महत्वाच्या बातम्या
-
आमच्या उमेदवारांना मुस्लिम मते मिळाली नाहीत म्हणून पराभूत : प्रकाश आंबेडकर
लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची समीक्षा सर्वच विरोधी पक्षाकडून सुरु आहे. त्यात अनेकांनी आपला पराभव नेमका कशामुळे झाला त्याचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यावर चिंतन केल्यावर प्रकाश अमीबेडकर म्हणाले की, दलित आणि मुस्लिम हे समीकरण जसे औरंगाबादमध्ये जमून आले, तसे इतरत्र जमून आले नाही, इतर ठिकाणी मुस्लिम मते न मिळाल्यानेच वंचित बहुजन आघाडीचा मोठा पराभव झाला, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.
6 वर्षांपूर्वी -
राज्यात पाणीबाणी! धरणांमध्ये केवळ ७.७ टक्के पाणीसाठाच शिल्लक
महाराष्ट्रात भीषण पाणीसंकट ओढावलं आहे. मान्सून येत्या २ दिवसांत केरळमध्ये दाखल होणार असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. परंतु महाराष्ट्रात मान्सूनची हजेरी लागण्यास अद्याप वेळ आहे. अशातच राज्यातील धरणांमध्ये केवळ ७.७ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने महाराष्ट्राला येत्या काळात मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची बाब समोर आली आहे. मागील वर्षी यावेळी राज्यातील धरणांमध्ये १८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता तर मराठवाड्यात १४ टक्के पाणीसाठा होता परंतु या वर्षी मराठवाड्यात केवळ ०.७ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.
6 वर्षांपूर्वी -
कोकण मसुरे: बेकायदेशीररीत्या वाळू उपसामुळे नद्यांचं अस्तित्व धोक्यात; सत्ताधाऱ्यांचा कानाडोळा
कोकणातील अनेक गावं अशी आहेत ज्यांचं सौंदर्य डोळ्यात साठविण्यासारखं आहे. मात्र सत्ताधारी पक्षातील नेत्यांचेच येथील अवैध्य वाळू उपसा प्रकरणात हितसंबंध गुंतलेले असल्याने येथील नद्या आणि निसर्ग धोक्यात आले आहेत. त्यातीलच एकप्रकार म्हणजे कालावल खाडीपात्रातील मसुरे बांदिवडे डी ३ या क्षेत्रात वाळू उपशासाठी ७ जूनपर्यंतची मुदत असल्याने येथील मंजूर पासचा वापर करून तालुक्यात अन्य ठिकाणी बेकायदेशीररीत्या वाळू उपसा व वाहतूक सुरू आहे. याबाबत महसूल प्रशासनाकडे तक्रार करून सुद्धा त्याची दखल घेतली जात नसल्याने प्रशासनाच्या विरोधात बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
दक्षिणात्य नेत्यांच्या हिंदी भाषा विरोधानंतर महाराष्ट्रात मनसेचा हिंदी भाषेवरून संताप
हिंदी भाषेवरून दक्षिणेच्या राज्यातील नेत्यांकडून अत्यंत कडवट प्रतिक्रया येत असताना महाराष्ट्रात देखील हा विषय पेट घेण्याची शक्यता आहे. हिंदी भाषा शिकवण्याच्या प्रस्ताव देणारया ‘राष्ट्रीय शिक्षा निती २०१९’च्या मसुद्यावरून दिवसेंदिवस वाद चिघळत चालला आहे. देशभरातील गैरहिंदी भाषिक राज्यांमध्ये हिंदी भाषा शिकवण्याचा प्रस्ताव देण्याच्या या मसुद्याला तामिळनाडूमधून कडाडून विरोध करण्यात येतो आहे नि त्याविरोधात दक्षिणात्य नेत्यांच्या अत्यंत तिखट प्रतिक्रिया येत आहेत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील या मुद्यावर आक्रमक झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
अवजड अपमानानंतर उद्धव ठाकरे संतापले; बेरोजगारीवरून मोदी सरकारला सुनावले
जुन्या वादाला विसरून भारतीय जनता पक्ष – शिवसनेने युती करत लोकसभा निवडणुकीत यश घवघवीत मिळवले. ४ दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाला राम मंदिराची आठवण करून देणाऱ्या शिवसनेने आज पुन्हा सामनाच्या अग्रलेखातून महागाई आणि वाढत्या बेरोजगारी या मुद्यांवरुन मोदी सरकारचे कान टोचले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मागच्या ५ वर्षात दहा कोटी रोजगाराचे लक्ष्य पार करायला हवे होते, परंतु तसे अजिबात झाले नाही. केवळ भाषणात शब्दभ्रमाचे खेळ करून बेरोजगारी हटणार नाही. देशाची अर्थव्यवस्था सध्या मोठ्या संकटात आहे. नवीन अर्थमंत्री यांनी मार्ग काढावे अशी मागणी शिवसेनचा मुखपत्र असलेल्या सामनामधील अग्रलेखातून करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
चौकीदारांनी मनसेच्या कामाचं श्रेय चोरलं, मनसेने २०१६ पासून केला होता पाठपुरावा
