महत्वाच्या बातम्या
-
Ration Card Rules | देशभरात रेशनींगचा नवा नियम लागू, केंद्र सरकारचा या निर्णयामुळे रेशन कार्ड धारकांवर काय परिणाम?
Ration Card Rules | जर तुम्हीही रेशन कार्डच्या माध्यमातून सरकारच्या ‘फ्री रेशन स्कीम’चा लाभ घेत असाल तर ही बातमी वाचून तुम्हाला आनंद होईल. यापूर्वी शासनाकडून मोफत शिधावाटप योजनेला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. दुसरीकडे सरकारची महत्वाची योजना ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ देशभरात लागू करण्यात आली आहे. त्यानंतर सर्व रेशन दुकानांवर ऑनलाइन इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल (पीओएस) उपकरणे बंधनकारक करण्यात आली आहेत. सरकारच्या या निर्णयाचा परिणाम दिसून येत आहे.
2 वर्षांपूर्वी -
पवार विरोधक की विरोधकांचे विरोधक?, राज्यात भाजप संकटात, पण कर्ज-संशयाच्या भोवऱ्यातील उद्योग सोडून अदानींच्या विरोधकांशी भेटी-गाठी
Adani Meet Pawar | महाराष्ट्रात २०२४ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं नुकसान होणार असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये निरनिराळे सर्व्हे आणि अगदी भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत देखील भाजपाला मोठा धक्का बसणार हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे मोदी पुन्हा पंतप्रधान होणार का किंवा भाजपची पुन्हा महाराष्ट्रात सत्ता येणार का याची सर्वाधिक चिंता गौतम अदाणींना सतावू लागल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
पत्नीच्या प्रसिद्धीसाठी फडणवीसांच्या घरात रिल स्टार रियाझ अली सोबत गाण्यावर ठेका चालतो, तर पाणी प्रश्नावर घराबाहेर येण्यापूर्वीच आमदाराला असं उचललं
MLA Nitin Deshmukh | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे प्रसिद्धीत राहण्यासाठी आटापिटा करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच अमृता फडणवीस यांचं ‘आज मुड बना लिया’ गाणं प्रदर्शित झालं होतं. अमृता फडणवीस यांच्या पहिल्या पंजाबी गाण्याला अधिक प्रेक्षकांनी पाहावं म्हणून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मार्केटिंगचा देखील वापर करण्यात आला होता. त्यासाठी रिल स्टार रियाझ ली याच्यासोबत तयार केलेला व्हिडीओ खुद्द अमृता फडणवीस यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. विशेष म्हणजे हा व्हिडिओ एखाद्या स्टुडिओमध्ये नव्हे तर थेट उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी रेकॉर्ड करण्यात आला होता. त्यावेळी स्वतः उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिल स्टार रियाझ ली याच्यासोबत फोटो काढला होता. विशेष म्हणजे मुंबईतील या सरकारी निवास्थानावर जनतेचा पैसा खर्च होतं असतो आणि त्याचा उपयोग जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी करणे अपेक्षित आहे.
2 वर्षांपूर्वी -
World Population Report 2023 | चीनला मागे टाकत भारत बनला जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश
World Population Report 2023 | भारताने चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, भारत 142.86 दशलक्ष लोकसंख्येसह जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश बनला आहे आणि चीन दुसर्या क्रमांकावर घसरला आहे. तर, सर्वाधिक लोकसंख्येच्या बाबतीत अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. जवळपास तीन दशके भारताची लोकसंख्या वाढतच राहणार असल्याचा अंदाज विविध संस्थांनी व्यक्त केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
उष्मघातामुळे मृत्यू झालेल्या निष्पाप श्रीसदस्यांचा शिंदे समर्थक आमदाराकडून अपमान, म्हणाले 'दरवर्षी उष्माघाताने लोक मरतात'
MLA Sanjay Gaikawad | दोन दिवसांपूर्वी मोठ्या उत्साहात महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याला लाखोंच्या संख्येनं श्री सदस्यांनी हजेरी लावली होती. मात्र या सोहळ्याला गालबोट लागलं. सोहळ्याला उपस्थित असलेल्या काही श्रीसदस्यांचा उष्मघातामुळे मृत्यू झाला. यावरून राज्य सरकारवर सर्वच बाजूने टीका सुरु आहे. उष्मघातामुळे नाही तर चेंगराचेंगरीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप देखील काही व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर करण्यात येत आहे.
