28 April 2024 12:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार?
x

Pulwama Attack | अजित डोवाल यांची चौकशी केली तर पुलवामा हल्ल्यामागील सत्य समोर येईल असं राज ठाकरे म्हणाले होते, आज हिम्मत करतील?

Raj Thackeray

Pulwama Attack | जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भ्रष्टाचाराबाबतच्या भूमिकेबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत मलिक म्हणाले की, “मी खात्रीने सांगू शकतो की पंतप्रधानांसाठी भ्रष्टाचार मोठी समस्या नाही”. या वक्तव्यामुळे मोदी सरकार, भारतीय जनता पक्ष आणि जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

जवानांची मागणी फेटाळली होती
फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्याच वर्षी ऑगस्टमध्ये कलम ३७० रद्द करण्यात आले तेव्हा मलिक राज्यपाल होते. पुलवामा हल्ला हाताळण्यात भारतीय यंत्रणा, विशेषत: सीआरपीएफ आणि गृह मंत्रालय अकार्यक्षम आणि हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सीआरपीएफने आपल्या जवानांची ने-आण करण्यासाठी विमानांची मागणी केली होती, पण केंद्रीय गृहमंत्रालयाने ती नाकारली होती. तसेच या मार्गाचे प्रभावीपणे सॅनिटायझेशन करण्यात आले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत फायदा घेण्याचा हेतू होता
या मुलाखतीत मलिक यांनी पंतप्रधानांवर काश्मीरबाबत चुकीची माहिती असल्याचा आणि अज्ञानी असल्याचा आरोप केला. पुलवामा हल्ल्याला कारणीभूत ठरलेल्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या त्रुटींबद्दल न बोलण्याच्या सूचना मोदींनी दिल्या होत्या, अशी धक्कादायक माहिती त्यांनी दिली. हल्ल्यानंतर काही वेळातच एका फोन कॉलमध्ये मलिक यांनी मोदींसमोर या त्रुटी मांडल्या, पण मोदींनी त्यांना याबाबत गप्प राहण्यास सांगितले. विशेष म्हणजे एनएसए अजित डोभाल यांनी या प्रकरणी मौन बाळगण्याचे निर्देश दिल्याचा दावाही मलिक यांनी केला. मलिक यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानवर दोषारोपण करून भाजप आणि सरकारला निवडणुकीचा फायदा मिळवून देण्याचा त्यावेळी हेतू होता अशी धक्कादायक माहिती मलिक यांनी या मुलाखतीत दिल्याने खळबळ माजली आहे.

कोल्हापूर 26 फेब्रुवारी 2019 – अजित डोवाल यांची चौकशी करा – राज ठाकरे
याच विषयाला नुसरून राज ठाकरे यांनी कोल्हापूर येथे 26 फेब्रुवारी 2019 रोजी खळबळजनक दावा आणि आरोप केला होता. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची चौकशी केली तर सत्य समोर येईल, असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना ‘राजकीय बळी’ म्हणून संबोधले होते.

एनएसए अजित डोभाल यांची चौकशी झाली तर पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे सर्व सत्य समोर येईल,’ असे राज ठाकरे यांनी कोल्हापुरात जाहीरपणे सांगितले होते. पुलवामा हल्ल्याच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते असं देखील ते म्हणाले होते. याच विषयावर त्यांनी सभांमध्ये लाव रे तो व्हिडिओ असा राजकीय कार्यक्रम देखील केला होता.

राज ठाकरे त्यावेळी पुढे म्हणाले होते की, ‘सर्व प्रसार माध्यमे पक्षपाती झाली नसली तरी चांगल्या माध्यमांवर सतत दबाव असतो. एनडीटीव्हीच्या कार्यालयांवरील छापे आणि ज्येष्ठ पत्रकार प्रणय रॉय यांच्यावरील दबावाची उदाहरणे देत ठाकरे म्हणाले, ‘ते ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांनी त्यांच्याविरोधात आणखी आक्रमकपणे लढा दिला पाहिजे. पण झी आणि अर्णब सारख्या लोकांकडून काहीही अपेक्षा ठेवू नका. ते शेवटी म्हणाले होते, ‘आपण पत्रकारितेला कुठे घेऊन जात आहोत? जर लोकांनी माध्यमांवर विश्वास ठेवणे बंद केले तेव्हा काय होईल? असं देखील राज ठाकरे म्हणाले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Truth of Pulwama CRPF attack will come out if Doval is probed MNS Chief Raj Thackeray were said in Kolhapur check details on 15 April 2023.

हॅशटॅग्स

#Raj Thackeray(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x