मुंबईमध्ये सामन्यांसाठी आंदोलन करणं का मुळात भाजपचा पिंडच नाही. त्यामुळे इतर पक्षांनी केलेल्या आंदोलनाचे श्रेय लाटण्याशिवाय भाजपच्या चौकीदारांकडे पर्याय नसल्याचं दिसत आहे. त्यातीलच एक आंदोलन म्हणजे कोकणाचा चाकरमानी मोठ्या संख्येने कांजूर, भांडुप आणि विक्रोळी पट्यात राहतो आणि त्या अनुषंगाने कोकणात जाण्यासाठी प्रवासाच्या अनुषंगाने सोयीस्कर पडावं म्हणून कोकण रेल्वे भांडुप स्टेशनला सुद्धा थांबावी यासाठी मनसेने आधीचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे २०१६ पासून लेखी पाठपुरावा केला होता.
6 वर्षांपूर्वी -
भ्रष्टाचाराचे आरोपा असलेले कृपाशंकर सिंह यांना भाजपात पावन करून घेण्याच्या हालचाली
महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने पुन्हा दलबद्दल सुरु होण्याची शक्यता आहे. त्यात सर्वाधिक भरणा हा भाजपला देण्यात येईल असं म्हटलं जातं आहे. मात्र यामध्ये इतर पक्षातील भ्रष्टाचाराचे आरोप आणि चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले नेतेमंडळी अधिक असतील असं म्हटलं जात आहे. भाजप कितीही म्हणत असेल की आम्ही भ्रष्टाचाराला थारा देत नाही, पण वास्तविक इतर पक्षातील असेच भ्रष्ट नेते भाजपमध्ये आणून त्यांना पावन करून घेण्याची सुरुवात होणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा निवडणूक २०१९ : राज ठाकरेंच्या दौऱ्याला आजपासून सुरुवात
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पक्षाची नव्याने मोर्चेबांधणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत. राज ठाकरे या दौऱ्याची सुरुवात पुण्यापासून केली असून आज ते गटअध्यक्ष आणि शाखाध्यक्षांच्या बैठका घेतील. राज्यातील विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी संघटना बांधणीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत ताकदीने उतरण्यासाठी राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील प्रयत्नशील आहे. यासाठी स्वत: राज ठाकरे मैदानात उतरले असून पक्षातील मरगळ झटकण्यासाठी ते कार्यकर्त्यांच्या बैठकी घेणार आहेत. पुण्यापाठोपाठ राज ठाकरे नाशिकचा देखील दौरा करणार असल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
मनसे शेतकरी महामोर्चा! सरकारचा जीआर; शेतकऱ्यांनो शेतमाल आता थेट पालिका-नगरपालिका क्षेत्रात विका
मागील महिन्यात ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत एका आंबे विक्रेत्या शेतकऱ्याचा स्टॉल स्थानिक भाजपने हटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या समर्थनार्थ ठाण्यातील मनसे कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नैतृत्वाखाली आक्रमकपणे रस्त्यावर उतरले आणि स्थानिक भाजप नगरसेवकांपासून सर्वानाच चोप देण्यात आला. मात्र त्यानंतर विषय एवढ्यावरच न थांबता मनसेने अजून एक लोकशाही मार्गाने पवित्रा घेत १७ मे रोजी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आणि त्यांना नगरपालिका तसेच पालिका हद्दीत थेट मालाची विक्री करता यावी यासाठी सरकारवर कायद्यात तरदूत करण्यासाठी दबाव आणण्याच्या उद्देशाने शेतकरी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
6 वर्षांपूर्वी -
डॉ. पायल तडवी आत्महत्या: तिन्ही डॉक्टर आरोपींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी
नायर रुग्णालयाच्या एमबीबीएस डॉक्टर पायल तडवीच्या आत्महत्या प्रकरणाने आता संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. डॉ. पायल तडवी हिला आत्महत्येस प्रवृत्त करणार्या डॉ. भक्ती मेहरे, डॉ. अंकिता खंडेलवाल, डॉ. हेमा आहुजा यांना कोर्टाने ३१ मेपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले होते. त्यांची ही शिक्षा वाढविण्यात आली असून १० जूनपर्यंत त्यांना कोर्टाच्या कोठडीत ठेवण्यात येणार आहे. तसेच हे आत्महत्येचेच प्रकरण असून ही हत्या नसल्याचे कोर्टाने आधीच स्पष्ट केले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी गुन्हे शाखेकडे सोपविली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्रीदेखील आहेत.
