संयुक्त राष्ट्राच्या अहवालात १० वर्षात गरिबी कमी झाली त्यात काँग्रेसचा काळ सर्वाधिक - सविस्तर
अहमदाबाद: अहमदाबादमधील मोटोराच्या क्रिकेट स्टेडियमवर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लाखोच्या जनसमुदायाला संबोधित केले. दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आलेल्या ट्रम्प यांनी ‘नमस्ते ट्रम्प’ या जंगी कार्यक्रमातील आपल्या भाषणात भारतातील अनेक गोष्टींचे कौतुक केले. मोदींच्या नेतृत्वामुळे भारत गरीबीतून बाहेर पडतोय असं म्हणताच मोदींच्या चेहऱ्यावर साह्य फुललं. मात्र ट्रम्प यांच्या भाषणातील काही मुद्दे मोदी सरकारच्या विविध योजनांचे होते आणि त्यातील वास्तव वेगळंच असताना ट्रम्प यांनी जे मांडलं ते भारत सरकारनेच लिहून दिलं होतं का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. त्यातील सर्वात आश्चर्यकारक उल्लेख म्हणजे मोदींमुळे देश गरिबीतून वेगाने बाहेर पडत आहे. यावरून ट्रम्प यांनी अधिकृत माहिती नेमकी कुठून मिळाली हा संशोधनाचा विषय होऊ शकतो.
आपल्या देशातील एकूण संमत्तीच्या वाटपात गरीब आणि श्रीमंत वर्गात मोठी तफावत असल्याचा आरोप अनेक अर्थतज्ज्ञांनी देखील अनेकवेळा केला आहे. त्यात दारिद्रय रेषेखालील लोकांची परिस्थिती खूपच हलाकीची असल्याचे अनेक अहवाल यापूर्वी प्रसिद्ध झाले आहेत. दरम्यान गरिबी कमी करण्यासाठी महत्तवपूर्ण प्रयत्न करणाऱ्या दहा देशांमध्ये भारताचा देखील सहभाग आहे. मल्टीडायमेंशनल पॉवर्टी इंडेक्स २०१९ (MPI) च्या रिपोर्टमध्ये सदर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतातील झारखंड सर्वात गरिब राज्य असून तेथील गरिबी वेगाने कमी होत असल्याचं म्हटलं आहे. हा रिपोर्ट ऑक्सफोर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह आणि युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रॅम यांनी संयुक्तपणे तयार केला होता. रिपोर्टनुसार, २००५-०६ ते २०१५-१६ दरम्यान २७.१ कोटींना दारिद्र्यरेषेतून बाहेर काढण्यात आलं. यामध्ये झारखंड राज्यात सर्वात वेगाने गरिबी कमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. २००५-०६ ते २०१४ पर्यंत देशात काँग्रेसशासित युपीएची सत्ता होती तर याच अहवालानुसार मोदी सरकारचा कार्यकाळ एका वर्षाचा आहे हे अधोरेखित होतं.
गरिबी कमी करण्यासाठी मुख्यत्वे दहा मुख्य मुद्द्यांचा विचार करण्यात आला होता. यामध्ये संपत्ती, स्वयंपाक इंधन, स्वच्छता आणि पोषण यांचा समावेश आहे. एमपीआयमध्ये १०१ देशांमधील आरोग्य, शिक्षण आणि जीवनाचा स्तर मुख्यत्वे लक्षात घेतला होता. रिपोर्टमध्ये सांगण्यात आल्यानुसार, भारताने दारिद्र्यरेषेतून बाहेर काढण्यासाठी गरिबांच्या हिताची धोरणं राबवली हे स्पष्ट होत आहे. झारखंड एक असं राज्य आहे जिथे २००५-०६ ते २०१५-१६ या १० वर्षांमध्ये गरिबी ७४.९ वरुन कमी होऊन ४६.५ टक्के राहिली आहे. भारतामधील ४ राज्यं बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात सर्वाधिक एमपीआय आहे. झारखंडने यामध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. महत्त्वाचं म्हणजे भारत त्या ३ देशांमध्ये सहभागी झाला आहे जिथे ग्रामीण क्षेत्रात कमी होणारं गरिबीचं प्रमाण शहरांपेक्षाही जास्त आहे.
रिपोर्टनुसार, भारत देशाने आपल्या येथील गरिबी ५५.१ टक्क्यांवरुन खाली आणत २७.९ टक्के म्हणजे जवळपास निम्यावर आणली आहे. भारताने जवळपास २७.१ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं आहे. याआधी गरिब लोकांची संख्या ६४ कोटी होती, जी आता ३६.९ कोटींवर आली आहे. भारताव्यतिरिक्त गरिबी कमी करणाऱ्या देशांमध्ये भारताशिवाय पेरु, बांगलादेश, कंबोडिया, नायजेरिया, पाकिस्तान, व्हिएतनाम, इथोपिया, हैती आणि कांगो गणराज्य यांचा समावेश आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी मोदी सरकारला दिलेलं श्रेय चुकीचं असल्याचं अहवाल सांगतो.
News English Summery: According to the report, India has brought its poverty down from 5 per cent to 8.2 per cent, which is almost on the net. India has eradicated some 8 million people out of poverty. Earlier, the number of poor people was 6 crore, which now stands at 8 million. Apart from India, poverty reduction countries include Peru, Bangladesh, Cambodia, Nigeria, Pakistan, Vietnam, Ethiopia, Haiti and the Republic of Congo, other than India. Therefore, the report that Trump’s credit to the Modi government is incorrect.
Web Title: Story what says United Nations report about poverty in India.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल
- Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली
- Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे 10 पेनी शेअर्स, अप्पर सर्किट हीट गतीने पैसा वाढतोय
- Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा
- Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला
- Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! मल्टिबॅगर शेअरवर मिळतील फ्री बोनस शेअर्स, 1 वर्षात 462 टक्के परतावा दिला
- Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी
- Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती?
- Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल