26 April 2024 8:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

धार्मिक अध्यात्म | या कारणामुळेच तुमच्या घरात पैसा टिकत नाही - आर्य चाणक्य

Money Life, Acharya Chanakya Niti, Religious Adhyatma, Marathi News ABP Maza

मुंबई, १८ सप्टेंबर : घरात पैसे टिकत नसतील तर चाणक्यांनी सांगितलेली नीतीमूल्ये तुमच्या उपयोगी पडतील – काय आहेत ही मूल्ये पाहूया. चाणक्य नीतीनुसार धन किंवा पैशाचा जर संचय करायचा असेल, तर सगळ्यात उत्तम पद्धत आहे की अनावश्यक खर्च न करणे. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीग्रंथात अशी बरीच नीतीमूल्ये सांगितली आहेत, ज्याच्या आचरणाने कोणत्याही व्यक्तिला जीवनात येणार्‍या अडचणींवर पर्याय मिळू शकेल.

पैशाच्या बाबतीत सुद्धहा आचार्य चाणक्यांनी आपल्या पुस्तकात कितीतरी गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांच्या मतानुसार, प्रत्येक व्यक्तिला आपल्या भविष्य काळात येणार्‍या वाईट दिवसांचा आधीच विचार करून पैशाची बचत आधीच करून ठेवली पाहिजे. चाणक्य यांच्या मते, कोणत्याही व्यक्तीने अशा ठिकाणी राहू नये, जिथे त्याच्यासाठी रोजगार, काम, शिक्षण, शुभचिंतक आणि आदर व सन्मानाची कमी असेल.

चाणक्य म्हणतात, कधीही पैशाचा किंवा धनाचा मोह ठेवू नये, ज्यामुळे आपल्याला आपला धर्म सोडावा लागेल, आणि शत्रूची खुशामत करावी लागेल. चला तर मग जाणून घेऊया, जर तुम्ही पैशाची बचत करू शकत नसाल तर, चाणक्य नीतिनुसार तुम्हाला काय शिकले पाहिजे, काय आत्मसात केले पाहिजे, स्वत:मध्ये कोणते बदल केले पाहिजेत:

अनावश्यक धन खर्च करू नका:
चाणक्य नीतिनुसार धन साठवण्याची सगळ्यात उपयोगी पद्धत आहे, की अनावश्यक खर्च न करणे. त्यांच्या मते, प्रत्येक व्यक्तिला पैशाच्या बाबतीत खूपच सतर्क राहायला पाहिजे व पैसा हा फक्त एक जीवन जगण्यासाठी “साधन” आहे त्याप्रमाणे त्याचा उपयोग केला पाहिजे. म्हणजेच, फक्त जीवनासाठी जरूरी म्हणून त्याचा उपयोग केला पाहिजे. साधन हे व्यक्तिला उत्तम बनवते, म्हणूनच त्याचा उपयोग विचारपूर्वक करावा. जिथे जरूर नाही, तिथे उगाच धन खर्च करू नये. जेव्हा जरूर असेल, तेव्हाच त्याचा उपयोग करावा.

धनसंचयाबरोबर गुंतवणूक पण जरूरी:
चाणक्य नीतिनुसार धनाचा योग्य प्रकारे उपयोग पण करता आला पाहिजे. बचत करण्याबरोबर धनाची गुंतवणूक पण तितकीच जरूरी आहे. त्याचा योग्य कामासाठी उपयोग व योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे जरूरी आहे व शक्य असेल तर गरजुना मदत करावयास विसरू नये. चाणक्य नीतिनुसार, ज्याप्रमाणे हंड्यात भरलेले पाणी जर उपयोगात आणले नाही, तर खराब होते, त्याचप्रमाणे, धनाचा योग्य उपयोग केला गेला नाही, तर त्याची काही किंमत राहात नाही. तसेच, धन कमावण्यासाठी माणसाकडे काहीतरी उद्देश असला पाहिजे, काहीतरी ध्येय असले पाहिजे. कोणतेही लक्ष जर डोळ्यासमोर नसेल, तर सफलता मिळवणे कठीण आहे.

अनावश्यक चैनी करु नये:
आचार्य चाणक्य यांच्या नीतीमूल्याप्रमाणे व्यक्तिने धन प्राप्तीसाठी लोभ करु नये. धन आणि दौलतीने जीवनात समतोल साधता येतो, म्हणूनच, आपल्यासाठी एवढेच धन आवश्यक आहे, जे आपल्या प्रार्थमिक गरजा भागवू शकेल. चैनीसाठी पैसा खर्च करण्यापासून स्वत:ला वंचित ठेवले पाहिजे. व्यक्तिला आपल्या मूलभूत गरजांसाठीच धन खर्च केले पाहिजे. व्यक्तीने आपल्या श्रीमंतीचे अनावश्यक प्रदर्शन करू नये. धनाचे प्रदर्शन केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि आपल्याला तिच्या कृपेपासून वंचित ठेवते.

पैशाचे अयोग्य नियोजन:
प्रत्येक महिन्याला पैसा तर मिळतो, ठराविक रक्कम हातात तर येते मात्र त्याचे व्यवस्थापन, त्या पैशाचे योग्य नियोजन, कसे करायचे याची जाणीव 90 टक्के लोकांना नसते. पैसा मिळवायचा कसा याचे नियोजन मात्र अनेक लोक करतात, व त्यांचा प्लॅन हि ते सांगू शकतात पण मिळलेल्या पैशाचे योग्य व्यवस्थापन हे देखील महत्वाची गोष्ट आहे. पैसा मिळवणे या जगात एवढी अवघड गोष्ट नाही पण पैशाचे योग्य नियोजन व योग्य ठिकाणी त्याची गुंतवणूक करणे ही महत्त्वाची गोष्ट आहे.

 

News English Summary: A renowned teacher, philosopher, jurist, economist and royal advisor of ancient India, Kautilya, popularly known as Chanakya is the author of the famous political treatise Arthashatra. His story of falling ut with Dhananda lading him to seek revenge on the great empire by guiding and assisting the young ChangraguptaMaruya is well known to all. However, what one might know is that Chanakya’s book and his advises not only held relevance then, but is of extreme importance till date, even in the world of finance and investments.

News English Title: Money life lessons from Acharya Chanakya Niti Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Religion(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x