाही. आधारसारखी योजना जी यूपीए सरकारने राबविली, या सरकारनेही ती योग्यच असल्याचे सांगितले आणि त्यावर कार्य केले. आजच्या काळात अशी सुविधा अगदी योग्य असल्याचे सिद्ध होऊ शकते, परंतु ती करता आलेली नाही. म्हणजेच राष्ट्रव्यापी योजना लागू केलेली नाही.

देशातल्या जनतेच्या हाती थेट पैसा दिल्यास समस्या कमी होण्याऐवजी त्या वाढतील, अशी भीती बॅनर्जींनी व्यक्त केली. ‘अर्थव्यवस्था ठप्प असताना लोकांच्या हाती थेट पैसा देणं योग्य ठरणार नाही. उत्पादन आणि मागणी यामधील अंतर वाढल्यास महागाई वाढेल. त्यामुळे सरकारनं आता लोकांच्या हाती पैसा न देता दोन महिन्यांनंतर द्यावा. लॉकडाऊन संपल्यानंतर तो लोकांना खर्च करता येईल,’ असं बॅनर्जी यांनी म्हटलं.

आज देशाला पैशाची चिंता भेडसावत आहे. बँकांसमोर अनेक आव्हानं आहेत तसंच नोकऱ्या वाचवणंही कठीण होऊन बसतंय, असं राहुल गांधी यांनी म्हटलं. यावर, ‘देशाला एका आर्थिक पॅकेजची आवश्यकता आहे. अमेरिका-जपान सारख्या देशांनीही हेच केलंय. परंतु, आपल्याकडे मात्र असं घडलेलं नाही. छोट्या उद्योगांना मदतीची गरज आहे. या तिमाहीचं कर्ज माफ करण्याची गरज आहे.’ असं म्हणत अभिजीत बॅनर्जी यांनी या परिस्थितीच्या आकलनाला दुजोरा दिला.

 

News English Summary: Abhijeet Banerjee said that the UPA government had implemented very good policies, but now it does not seem to be happening. This government is not implementing those policies. The UPA government, which implemented a scheme like Aadhaar, also said it was right and acted on it. Such a facility may prove to be quite appropriate nowadays, but it has not been possible. That is, the nationwide plan has not been implemented.

News English Title: Story corona virus lockdown congress MP Rahul Gandhi in conversation with Nobel winner Abhijit Banerjee congress News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x