नवी दिल्ली, ८ जानेवारी: पाऊस आणि कडाक्याच्या थंडीतही दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी कृषी कायदे रद्द करण्यावर ठाम आहेत. तर मागे हटणार नाही, असं केंद्र सरकारने पुन्हा एकदा कृषी कायद्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. १५ जानेवारीला शेतकरी नेते आणि केंद्र सरकारमध्ये पुढील चर्चा होणार आहे.

शेतकरी संघटना आणि सरकारमधील तिढा सोडवण्यासाठी पंजाबच्या नानकसार गुरुद्वाराचे प्रमुख बाबा लखा यांच्याशी प्रस्तावावर चर्चा केली आहे का? तर असा कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही, असं तोमर यांनी स्पष्ट केलं.

कायदा परत घेतलात तरच आमची घरवापसी होईल, असं यावेळी एका नेत्याने बैठकीत सांगितल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे. यावेळी एका नेत्याने सुप्रीम कोर्टाने शेती हा राज्याचा विषय असल्याने केंद्र सरकारने हस्तक्षेप करु नये असं सुनावलं. “सरकारला या विषयावर तोडगा काढायचा आहे असं दिसत नाही. कारण गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. आम्हाला स्पष्ट काय ते सांगा आम्ही येथून निघून जातो. उगाच प्रत्येकाचा वेळ का वाया घालवायचा,” असं त्यांनी सांगितलं.

 

News English Summary: Despite the rains and severe cold, farmers protesting on the Delhi border are adamant on repealing agricultural laws. The central government has once again clarified its position on agricultural laws. Further discussions will be held on January 15 between the farmers’ leaders and the central government.

News English Title: Only if you take farm law return then farmers protest will stop said news updates.

कायदा परत घेतलात तरच आमची घरवापसी होईल….अन्यथा | शेतकऱ्यांची गर्जना