2 वर्षांपूर्वी -
कर्नाटकातील PayCM नंतर महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रालयात PayMinisters? लेटरबॉम्बमुळे भ्रष्टाचार उघड
PayMinisters | निवडणुकी दरम्यान कर्नाटकातील PayCM वादानंतर PayMLA बाबत राजकारण तापले आहे. भाजप आमदार मादल विरुपाक्ष यांच्याविरोधात काँग्रेसने ‘PayMLA’ मोहीम सुरू केली आहे. चन्नागिरीचे आमदार विरुपाक्ष आणि त्यांचा मुलगा मादल प्रशांत यांच्यावर लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. काही दिवसापूर्वी बेंगळुरूमध्ये भाजपच्या एका आमदाराचा मुलगा लाच घेताना पकडला गेला होता.
2 वर्षांपूर्वी -
पुलवामा हल्ला ते लोकसभा निवडणूक...पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागील त्रुटींना पंतप्रधान मोदी जवाबदार, माजी लष्करप्रमुखांच्या वक्तव्याने खळबळ
General Shankar Roy Chowdhury | माजी लष्करप्रमुख शंकर रॉय चौधरी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला जवाबदार ठरवले आहे. घातपातामुळे सैनिक शहीद झाले आणि त्यात गुप्तचर यंत्रणेचं म्हणजे एनएसए’चं अपयश देखील तितकेच जवाबदार आहे असं लष्कराचे १८वे माजी लष्कर सेनाप्रमुख शंकर रॉय चौधरी म्हणाले. थेट माजी लष्करप्रमुखांनी मोदी सरकारला जवाबदार ठरवल्याने पंतप्रधान मोदी आणि अजित डोवाल अडचणीत सापडले आहेत. एकूण मोदी सरकारचा खरा चेहरा उघड होऊ लागला असून सैनिकांचा वापर निवडणूक जिंकण्यासाठी केला गेल्याची जोरदार चर्चा समाज माध्यमांवर सुरु झाली आहे. यामुळे भाजप पक्ष प्रचंड अडचणीत सापडला आहे.
2 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी किंवा कर्नाटक निवडणुकीपूर्वी शिंदेंचा एक्सिट? योजना तयार, अजित पवार - फडणवीसांची राजकीय विश्वासार्हता संपुष्टात येणार?
Ajit Pawar | भाजपसोबत युती करून एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री म्हणून उत्तराधिकारी होण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या प्रयत्नांना वेग आला आहे. राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांनी संमती दिली आहे. वेळ आल्यावर ही यादी राज्यपालांना सादर केली जाईल, अशी माहिती पक्षातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
2 वर्षांपूर्वी -
VIDEO | पुलवामा हल्ला आणि लोकसभा निवडणूक, यासाठीच मोदींनी मला शांत राहण्यास सांगितलेलं, सत्यपाल मलिक यांनी 'तो' व्हिडिओ ट्विट केला
VIDEO | जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भ्रष्टाचाराबाबतच्या भूमिकेबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत मलिक म्हणाले की, “मी खात्रीने सांगू शकतो की पंतप्रधानांसाठी भ्रष्टाचार मोठी समस्या नाही”. या वक्तव्यामुळे मोदी सरकार, भारतीय जनता पक्ष आणि जम्मू-काश्मीरमध्ये स्मशान शांतता पसरली आहे.
2 वर्षांपूर्वी -
श्री सदस्यांच्या मनातील आप्पासाहेब धर्माधिकारींचं स्थान पाहून सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्र भूषण सोहळ्याचा राजकीय शक्तिप्रदर्शनासाठी उपयोग?