6 वर्षांपूर्वी -
त्र्यंबकेश्वर: जलयुक्त शिवार योजना निष्प्रभ, गावं जलमुक्त होण्याच्या मार्गावर
तालुक्यात मागील ४ वर्षांत जलयुक्त शिवारची कामे झाली, परंतु आज तालुकाच जलमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. भूजल पातळी खोल गेली असून, गेल्या वर्षापेक्षा यावर्षी आणखी ७० ते ८० फुटांनी पाणी खाली गेले आहे. तालुक्यातील विहिरींनी कधीच तळ गाठला असून, आता हातपंपदेखील हतबल झालेले दिसत आहेत. तालुक्यात आठ शासकीय टँकर ३२ वस्त्यांना पाणीपुरवठा करीत आहेत. याशिवाय सामाजिक संस्थादेखील पाणीपुरवठा करीत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा २०१९: राज ठाकरे त्यांच्या राजकीय रणनीतीत बदल करतील का? सविस्तर
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि त्यात भाजपने देशभर मुसंडी घेत बहुमताने सत्ता काबीज केली. मात्र राज्यात बोलायचे झाल्यास इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे तगडे विरोधी पक्ष असताना देखील, भाजप आणि शिवसेनेच्या नेतेमंडळींनी प्रत्यक्ष निवडणूक निकाल लागताच मनसेवरच शेरेबाजी करत प्रतिक्रिया दिली आणि हाच मनसेचा विरोधी पक्ष म्हणून नैतिक विजय आहे. वास्तविक भाजपाला मिळालेलं यश हे देशभरातील सर्वच विरोधी पक्षांच्या विरोधातील आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर ‘लाव रे तो व्हिडिओ’ असा प्रयोग कोणत्याही विरोधी पक्षाने केला नव्हता. मात्र राज ठाकरे यांच्या सभांमुळे काँग्रेस उमेदवारांच्या २०१४ मधील मतांच्या तुलनेत मोठी वाढ झाली, मात्र प्रकाश आंबेडकरांच्या बहुजन वंचित आघाडीने दुसऱ्याबाजूने काँग्रेसची मतं खाल्ली आणि तिथेच काँग्रेस राष्ट्रवादीचं गणित बिघडल्याचे पाहायला मिळाले.
