रायपूर : सध्या ५ राज्यांमध्ये सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून देशात मोदी जादू संपल्यात जमा आहे. त्याचा प्रत्यय तेलंगणात आणि छत्तीसगडमध्ये स्पष्ट दिसत आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी घेतली असून भाजप सत्तास्थापनेपासून फार दूर असल्याचे समजते. सुरवातीच्या हाती आलेल्या कल प्रमाणे भाजप २८ तर काँग्रेसने ५८ जागांवर मोठी आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
त्यामुळे भाजप एक राज्य गमावणार हे जवळपास निश्चित झाले आहे. तेलंगणात भाजपचा पराभव जवळपास निश्चित झाला आहे. त्यामुळे आता सध्या मध्य प्रदेशात काही चमत्कार झाल्यास भाजपाची इज्जत राखली जाईल. कारण राजस्थान सुद्धा जवळपास हातून गेल्यास जमा आहे, असा सुरुवातीचा कल निश्चित दिसतो आहे.
