26 April 2024 12:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर SBI Mutual Fund | तज्ज्ञांनी सुचवल्या 5 व्हॅल्यू फंड योजना, SBI सहित मालामाल करणाऱ्या टॉप SIP योजना सेव्ह करा
x

काँग्रेसने शेजारी राष्ट्रांसोबत निर्माण केलेले संबंध मोदींनी संपुष्टात आणले | शेजारी सर्वत्र शत्रू

Congress Rahul Gandhi, Modi govt, International relations, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, २३ सप्टेंबर : कोरोना व्हायरस, देशातील परिस्थिती, भारत-चीन तणाव, अर्थव्यवस्था, कृषि विधेयके यासह विविध मुद्दयांवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचे एक ट्विट केले आहे. गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेसने निर्माण केलेले व वाढवलेले संबंध मोदींनी संपुष्टात आणले असा आरोप आता राहुल यांनी केला आहे.

“मोदींनी गेल्या अनेक दशकांमध्ये काँग्रेसने (अनेक देशांबरोबर) निर्माण केलेले चांगले संबंध संपुष्टात आणलेत. आजूबाजूला एकही मित्र नसणे धोकादायक आहे” असं एक ट्विट केलं आहे. यासोबतच भारताचे बांगलादेशसोबत बिघडत असलेले संबंध आणि त्यांची चीनशी वाढत असलेली जवळीक यासंबंधीत असलेल्या एका बातमीचा फोटोही पोस्ट केला आहे. राहुल गांधी यांनी याआधीही मोदी सरकारवर निशाणा साधला होता. ”मोदींनी शेतकऱ्यांना समूळ नष्ट करून, भांडवलदारांचा मोठा विकास केला” अशी जोरदार टीका केली होती.

दरम्यान तीन वर्षांपूर्वी २०१७ साली डोकलाममध्ये भारतीय आणि चिनी सैन्य आमने-सामने आलं होतं. भारताने त्यावेळी चीनची दादागिरी खपवून न घेता कठोर भूमिका घेतली, त्यामुळे चीनला मागे हटावं लागलं. पण त्यानंतर चीनच्या रणनितीक उद्दिष्टांमध्ये मोठा बदल झाला. मागच्या तीन वर्षात चीनने भारताजवळच्या सीमाभागांमध्ये एअर बेस, एअर डिफेन्स सिस्टिम आणि हेलिपॅडची संख्या दुप्पट केली आहे.

चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तीन हवाई तळ, पाच कायमस्वरूपी हवाई संरक्षण ठाणी आणि पाच हेलिपोर्ट अशी किमान १३ नवी लष्करी ठाणी बांधण्यास सुरुवात केल्याचे ‘स्ट्रॅटफॉर’ या जागतिक सुरक्षा सल्लागार संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे. “लडाख सीमावाद सुरु होण्याआधी चीनकडून भारतीय सीमांजवळ लष्करी तळांची उभारणी करण्यात आली. सीमेवरील सध्याचा तणाव म्हणजे सीमा भागांवर नियंत्रण मिळवण्याच्या चीनच्या मोठया रणनितीचा भाग आहे” असे सीम टॅक म्हणाले. ते स्टार्टफॉरचे वरिष्ठ जागतिक विश्लेषक आहेत.

 

News English Summary: Rahul Gandhi has been constantly criticizing Prime Minister Narendra Modi and the Modi government. Rahul Gandhi has once again attacked the Modi government. He tweeted about it from his Twitter account. Rahul has now accused Modi of ending the ties that the Congress has forged and enhanced over the last several decades.

News English Title: Congress Rahul Gandhi attacks Modi govt over international relations of India Bangladesh Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x