6 वर्षांपूर्वी -
लाव रे ती फुसकी लवंगी! सेनेच्या वाट्याला पुन्हा अवजड उद्योग खातं आल्याने समाज माध्यमांवर खिल्ली
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि नव्या मंत्रिमंडळाने शपथ घेतल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. या पार्श्वभुमीवर मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री झाले आहेत. तर नितीन गडकरी यांना पुन्हा रस्ते आणि वाहतूक मंत्रीपदच बहाल करण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
अवजड मालिका! सेनेच्या वाट्याला पुन्हा सामान्यांशी काहीच संबंध नसलेलं अवजड उद्योग खातं
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि नव्या मंत्रिमंडळाने शपथ घेतल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. या पार्श्वभुमीवर मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री झाले आहेत. तर नितीन गडकरी यांना पुन्हा रस्ते आणि वाहतूक मंत्रीपदच बहाल करण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
शहांना संरक्षण खातं दिलं तर पाकिस्तानचा प्रश्न कायमचा निकाली लागेल: उद्धव ठाकरे
काल नरेंद्र मोदी यांच्या बहुमतातील सरकारचा दिल्लीत शपथविधी समारोह पार पडला. त्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीय मधून मोदींवर पुन्हा स्थुतीसुमनांचा पाऊस पडला आहे. सामनात उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे, ‘देशाबरोबर जगाच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत, मोदींचे सरकार त्या दिशेने गरुडझेप घेईल अशी आशा बाळगायला हरकत नाही, मोदी-२ सरकारचा चेहरा मोदी हाच आहे असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून निक्षून सांगितलं आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील मोहरे काय करतात ते पाहायचे. नाहीतर अमित शहा यांचा चाबूक तेथे आहेच. अमित शहा यांच्या येण्याने नरेंद्र मोदी सरकारला बळ मिळेल असा विश्वास देखील उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या कृष्णकुंजवर भेटीगाठी सुरु
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वतः शरद पवार प्रयत्नशील असताना काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी त्याला तीव्र विरोध केला होता. परंतु, लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी थेट कृष्णकुंज गाठायला सुरुवात केली आहे. राज्याचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि गृह राज्यमंत्री माणिकराव ठाकरे यांनी आज राज ठाकरेंची निवासस्थानी भेट घेतली.
6 वर्षांपूर्वी -
वैद्यकीय शिक्षण: भाजप-सेनेमुळे मराठा विद्यार्थ्यांचं आयुष्य उध्वस्त? आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना आरक्षण नाही
देशातील आरक्षण नसलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण देण्याचा केंद्र सरकारने गेल्या फेब्रुवारीमध्ये निर्णय घेतला होता. यावर महाराष्ट्र सरकारने केलेल्या अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टाने न्यायालयाने स्थगिती दिली आहे. एकाबाजूला निवडणुकीत मतांसाठी मराठा समाजाच्या आरक्षणाचा कांगावा केला आणि नव्या लोकसभेच्या प्रचारापासून या विद्यार्थ्यांकडे सरकारने पूर्ण दुर्लक्ष केल्याने त्यांचे शैक्षणिक आयुष्य पणाला लागले आहे.
6 वर्षांपूर्वी -
बारावी निकालात मुलींची बाजी, कोकण टॉप, सरासरी निकाल ८५.८८ टक्के
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यात नेहमीप्रमाणेच मुलींनी बाजी मारली. विभागनिहाय आकडेवारीत कोकण अव्वल स्थानी आहे. तर नागपूरचा निकाल सर्वात कमी लागला आहे. राज्यातील एकूणच निकालाची टक्केवारी ८५.८८ टक्के आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असून मुलीचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाणा मुलांपेक्षा ७.८५ टक्के अधिक आहे. मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे आणि सचिव डॉ. अशोक भोसले यांनी ही माहिती दिली. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी एक वाजता सर्व निकाल पाहता येतील.
6 वर्षांपूर्वी -
आज राष्ट्रवादी-कॉंग्रेसची मुंबईत आढावा बैठक; तत्पूर्वी राजू शेट्टीं व राज ठाकरे यांची भेट
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज मंगळवारी मंथन बैठक आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे विरोधीनेते धनंजय मुंडे यांच्या घरी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला कॉँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टींसह इतर नेतेही उपस्थित राहणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
ते दरवर्षी स्वा. सावकारांना अभिवादन करतात, पण काही माध्यमं अभिवादन लोकसभेशी जोडत आहेत?
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज १३६ वी जयंती आहे. या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन केले आहे. वास्तविक मनसे अध्यक्ष दरवर्षी अशा थोर व्यक्तींना न चुकता अभिवादन करत असतात. मात्र आज काही प्रसार माध्यमांनी त्याचा थेट संबंध कोणताही विषय नसताना लोकसभेशी जोडत म्हटलं आहे, ‘राज ठाकरे यांनी विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन करुन यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील आपल्यावरील ठपका पुसण्याचा प्रयत्न केला आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
Rattan Power Share Price | 10 रुपयांच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले; अपसाईड टार्गेट - NSE: RTNPOWER