29 March 2024 6:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

शिवराय लक्षात ठेवतील, कधी न येणा-या कावळ्यांना : नितेश राणे

मुंबई : आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रामनामाचा जप करण्यास शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुरुवात केल्याने त्यांच्यावर आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे अयोध्येला जाण्यापूर्वी माती कलश घेऊन जाण्यासाठी शिवनेरीवर दाखल झाले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरील माती अयोध्येला घेऊन जाण्याची त्यांची योजना आहे. अनेक साधू संतांनी सुद्धा उद्धव ठाकरे हे सगळं केवळ राजकारणासाठी करत आहेत अशी टीका केली आहे. त्यामुळे आता आमदार नितेश राणे यांनी सुद्धा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

आमदार नितेश राणे यांनी ट्विटरद्वारे शिवसेना प्रमुखांवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, “जे शिवजयंतीला कधी शिवनेरी किल्ल्यावर जात नाहीत, ते राजकारणासाठी मात्र तिथली माती उचलायला तयार झाले आहेत.

तसेच पुढे लिहिलं आहे की;

शिवजयंतीला कधी न जाणारे। चालले आहेत शिवनेरीला॥
शिवराय लक्षात ठेवतील । कधी न येणा-या कावळ्यांना ॥

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x