महत्वाच्या बातम्या
-
चांदमियांनी त्यांची छाती फाडण्याची गरज नाही: शिवसेना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. अयोध्येतल्या राम मंदिरासाठी आम्हाला काही प्रदर्शन करण्याची गरज नाही. आमची छाती फाडली तर त्यात रामच दिसेल असं ते म्हणाले होते. त्यावर आता शिवसेनेने पलटवार केलाय. ‘सामना’च्या अग्रलेखातून पाटील यांचा ठाकरे शैलीत समाचार घेण्यात आलाय.
5 वर्षांपूर्वी -
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लावणाऱ्या वंचित विरुद्ध पवार आक्रमक
वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना आणखी एक धक्का बसलाय. पक्षाचे नेते आणि माजी आमदार हरिदास भदे हे आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील. अकोला पूर्वमधून ते विधानसभेवर निवडून आले होते. २६ फेब्रुवारीला त्यांनी आणि इतर ४५ पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे प्रकाश आंबेडकरांकडे पाठवले होते. त्यावेळेसच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेशाचे संकेत दिले होते. या आधीही अनेक ज्येष्ठ नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांची साथ सोडली आहे. त्यामुळे वंचितला मोठा धक्का बसला आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमृता फडणवीस यांच्या फॉलोअर्सना ट्रोल करण्याचा देखील अधिकार: अदिती तटकरे
भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियावर त्यांना फॉलो करणारा आणि ट्रोल करणाराही मोठा वर्ग आहे. याबाबतच बोलतानाच राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
भुजबळ म्हणाले; राज ठाकरेंनी प्रबोधनकारांची शिकवण लक्षात ठेवावी...पण का? - सविस्तर
कोरेगाव-भीमा प्रकरणातील आरोपी आणि हिंदू एकता आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे यांनी रविवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. येत्या २४ तारखेला संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वढू बुद्रूक याठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी ते कृष्णकुंज येथे आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काहीवेळ चर्चा झाली. राज ठाकरे आणि एकबोटे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरेगाव-भीमा प्रकरणातील मिलिंद एकबोटे राज ठाकरेंच्या भेटीला
कोरेगाव-भीमा प्रकरणातील आरोपी आणि हिंदू एकता आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे यांनी रविवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. येत्या २४ तारखेला संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वढू बुद्रूक याठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी ते कृष्णकुंज येथे आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काहीवेळ चर्चा झाली. राज ठाकरे आणि एकबोटे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'युवासेना Mock CET' संकेतस्थळाचं अनावरण - सविस्तर वृत्त
आदित्य ठाकरे यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर युवासेनेच्या आधुनिक संकल्पनेवर देखील लक्ष केंद्रित केलं आहे. महापालिकेत देखील यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याबरोबर इतर ऑनलाईन सर्व्हिस पुरवठादारांच्या सहाय्याने इंजिनियरिंग, फार्मासी, मेडिकल तसेच लॉ अभ्यासक्रमाच्या म्हणजे CET मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची तयारी करण्यासाठी ‘ऑनलाईन मॉक-टेस्ट’ यंत्रणा उभी करण्यावर युवासेनेने काम सुरु केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेकडून 'ते' १ कोटी निधी संदर्भातील ट्विट डिलीट? सविस्तर वृत्त
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काल अयोध्या दौऱ्यावर होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी १ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. काँग्रेसशी युती करून शिवसेनेने हिंदुत्वापासून फारकत घेतली, या टीकेचा त्यांनी प्रतिवाद केला. मी भाजपपासून वेगळा झालोय, हिंदुत्वापासून नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले होते. उद्धव ठाकरे संध्याकाळी ४ वाजता रामल्लाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
5 वर्षांपूर्वी -
खैरे, आढळराव-पाटील, अनंत गिते यांना आराम; तर प्रियांका चतुर्वेदी राज्यसभेवर जाणार?