11 Shri Sadasya Dead in Navi Mumbai | डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याहस्ते काल महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सोहळा नवी मुंबईच्या खारघर कॉर्पारेट पार्क मैदानात झाला. मात्र या सोहळ्याला गालबोट लागलं आहे. या सोहळ्यात उष्माघातामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा १२ वर पोहोचला आहे. मुख्यमंत्री यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखाची मदत जाहीर केली असली तरी अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून या घडलेल्या प्रकाराबद्दल कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. दरम्यान, या घडलेल्या दुर्दैवी घटनेप्रकरणी धर्माधिकारी कुटुंबाकडून दुखवटा पाळण्यात आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
अमित शाहांना वेळ नव्हता म्हणून कडक उन्हाळ्यातील दुपारची वेळ? श्री सदस्यांसाठी कोणतीच सोय नव्हती, पण शिंदे समर्थकांसाठी शाही सुविधा
11 Shri Sadasya Dead in Navi Mumbai | महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या 11 जणांचा मृत्यू झाल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. अनेक लोकांवर कामोठे, वाशी, पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांची रविवारी (16 एप्रिल) रात्री विरोधी पक्षनेते अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी रुग्णांनी घडलेल्या घटनेबद्दल माहिती दिली.
2 वर्षांपूर्वी -
शिंदे-फडणवीस सरकारचा गलथान कारभार, ना अंघोळीची व्यवस्था, ना शौचालय, ना पोटात अन्न-पाणी, उष्माघातामुळे 11 श्री सदस्यांचा मृत्यू
11 Die of Heatstroke at Maharashtra | नवी मुंबईतील खारघर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्याला गालबोट लागलं आहे. या सोहळ्याला उपस्थित असलेल्या अनेक श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास सुरू झाला. यात 11 श्री सदस्यांचा मृत्यू झाला असून, कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उष्माघात झालेल्या काही जणांवर उपचार सुरू असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपचार घेत असलेल्यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. दरम्यान, मृत्यू झालेल्या 11 जणांपैकी 8 जणांची ओळख पटली असून पोलिसांनी त्यांची नाव प्रसिद्ध केली आहेत.
2 वर्षांपूर्वी -
कर्नाटकात भाजप पराभवाच्या दिशेने सुसाट! लिंगायत समाजाचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार काँग्रेसच्या वाटेवर
Jagadish Shettar to Join Congress | कर्नाटकातील लिंगायत समाजाचे मोठे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारकीचा राजीनामा दिला असून काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा की नाही, याचा निर्णय अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेला नाही. यावेळी त्यांना तिकीट दिले जाणार नाही, असे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने स्पष्ट केल्यानंतर शेट्टर यांनी राजीनामा दिला. हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघाचे आमदार शेट्टर यांनी उत्तर कन्नड जिल्ह्यातील सिरसी येथे जाऊन विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का, असे विचारले असता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री म्हणाले, ‘मी अद्याप निर्णय घेतलेला नाही.
2 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार, शिंदेंना बाजूला करण्याची तयारी, अजित पवार मुख्यमंत्री? राज्यात राजकीय त्सुनामी येणार
Ajit Pawar on The Way | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबतच्या युतीत राष्ट्रवादीचे अजित पवार यांना उत्तराधिकारी बनवण्याचा मार्ग मोकळा केला आहे. शिंदे यांच्या डोक्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या पक्षांतराच्या निकालाची टांगती तलवार असल्याने सत्ताबदल ही केवळ काळाची बाब असं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे. अजित पवार यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न साकार करण्याची घाई झाली आहे. त्यांना राष्ट्रवादीच्या ३५-४० आमदारांचा पाठिंबा असल्याने पक्षांतरबंदी कायदा लागू होणार नाही असा देखील इंडियन एक्सप्रेसने धक्कादायक खुलासा केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Metro Land Scam | शिंदे-फडणवीस सरकारचा 10 हजार कोटींचा घोटाळा, आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत धक्कादायक माहिती
Metro Land Scam | मुंबई कांजुरमार्गेमधील मेट्रो कारशेडच्या मुद्यावरून पुन्हा एकदा वाद पेटण्याची चिन्ह आहे. कांजुरमार्गमधील 15 हेक्टर जागा देत असताना कुणाला अनुदान देणार आहात? या 44 हेक्टरमधील 15 हेक्टर जागा मेट्रोला वापरणार आहे, तर उरलेली जागा कुणाला दिली जाणार आहे, बिल्डरांना दिली जाणार आहे, यावर नक्की काय होणार आहे, हा एक मोठा घोटाळा आहे, यावर मुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन कांजुरमार्गमधील जागेबद्दल नवीन खुलासा केला आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Pulwama Attack | अजित डोवाल यांची चौकशी केली तर पुलवामा हल्ल्यामागील सत्य समोर येईल असं राज ठाकरे म्हणाले होते, आज हिम्मत करतील?
Pulwama Attack | जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भ्रष्टाचाराबाबतच्या भूमिकेबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत मलिक म्हणाले की, “मी खात्रीने सांगू शकतो की पंतप्रधानांसाठी भ्रष्टाचार मोठी समस्या नाही”. या वक्तव्यामुळे मोदी सरकार, भारतीय जनता पक्ष आणि जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
2 वर्षांपूर्वी -
Pulwama Attack | देशात खळबळ! पुलवामा हल्ला आणि 2019 मधील लोकसभा निवडणुक, माजी राज्यपालांनी मोदींबद्दल धक्कादायक माहिती दिली
Pulwama Attack | जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भ्रष्टाचाराबाबतच्या भूमिकेबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत मलिक म्हणाले की, “मी खात्रीने सांगू शकतो की पंतप्रधानांसाठी भ्रष्टाचार मोठी समस्या नाही”. या वक्तव्यामुळे मोदी सरकार, भारतीय जनता पक्ष आणि जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
2 वर्षांपूर्वी -
Delhi Liquor Scam | दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी होणार, सीबीआयने समन्स बजावले
Delhi Liquor Scam | मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सीबीआय चौकशी करण्याची शक्यता आहे. त्यासाठी तारीख निश्चित करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क धोरणप्रकरणी सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना १६ एप्रिल रोजी चौकशीसाठी बोलावले आहे.
2 वर्षांपूर्वी -
प्रति वर्ष 2 कोटी नोकऱ्या निर्माण करण्यात नापास होताच, पोलीस कॉन्स्टेबल ते डाक सहायक नियुक्ती पत्र देण्याचा पीएम मोदींचा मार्केटिंग इव्हेन्ट
PM Narendra Modi | नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येताना दरवर्षी २ कोटी रोजगार निर्माण करण्याचे वाचन देशाला दिले होते. मात्र सत्तेत सलग ९ वर्ष राहूनही मोदी सरकार प्रति वर्ष २ कोटी रोजगार देण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. त्याच बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी घेरताच आता मोदी सरकारने राज्य निहाय अजब रोजगार मेळावे घेण्याचे इव्हेन्ट सुरु केले आहेत. अजब यासाठी म्हटलं, कारण दरवर्षी विविध सरकारी खात्यातील सरकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात निवृत्त होतं असतात आणि सरकार त्या रिकाम्या झालेल्या जागा भरत असतं. मात्र हा सरकारी धोरणातून ‘निर्माण’ केलेला रोजगार नसतो तर निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या खाली असलेला जागेवरील सरकारी रोजगार असतो. टीका होऊ लागताच त्याचेच आता रोजगार मेळावे भरवून मोदी सरकार इव्हेन्ट करून ते प्रसार माध्यमांकडे प्रसिद्धीसाठी वर्ग करत असल्याचं पाहायला मिळतंय.
2 वर्षांपूर्वी -
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे यांच्या निवासस्थानी राहुल गांधी, नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या बैठकीनंतर भाजपाची चिंता वाढली
Rahul Gandhi Meet Nitish Kumar & Tejasvi Yadav | बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली आज दिल्लीत विरोधी पक्षांच्या एकजुटीसंदर्भात बैठक झाली. तेजस्वी यादव, मनोज झा यांसारख्या नेत्यांसह नितीशकुमार मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी पोहोचले आणि प्रदीर्घ चर्चा केली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी देखील उपस्थित होते. बैठकीनंतर नितीशकुमार म्हणाले की, आमचा प्रचार मोठा असून लवकरच अनेक लोक एकत्र येतील. नितीशकुमार म्हणाले की, आम्ही सर्व मिळून जास्तीत जास्त पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करू. आज आमच्यात प्रदीर्घ चर्चा झाली आणि एकतेची चर्चा निश्चित झाली आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC