चंदीगड: पाकव्याप्त काश्मीर पाकिस्ताननं भारताला सोपवणं हे पाकिस्तानच्या हिताचं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेला पाकिस्तानसोबत रहायचे नाही, हे अनेक वृत्तांमधून समोर आले आहे. जर पाकिस्तानला युद्ध नको असेल आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानच्या हिताचा विचार असेल तर त्यांनी पाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवावा,” असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. ते चंदीगडमध्ये बोलत होते.
Union Minister Ramdas Athawale, in Chandigarh: If Pakistan wants good for itself, it should hand over Pakistan occupied Kashmir (PoK) to us. If they don’t want a war and Imran Khan thinks of Pakistan’s interest then he should hand over PoK to us. (13.09.2019) pic.twitter.com/84pgN5EnDO
— ANI (@ANI) September 14, 2019
पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना पाकिस्तानसोबत राहायचं नाही. मागील ७० वर्षांपासून पाकिस्तानने काश्मीरचा एक तृतीयांश भाग गिळंकृत केला आहे. हे प्रकरण गंभीर आहे’ असं आठवले यांनी म्हटलं आहे. चंदीगड येथे खात्याच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी रामदास आठवले यांनी असं म्हटलं आहे. ‘नरेंद्र मोदी हे धाडसी पंतप्रधान आहेत. कलम ३७० रद्द करण्याचा त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला. पाकिस्तानने अनेकदा काश्मीरचा मुद्दा उचलण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. पाकिस्तानने आता भारताला पाकव्याप्त काश्मीर सोपवला पाहिजे आणि ते पाकिस्तानच्या हिताचं असेल’ असं देखील रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