एप्रिल महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेत चुरस पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी संसदेत पाऊल ठेवण्यास इच्छुक आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेनेतील जुनेजाणते नेतेही शर्यतीत आहेत. मात्र शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
आदित्य ठाकरेंकडून माहुलवासीयांसाठी गोराई येथील घरांच्या चाव्यांचे वितरण
तेल आणि रासायनिक कंपन्यांचा शेजार लाभलेल्या माहुलवासीयांचे जगणे अस्वच्छता, गैरसोयी आणि मुख्य म्हणजे प्रदूषित हवेमुळे असह्य़ बनले आहे. एकमेकांना खेटून असलेल्या येथील इमारतींत दिवसाही सूर्यप्रकाशाला थारा नसतो. त्यामुळे श्वसनाच्या आणि त्वचेच्या विकारांनी हे रहिवाशी ग्रासले आहेत. आयआयटी, केईएम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आदींनी केलेल्या विविध पाहणीत वारंवार माहुलमधील प्रदूषणावर बोट ठेवण्यात आले होते. आजही माहुलवासीयांचा प्रश्न न्यायालयाच्या दरबारात अधूनमधून उठत असतो; परंतु पालिका, युती सरकार अशा सर्वच यंत्रणा त्यांच्या समस्यांवर तातडीने उपाय योजण्याऐवजी कागदी घोडे नाचविण्यातच दंग होते.
5 वर्षांपूर्वी -
अजित पवार चुकले! ती कविता हरिवंशराय बच्चन यांची नव्हे तर...
शेरोशायरी, कविता म्हणत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. पहिल्याच अर्थसंकल्पात अजित पवार यांनी विविध घोषणांचा पाऊस पाडला. शेतकरी, बेरोजगार, उद्योग, शहरी-ग्रामीण, पर्यटन, वैद्यकीय आदी क्षेत्रांसह समाजातील सर्वच घटकांना खूश करण्याचा प्रयत्न अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरुन दिसतो. अजित पवार यांनी केलेल्या काही घोषणा या जुन्याच होत्या. त्या घोषणांचा आजच्या अर्थसंकल्पीय भाषणात पुन्हा उल्लेख करण्यात आला. एकंदर या अर्थसंकल्पात राज्यातील प्रत्येकाला काहीना काही देण्याचा प्रयत्न केला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
कर्जमाफीच्या 'त्या' घोषणेवर चंद्रकांतदादा म्हणाले 'हे आमच्या आंदोलनाचं यश'
शेरोशायरी, कविता म्हणत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. पहिल्याच अर्थसंकल्पात अजित पवार यांनी विविध घोषणांचा पाऊस पाडला. शेतकरी, बेरोजगार, उद्योग, शहरी-ग्रामीण, पर्यटन, वैद्यकीय आदी क्षेत्रांसह समाजातील सर्वच घटकांना खूश करण्याचा प्रयत्न अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरुन दिसतो. अजित पवार यांनी केलेल्या काही घोषणा या जुन्याच होत्या. त्या घोषणांचा आजच्या अर्थसंकल्पीय भाषणात पुन्हा उल्लेख करण्यात आला. एकंदर या अर्थसंकल्पात राज्यातील प्रत्येकाला काहीना काही देण्याचा प्रयत्न केला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीसांनी केलेल्या कर्जमाफीची प्रक्रिया सरकार जाईपर्यंत सुरू होती: अजित पवार
शेरोशायरी, कविता म्हणत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. पहिल्याच अर्थसंकल्पात अजित पवार यांनी विविध घोषणांचा पाऊस पाडला. शेतकरी, बेरोजगार, उद्योग, शहरी-ग्रामीण, पर्यटन, वैद्यकीय आदी क्षेत्रांसह समाजातील सर्वच घटकांना खूश करण्याचा प्रयत्न अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरुन दिसतो. अजित पवार यांनी केलेल्या काही घोषणा या जुन्याच होत्या. त्या घोषणांचा आजच्या अर्थसंकल्पीय भाषणात पुन्हा उल्लेख करण्यात आला. एकंदर या अर्थसंकल्पात राज्यातील प्रत्येकाला काहीना काही देण्याचा प्रयत्न केला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
चमकोगिरी कार्यकर्त्यांना डोस; तर 'त्या' प्रामाणिक कार्यकत्याच्या कामाची नांदगावकरांकडून आठवण
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी समाज माध्यमांवर एक पोस्ट टाकून केवळ चमकोगीरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या देताना एका कट्टर महाराष्ट्र सैनिकाच्या समाजोपयोगी कामांची आठवण करून दिली आहे. मनसेचे पालघर येथील कार्यकर्ते तुलसी जोशी हे पक्षात नेत्यांइतकेच प्रसिद्ध आहेत. सामान्य लोकांचा मदतीला धावून जाणारा त्यांचा स्वभावाची, स्वतः सामान्य लोकं देखील व्हिडिओच्या स्वरूपात आठवण करून देतात.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस सरकारकडून मारहाण झालेला शेतकरी बच्चू भिडूंच्या मदतीने मुख्यमंत्र्यांकडे
शेतकरी रामेश्वर भुसारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आपल्यावर नोंदविण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यासंदर्भात भुसारे यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आपली पीडित कहानी सरकार दरबारी मांडली. आपल्यावर मोठा अन्याय झाल्याची केविलवाणी भावना आणि संताप त्यांनी व्यक्त केला. त्यावेळी, “काळजी करु नको, हे आपल सरकार आहे”, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी पीडित शेतकऱ्याला बोलून दाखवला.
5 वर्षांपूर्वी -
तुम्ही मुस्लिमांचा छळ थांबवा...थेट महाराष्ट्र 'CID'ची वेबसाइट हॅक करून इशारा
महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची (सीआयडी) वेबसाइट हॅक झाल्यानं खळबळ उडाली आहे. हॅकर्सनं दिल्लीतील हिंसाचारादरम्यान मुस्लिमांवर हल्ले होत असल्याचा दावा करतानाच, मोदी सरकार आणि पोलीस विभागाला इशारा दिला आहे. हिंदू-मुस्लीम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हॅकर्सकडून केला जात असल्याचं यातून स्पष्ट होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
प्रभू रामचंद्रांनी वडीलांच्या सांगण्यावरून सत्तेला लाथ मारून...? मनसेची टीका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे. अयोध्या दौऱ्यावर जाण्याअगोदर अयोध्येचा इतिहास लक्षात ठेवा, असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
महिला सुरक्षेवरुन मुख्यमंत्र्यांची डबलढोलकी! कदमांना निवडणुकीत आशीर्वाद अन आता टीकास्त्र
“तुम्हाला जी मुलगी आवडली, ती पळवून आणा असं, सांगणारे राजकारणी आहेत, ते निवडून येतात. ते इथे आहेत. सैनिकांच्या पत्नीबद्दल बोलणारे इथे आहेत. मतांच्या राजकारणासाठी एवढे आपण आगतिक आहोत”, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिला सुरक्षेवरुन विधानपरिषदेत विरोधकांवर हल्लाबोल केला.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस सरकारच्या सिडकोतील 'पारदर्शक' कारभारावर कॅगचे ताशेरे
देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये सिडकोमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भातील कॅगचा अहवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. कॅगच्या अहवालामध्ये फडणवीसांच्या काळात झालेल्या सिडकोच्या २ हजार कोटींच्या कामावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. या अहवालात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्पात अनियमिततेचा ठपका ठेवण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुस्लिम आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांचा 'युटर्न'; भाजपकडून पोलखोल सामना
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देणार अशी घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेवरून भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. मुस्लीम आरक्षणाला विरोध असेल तर उद्धव ठाकरेंनी जाहीर करावं, असं आव्हानच फडणवीसांनी दिलं होतं. तर फडणवीस यांच्या या आव्हानाला जितेंद्र आव्हाड यांनी सणसणीत उत्तर दिलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
आमदार विद्या चव्हाण यांना सुनेकडून प्रत्युत्तर, विवाहबाह्य संबंधांचा आरोप केला होता..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आमदार विद्या चव्हाण यांनी सुनेचा छळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान विद्या चव्हाण यांनी सुनेचे विवाहबाह्य संबध असल्याचा आरोप केला आहे. यावर विद्या चव्हाण यांची सून पुढे आली असून त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आपले विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप खोटा असल्याचे त्यांनी सांगितले. जेव्हा मी यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तेव्हा विद्या चव्हाण यांच्या कुटुंबीयांनी माझ्याविरोधात पुरावे गोळा करुन बदनामी करण्याची धमकी दिली होती. आता त्यांनी नेमकं तेच केलं आणि माझ्याविरोधात कट रचला, असा आरोप विद्या चव्हाण यांच्या सुनेनं केला आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही; 22 टक्के अपसाईड परतावा मिळेल - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL
-
BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL